नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी भारत-एनसीएपी प्रोग्राम लॉन्च करण्याच्या मसुद्याला मान्यता देण्यात आली आहे. तसे त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिला आहे. आता देशात लाँच होणाऱ्या गाड्यांना सुरक्षा तपासण्यासाठी परदेशात जावे लागणार नाही, तर भारतात आपल्या कार किती सुरक्षित आहेत, याची क्रॅश टेस्ट करता येणार आहे. क्रॅश टेस्टमध्ये त्यांच्या प्रदर्शनानुसार सेफ्टी रेटिंग दिली जाणार आहे.
आता भारताची स्वतःची सुरक्षा एजन्सी असेल, या बातम्यांवर आता शिक्कामोर्तब झाले आहे. सध्या भारतात तयारी होणारी वाहने क्रॅश टेस्टसाठी परदेशात म्हणजेच ग्लोबल एनसीएपीकडे पाठवली जातात. मात्र आता या क्रॅश टेस्ट भारतातच होतील. ग्लोबल क्रॅश टेस्ट प्रोटोकॉल प्रमाणेच भारतातही वाहनांचे टेस्टिंग होईल. गडकरी म्हणाले की, भारताला जगातील नंबर १ ऑटोमोबाइल हब बनवण्याच्या मिशनसह आपले काम सुरु आहे. त्यामुळे ऑटोमोबाइल उद्योगाला आत्मानिर्भर बनवण्यासाठी भारत-एनसीएपी हे एक महत्त्वाचे साधन ठरेल.
सेवाव्रती: शिबानी जोशी ईशान्य भारतातील सात राज्ये निसर्ग संपन्नतेने नटलेली राज्य; परंतु सीमारेषा जवळ असल्यामुळे…
मुंबई : आधीच महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना आणखीन महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. सीएनजी…
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर या फॉरमॅटला अलविदा म्हटले…
महाराष्ट्रातील १० कॉलेजचा त्यात समावेश मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी परदेशामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या…
वॉशिंग्टन : अमेरिकेत आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. वाढती बेरोजगारी आणि आयटीतील एआयचा वाढता यामुळे…
मुंबई: केसगळती(hair fall) ही सध्याची मोठी समस्या बनली आहे. थोडेफार केस गळणे ही सामान्य बाब…