बंडखोर परतले तर शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल - संजय राऊत

मुंबई : बंडखोर आमदारांनी २४ तासात गुवाहाटीहून मुंबईला परत यावे. याठिकाणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा करावी. आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडू, असे आश्वासन खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी दिले.


'वर्षा' निवासस्थानात आज शिवसेना नेते आणि आमदारांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, बाहेर असलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना जर आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडावे आणि वेगळा विचार करावा असे वाटत असेल तर तोदेखील विचार करू. मात्र, तुम्ही आधी २४ तासात मुंबईत येण्याची हिंमत दाखवावी. मुंबईत आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रत्यक्ष चर्चा करावी, असे आवाहन राऊत यांनी यावेळी केले.


बंडखोर आमदारांनी पत्रकारांना व्हॉट्सअॅपवर हॉटेलमधील फोटो, व्हिडिओ पाठवण्यापेक्षा प्रत्यक्षात येऊन चर्चा करावी. आमचा गुवाहाटीमधील २१ आमदारांसोबत संपर्क झाला असल्याची माहिती यावेळी राऊत यांनी दिली. राज्याबाहेर गेलेले शिवसेनेचे २०-२५ आमदार पुन्हा शिवसेनेत येतील असा विश्वास आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी इच्छा असेल तर तुम्ही प्रत्यक्षात भेटून चर्चा करावी. मात्र, त्यांचा हा बहाणा असल्याचे राऊत यांनी सांगितले.

Comments
Add Comment

महापालिका आयुक्तांनी, अमित साटम यांच्या पत्राची दखल घेतली नाही आणि आता घडले असे...

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेतील अभियंत्याच्या बदलीत मोठ्याप्रमाणात गैरप्रकार होत असल्याने याबाबत

महाविकास आघाडीचे आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळले

मतदारयाद्या सदोष मुद्द्यांवर तपशीलवार खुलासा मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या

दादरमधील वाढत्या फटाक्यांच्या दुकानांना कुणाचे अभय? दुकानदारांसह नागरिकांचा जीव धोक्यात

मुंबई (खास प्रतिनिधी) : दीपावलीच्या सणा निमित्त केल्या जाणाऱ्या आतषबाजींकरता मुंबईतील काही प्रमुख दुकानांमध्ये

मालाड पूर्वेत भीषण आग! लाकडी गोदामात लागलेल्या आगीने घेतले रौद्ररूप: नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

मुंबई : मुंबईतील वर्दळीच्या आणि दाट लोकवस्ती असलेल्या मालाड पूर्व भागात आज दुपारी भीषण आगीची घटना घडली.

महालक्ष्मी मंदिर परिसराचे सुशोभीकरण, आयुक्तांनी दिले असे आदेश..

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील प्रमुख श्रद्धास्थानांपैकी एक असलेल्या महालक्ष्मी मंदिर परिसराचे सुशोभीकरण व

ट्रेन तिकीट बुकिंगमध्ये तांत्रिक बिघाड, पेमेंट अडकले? रिफंडसाठी ‘ही’ पद्धत अवलंबा.

दिवाळीसाठी रेल्वेने गावी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम