सरकार मुळातच अनैसर्गिक, उदयनराजेंचा मविआला टोला

  79

मुंबई : राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपनेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी महाविकास आघाडीवर कडाडून टीका केली आहे. 'महाविकास आघाडी स्थापनेपासून अनैसर्गिक आघाडी होती, स्थानिक कार्यकर्त्यांनाही ही आघाडी अडचणीची ठरत होती', अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना दिली.


'महाविकास आघाडी सरकार हेच मुळात अनैसर्गिकरित्या तयार झाले होते. कॉग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात जनतेने कौल दिला होता. अजुनही महाविकास आघाडीच्या आमदार खासदारांना हे सरकार कायम ठेवायचे असेल. तर, त्यांनी त्यांच्या राजकीय करिअरमधले शेवटचे काही महिने किंवा वर्ष उपभोगून घ्यावेत.' अशी टीका उदयनराजे यांनी केली.


पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे. त्यामुळे जर आज कोणी धमकी देत असतील, तर त्यांना समाज भीक घालणार नाही आणि नागरिक त्यांना त्यांची जागा दाखवून देतील.


'खरे तर, स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकत्रित काम करू शकत नाहीत. कार्यकर्ते लोकांना आपल्या प्रतिस्पर्ध्यांसाठी मतदान करायला कसे सांगणार. ही आघाडी स्थानिक कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी अडचणीचीच आहे', असे उदयनराजे यांनी म्हटले.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.