सरकार मुळातच अनैसर्गिक, उदयनराजेंचा मविआला टोला

मुंबई : राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपनेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी महाविकास आघाडीवर कडाडून टीका केली आहे. 'महाविकास आघाडी स्थापनेपासून अनैसर्गिक आघाडी होती, स्थानिक कार्यकर्त्यांनाही ही आघाडी अडचणीची ठरत होती', अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना दिली.


'महाविकास आघाडी सरकार हेच मुळात अनैसर्गिकरित्या तयार झाले होते. कॉग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात जनतेने कौल दिला होता. अजुनही महाविकास आघाडीच्या आमदार खासदारांना हे सरकार कायम ठेवायचे असेल. तर, त्यांनी त्यांच्या राजकीय करिअरमधले शेवटचे काही महिने किंवा वर्ष उपभोगून घ्यावेत.' अशी टीका उदयनराजे यांनी केली.


पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे. त्यामुळे जर आज कोणी धमकी देत असतील, तर त्यांना समाज भीक घालणार नाही आणि नागरिक त्यांना त्यांची जागा दाखवून देतील.


'खरे तर, स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकत्रित काम करू शकत नाहीत. कार्यकर्ते लोकांना आपल्या प्रतिस्पर्ध्यांसाठी मतदान करायला कसे सांगणार. ही आघाडी स्थानिक कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी अडचणीचीच आहे', असे उदयनराजे यांनी म्हटले.

Comments
Add Comment

‘ए मेरे वतन के लोगो’ आणि रोहित शर्मा; भावूक करणारा व्हिडिओ चर्चेत

मुंबई : रोहित शर्मा केवळ मैदानावरच नाही, तर मैदानाबाहेरही आपलं देशप्रेम वेळोवेळी व्यक्त करताना दिसतो. पुन्हा

मुंबई महापालिका क्षेत्रात १ लाख ६८ हजार दुबार मतदार

मुंबई : मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुबार मतदारांच्या छाननीत अखेर एक लाख ६८ हजार ३५०

पुण्यात महाविकास आघाडीत फूट, आम आदमी पार्टी स्वबळावर लढणार

पुणे : पुण्यात जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर होताच तासाभरात महाविकास आघाडी फूटली आहे. आम आदमी पक्षाने (आप)

Mumbai Local News : मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक; 'थर्टी फर्स्ट'साठी मात्र रेल्वेकडून खूशखबर

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय रेल्वेच्या रूळांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी येत्या रविवार, २८

कबुतरांना दाणे घालणं पडलं महागात! बसला हजारोंचा दणका

मुंबई: कबुतरांमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याला धोका असल्याने कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय मुंबई

New Year News Rules : नवं वर्ष, नवे नियम! १ जानेवारीपासून तुमचे आर्थिक गणित बदलणार; २०२६ मध्ये लागू होणारे 'हे' १० मोठे बदल!

मुंबई : वर्ष २०२५ ला निरोप देण्यासाठी आता अवघे ४ दिवस उरले असून, १ जानेवारी २०२६ पासून आपल्या दैनंदिन जीवनातील