सविता पुनियाकडे महिला हॉकी संघाची कमान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला हॉकी विश्वचषकासाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. अनुभवी गोलरक्षक सविता पुनियाकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. तर दीप ग्रेस एक्काला उपकर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


महिला हॉकी विश्वचषक १ ते १७ जुलै दरम्यान नेदरलँड आणि स्पेन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जाणार आहे. माजी कर्णधार राणी रामपाल पायाच्या स्नायूंच्या दुखापतीतून सावरल्यानंतर बेल्जियम आणि नेदरलँड्सविरुद्धच्या एफआयएच प्रो लीग सामन्यांसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला.


संघाचा भाग असूनही, राणी प्रो लीगच्या युरोपियन लेग दरम्यान पहिल्या चार सामन्यांमध्ये खेळली नाही. यामुळे ती अनफिट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, हॉकी इंडियाने तिच्या फिटनेसची स्थिती स्पष्ट केलेली नाही.



गोलरक्षक : सविता पुनिया (कर्णधार), बिचू देवी खरीबम;


बचावपटू : दीप ग्रेस एक्का, गुरजित कौर, निक्की प्रधान, उदिता;


मिडफिल्डर : निशा, सुशीला चानू, पुखरंबम, मोनिका, नेहा, ज्योती, नवज्योत कौर, सोनिका, सलीमा टेटे;


फॉरवर्ड : वंदना कटारिया, लालरेमसियामी, नवनीत कौर, शर्मिला देवी;


पर्यायी खेळाडू : अक्षता आबासो ढाकले, संगीता कुमारी या खेळाडूंची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026: भारतीय संघाला मोठा झटका; 'हा' खेळाडू स्पर्धेतून बाहेर

मुंबई: आयसीसी पुरुष T२० विश्वचषक २०२६ ची आजपासून (शनिवार, ७ फेब्रुवारी) सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा सुरु

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि