बहुमताशिवाय गटनेत्याची हकालपट्टी करता येत नाही!

मुंबई : विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकारण आज सकाळपासून ढवळून निघाले आहे. शिवसेनेचे खंदे समर्थक नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात कथित बंड पुकारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदावरुन एकनाथ शिंदेंना बडतर्फ केले आहे. शिवसेनेच्या गटनेते पदाची जबाबदारी अजय चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.


शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओ जारी करत प्रतिक्रिया दिली आहे. अशाप्रकारे गटनेत्याला बडतर्फ केले जाऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.


https://twitter.com/SMungantiwar/status/1539211974436790272

संबंधित व्हिडीओत त्यांनी म्हटले की, “मला जो काही नियम माहीत आहे, त्यानुसार गटनेत्याच्या अशाप्रकारे हकालपट्टी करता येत नाही. गटनेत्याची हकालपट्टी करायची असेल, तर तुमच्याकडे आमदारांचे बहुमत असावे लागते. आमदारांची संख्या लागते. जिथे आमदारांची संख्याच नाही, तिथे गटनेत्याची हकालपट्टी करायची, हे कायद्यात बसत नाही,” असे मुनगंटीवारांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे

माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन; पाच ते १०० कोटींपर्यंत खर्चास मान्यता

मुंबई : राज्यातील माहिती तंत्रज्ञानविषयक धोरण व प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा