नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ दिसून येतेय. गेल्या २४ तासांत १२ हजार २४९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर मंगळवारी दिवसभरात १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापूर्वी सोमवारी रुग्णसंख्येत मोठी घट झाली होती. सोमवारी देशात ९९२३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि १७ रुग्णांचा मृत्यू झाला. एका दिवसात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येचा चढता आलेख दिसून आला.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, देशातील दैनंदिन रुग्ण सकारात्मकतेचा दर वाढून ३.९४ टक्क्यांवर पोहोचला आहे. मागील २४ तासांत ९ हजार ८६२ हजार रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. मंगळवारी दिवसभरात झालेल्या १३ रुग्णांच्या मृत्यूमुळे देशातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूची एकूण संख्या ५ लाख २४ हजार ९०३ वर पोहोचली आहे. देशातील कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…