बहुमताशिवाय गटनेत्याची हकालपट्टी करता येत नाही!

मुंबई : विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकारण आज सकाळपासून ढवळून निघाले आहे. शिवसेनेचे खंदे समर्थक नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात कथित बंड पुकारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदावरुन एकनाथ शिंदेंना बडतर्फ केले आहे. शिवसेनेच्या गटनेते पदाची जबाबदारी अजय चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.


शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओ जारी करत प्रतिक्रिया दिली आहे. अशाप्रकारे गटनेत्याला बडतर्फ केले जाऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.


https://twitter.com/SMungantiwar/status/1539211974436790272

संबंधित व्हिडीओत त्यांनी म्हटले की, “मला जो काही नियम माहीत आहे, त्यानुसार गटनेत्याच्या अशाप्रकारे हकालपट्टी करता येत नाही. गटनेत्याची हकालपट्टी करायची असेल, तर तुमच्याकडे आमदारांचे बहुमत असावे लागते. आमदारांची संख्या लागते. जिथे आमदारांची संख्याच नाही, तिथे गटनेत्याची हकालपट्टी करायची, हे कायद्यात बसत नाही,” असे मुनगंटीवारांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane on Nashik Tree Cutting : 'वृक्षतोडीवर आक्षेप, मग बकरी कापताना गप्प का?' पर्यावरणाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांना मंत्री नितेश राणेंचा तिखट सवाल!

मुंबई : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा २०२७ (Kumbh Mela 2027) च्या भव्य तयारीला सुरुवात झाली असताना, साधूग्राम उभारणीसाठी

हनुमान रोड मेट्रो स्टेशनला डॉ. रमेश प्रभू यांचे नाव देणार

मुंबई : शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विलेपार्ल्याचे माजी आमदार व

गोरेगावमधील मलनिस्सारण वाहिनीच्या खोदकामामुळे नागरिक हैराण

भाजपच्या माजी नगरसेविकेने अधिकाऱ्यांना घेतले फैलावर मुंबई  : गोरेगाव पूर्व येथील आरे भास्कर मार्गावर मल जल

आज-उद्या-परवा समुद्रकिनाऱ्यावर काळजी घ्या!

४ ते ७ डिसेंबर दरम्यान सलग तीन दिवस मोठी भरती मुंबई : मुंबईमधील समुद्रकिनाऱ्यांवर फेरफटका कारण्यासाठी जाणारे

निकाल लागून ४५ दिवसांनंतरही भरती प्रक्रिया मंदावलेलीच!

वैद्यकीय आरोग्य अधिकारी भरती प्रक्रियेत गोंधळ निकालानंतर ‘अतिरिक्त गुण’ नियम बदलाचा निर्णय वैद्यकीय आरोग्य

‘राजगृह’सह चैत्यभूमीवर नागरी सेवा-सुविधा उपलब्ध

सुमारे ८ हजारांहून अधिक अधिकारी - कर्मचारी तैनात मुंबई  : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण