फडणवीसांचा करिश्मा कायम

  86

मुंबई : विधान परिषदेच्या १० जागांसाठी झालेल्या निवडणूकीमध्ये भाजपला ५ जागांवर तर महाविकास आघाडीला ५ जागांवर विजय मिळाला आहे. भाजपने प्रसाद लाड यांच्यासाठी विधान परिषद निवडणूक प्रतिष्ठेची केलेली असताना कमी संख्याबळ असतानाही प्रसाद लाड विजयी झाले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांचा करिश्मा कायम असल्याचे राज्यसभेपाठोपाठ झालेल्या विधान परिषद निवडणूकीतही पहावयास मिळाला आहे.


भाजपकडून राम शिंदे, श्रीकांत भारतीय, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि उमा खापरे तर महाविकास आघाडीतील शिवसेनेकडून सचिन अहिर, आमश्या पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर हे पहिल्याच फेरीत विजयासाठी आवश्यक असणारी मते मिळवून विजयी झाले आहेत.


काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे विजयी झाले असून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप पराभूत झाले आहेत. विधान परिषद निवडणूक होण्यापूर्वीच माजी मुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाई जगताप यांनी उमेदवारी मागे घ्यावी असे आवाहन करताना भाई जगताप पराभूत होणार असल्याचे भाकित वर्तविले होते. महाविकास आघाडीला समीकरणाच्या गणितात भाजपने पुन्हा एकवार धोबीपछाड दिल्याने भाजपचे आमदार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये निकाल जाहिर होताच राज्यभरात जल्लोष साजरा केला जात आहे.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता