Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

सरकार मुळातच अनैसर्गिक, उदयनराजेंचा मविआला टोला

सरकार मुळातच अनैसर्गिक, उदयनराजेंचा मविआला टोला

मुंबई : राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपनेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी महाविकास आघाडीवर कडाडून टीका केली आहे. 'महाविकास आघाडी स्थापनेपासून अनैसर्गिक आघाडी होती, स्थानिक कार्यकर्त्यांनाही ही आघाडी अडचणीची ठरत होती', अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना दिली.


'महाविकास आघाडी सरकार हेच मुळात अनैसर्गिकरित्या तयार झाले होते. कॉग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात जनतेने कौल दिला होता. अजुनही महाविकास आघाडीच्या आमदार खासदारांना हे सरकार कायम ठेवायचे असेल. तर, त्यांनी त्यांच्या राजकीय करिअरमधले शेवटचे काही महिने किंवा वर्ष उपभोगून घ्यावेत.' अशी टीका उदयनराजे यांनी केली.


पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे. त्यामुळे जर आज कोणी धमकी देत असतील, तर त्यांना समाज भीक घालणार नाही आणि नागरिक त्यांना त्यांची जागा दाखवून देतील.


'खरे तर, स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकत्रित काम करू शकत नाहीत. कार्यकर्ते लोकांना आपल्या प्रतिस्पर्ध्यांसाठी मतदान करायला कसे सांगणार. ही आघाडी स्थानिक कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी अडचणीचीच आहे', असे उदयनराजे यांनी म्हटले.

Comments
Add Comment