विधान परिषदेसाठी आज ‘मैदान-ए-जंग’

  132

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्य विधानसभा सदस्यांकडून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असून, सोमवारी २० जून रोजी विधान परिषदेसाठी होणाऱ्या निवडणुकीत ‘मैदान-ए-जंग’मध्ये कोण बाजी मारणार, याकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. राज्यसभेच्या जागांसाठी अपक्षांना आपलेसे करून दुसरी जागा जिंकून आणण्याची किमया दाखविणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे विधान परिषदेत उभे राहिलेल्या पाचही भाजप उमेदवारांना निवडून आणण्यासाठी कौशल्य पणाला लावतील आणि पाचजणांच्या गळ्यात विजयश्रीची माळ पडेल, असा ठाम विश्वास भाजप कार्यकर्त्यांना वाटत आहे.


या आधी विधानसभेच्या आमदारांच्या मतांवर निवडून जाणाऱ्या राज्य सभेची निवडणूक अटीतटीची झाली होती. महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ असताना शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव करत भाजपचे धनंजय महाडिक हे निवडून आले होते. राज्यसभेच्या निवडणुकीचा राज्यातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. विशेष म्हणजे अपक्षांबरोबर स्वपक्षातील सत्ताधारी आमदारांकडे अडीच वर्षांत लक्ष देणाऱ्या ठाकरे सरकारवर निधी वाटपावरूनही नाराजी आहे.


आता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे उमेदवार रिंगणात असले तरी, आपापल्या उमेदवारांसाठी परस्परांच्या समर्थक आमदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केल्याने आघाडीतच बिघाडी होणार की काय, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर दगाफटका होऊ नये यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडी तसेच विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टीने आपापल्या आमदारांना शनिवारी मुंबईत दाखल होण्याचे फर्मान सोडले होते. दरम्यान शिवसेनेच्या नेत्यांनी रविवारीच आपल्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावले.


देवेंद्र फडणवीस पुन्हा ठरणार किंगमेकर?


भाजपच्या पाचव्या उमेदवाराला विजयी होण्यासाठी २२ मतांची आवश्यकता आहे. मात्र विधान परिषदेसाठी गुप्त पद्धतीने आमदार मतदान करणार असल्याने, भाजपचा पाचवा उमेदवार विजयी होईल, असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांना वाटत आहे. राज्यसभेत भाजपच्या दुसऱ्या उमेदवाराचा विजय


देवेंद्र फडणवीस यांनी खेचून आणल्याने, विधान परिषदेच्या निवडणुकीत पाच भाजप उमेदवार निवडून येतील. राज्यातील आघाडी सरकारवरील जनतेचा विश्वास उडाला आहे. त्यात जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांची भाजपला साथ मिळाली तर देवेंद्र फडणवीस पुन्हा किंगमेकर ठरणार आहेत.


११ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत


भाजप - प्रवीण दरेकर, राम शिंदे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, प्रसाद लाड
काँग्रेस - चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप
राष्ट्रवादी काँग्रेस - रामराजे नाईक - निंबाळकर, एकनाथ खडसे
शिवसेना - सचिन आहीर, आमशा पाडवी

Comments
Add Comment

राज्यात यापुढे पायाभूत सोयी सुविधेचा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करावा – मुख्यमंत्री

बोरिवली ते ठाणे दुहेरी बोगदा प्रकल्पाचा घेतला आढावा मुंबई : राज्यात यापुढे कुठलाही पायाभूत सोयी सुविधेचा

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच

Pratap Sarnaik : वाहतूक व्यवसायकांना फायदा होणार ! ई-चलन समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन करावी, परिवहन मंत्र्यांचे आदेश...

मुंबई : गेले अनेक वर्षापासून वाहतूक व्यावसायकांना ई-चलन संदर्भात अडचणींचा सामना करावा लागतोय, ही बाब सरकारच्या

हिंदी सक्ती विरोधात चढाओढ! ठाकरेंचे मोर्चे मराठीसाठी की राजकीय शक्ती दाखवण्यासाठी?

मुंबई : एक मुद्दा… पण दोन मोर्चे! आणि दोघंही 'ठाकरे'. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येतील, असं काही

Nitin Gadkari : दुचाकी चालकांकडून कोणत्याही टोल घेतला जाणार नाही, नितीन गडकरी यांची सोशल मीडियावरती पोस्ट...

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जलै २०२५ पासून दुचाकी वाहन चालकांकडून टोल वसूल करण्यात येईल. अशा

आदिवासी समाजाला अतिरिक्त आरक्षण ? मुख्यमंत्र्यांना पाठवणार प्रस्ताव...

मुंबई : राज्यात काही जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजाची संख्या जास्त आहे.  आदिवासी समाजातील तरुणांना नोकऱ्यांमध्ये