फडणवीसांचा करिश्मा कायम

मुंबई : विधान परिषदेच्या १० जागांसाठी झालेल्या निवडणूकीमध्ये भाजपला ५ जागांवर तर महाविकास आघाडीला ५ जागांवर विजय मिळाला आहे. भाजपने प्रसाद लाड यांच्यासाठी विधान परिषद निवडणूक प्रतिष्ठेची केलेली असताना कमी संख्याबळ असतानाही प्रसाद लाड विजयी झाले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांचा करिश्मा कायम असल्याचे राज्यसभेपाठोपाठ झालेल्या विधान परिषद निवडणूकीतही पहावयास मिळाला आहे.


भाजपकडून राम शिंदे, श्रीकांत भारतीय, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि उमा खापरे तर महाविकास आघाडीतील शिवसेनेकडून सचिन अहिर, आमश्या पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर हे पहिल्याच फेरीत विजयासाठी आवश्यक असणारी मते मिळवून विजयी झाले आहेत.


काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे विजयी झाले असून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप पराभूत झाले आहेत. विधान परिषद निवडणूक होण्यापूर्वीच माजी मुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाई जगताप यांनी उमेदवारी मागे घ्यावी असे आवाहन करताना भाई जगताप पराभूत होणार असल्याचे भाकित वर्तविले होते. महाविकास आघाडीला समीकरणाच्या गणितात भाजपने पुन्हा एकवार धोबीपछाड दिल्याने भाजपचे आमदार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये निकाल जाहिर होताच राज्यभरात जल्लोष साजरा केला जात आहे.

Comments
Add Comment

1 March Rules Change : १ मार्चपासून बदलणार तुमच्या आयुष्याशी संबंधित 'हे' नियम; रेल्वे तिकीट बुकिंग पासून ते LPG सुद्धा...

येत्या १ मार्चपासून सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत.

दोन वर्षांत दादर-पुणे हिरकणी बसच्या ७८ टक्के फेऱ्यांमध्ये घट…

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या दादर – पुणे मार्गावरील हिरकणी बसच्या फेऱ्यांमध्ये कमालीची घसरण झाली आहे. दोन

मुंबईत ७०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ?

उबाठाच्या प्रस्तावाला सत्ताधारी भाजप- शिवसेनेची मंजुरी मुंबई : मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना

होळीसाठी मुंबई-रत्नागिरी दरम्यान ६ अतिरिक्त गाड्या

'दिवा-चिपळूण' गाडीच्या तारखेत बदल पनवेल-रत्नागिरी मार्गावर मेमू स्पेशल धावणार मुंबई : येत्या होळी सणानिमित्त

राज्य शासनाकडे पालिकेची ११ हजार कोटींची थकबाकी

वसुलीसाठी नेमलेली समिती कागदावरच? मुंबई : मुंबईतील राज्य शासनाच्या अखत्यारितील विविध कार्यालयांकडून सहाय्यक

अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी उद्यापासून राज्यभर धडक मोहीम; परिवहन मंत्र्यांचे आदेश

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर जप्तीची कारवाई मुंबई  : राज्यभरात फोफावलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे