नवी दिल्ली : भारतात गेल्या २४ तासांत १७ हजार ३३६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आदल्या दिवशीच्या तुलनेत रुग्णांची संख्या ३० टक्क्यांनी वाढली आहे. ही मागील १०० दिवसांमधील सर्वाधिक रुग्णवाढ आहे. देशातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५ लाख २४ हजार ९५४ वर पोहोचली आहे.
देशातील सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा ८८ हजारांच्या पुढे गेला आहे. भारतात सध्या ८८ हजार २८४ रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गावर उपचार घेत आहेत. देशातील दैनंदिन रुग्ण सकारात्मकतेचा दर ४.३२ टक्के आणि रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८.५९ टक्के इतके आहे. तर महाराष्ट्रात ११ फेब्रुवारीनंतर एका दिवसात सर्वात जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
गुरुवारी दिवसभरात महाराष्ट्रात ५ हजार २१८ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४९८९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. मुंबईत सर्वाधिक म्हणजे २४७९ रुग्णांची भर पडली आहे. तसेच एका कोरोनाबाधित रुग्णाने आपला जीव गमवाला. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८३ टक्के झाले आहे.
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…
मुंबई : उन्हाळ्याचा प्रभाव खुपच वाढत आहे.उन्हाळ्यात बहुतेक लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दही खातात. पण…
हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) यांना रिअल इस्टेट (Real Estate Groups) गुंतवणूकदारांच्या…
वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…