विधान परिषदेसाठी आज ‘मैदान-ए-जंग’

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्य विधानसभा सदस्यांकडून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असून, सोमवारी २० जून रोजी विधान परिषदेसाठी होणाऱ्या निवडणुकीत ‘मैदान-ए-जंग’मध्ये कोण बाजी मारणार, याकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. राज्यसभेच्या जागांसाठी अपक्षांना आपलेसे करून दुसरी जागा जिंकून आणण्याची किमया दाखविणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे विधान परिषदेत उभे राहिलेल्या पाचही भाजप उमेदवारांना निवडून आणण्यासाठी कौशल्य पणाला लावतील आणि पाचजणांच्या गळ्यात विजयश्रीची माळ पडेल, असा ठाम विश्वास भाजप कार्यकर्त्यांना वाटत आहे.


या आधी विधानसभेच्या आमदारांच्या मतांवर निवडून जाणाऱ्या राज्य सभेची निवडणूक अटीतटीची झाली होती. महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ असताना शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव करत भाजपचे धनंजय महाडिक हे निवडून आले होते. राज्यसभेच्या निवडणुकीचा राज्यातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. विशेष म्हणजे अपक्षांबरोबर स्वपक्षातील सत्ताधारी आमदारांकडे अडीच वर्षांत लक्ष देणाऱ्या ठाकरे सरकारवर निधी वाटपावरूनही नाराजी आहे.


आता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे उमेदवार रिंगणात असले तरी, आपापल्या उमेदवारांसाठी परस्परांच्या समर्थक आमदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केल्याने आघाडीतच बिघाडी होणार की काय, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर दगाफटका होऊ नये यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडी तसेच विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टीने आपापल्या आमदारांना शनिवारी मुंबईत दाखल होण्याचे फर्मान सोडले होते. दरम्यान शिवसेनेच्या नेत्यांनी रविवारीच आपल्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावले.


देवेंद्र फडणवीस पुन्हा ठरणार किंगमेकर?


भाजपच्या पाचव्या उमेदवाराला विजयी होण्यासाठी २२ मतांची आवश्यकता आहे. मात्र विधान परिषदेसाठी गुप्त पद्धतीने आमदार मतदान करणार असल्याने, भाजपचा पाचवा उमेदवार विजयी होईल, असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांना वाटत आहे. राज्यसभेत भाजपच्या दुसऱ्या उमेदवाराचा विजय


देवेंद्र फडणवीस यांनी खेचून आणल्याने, विधान परिषदेच्या निवडणुकीत पाच भाजप उमेदवार निवडून येतील. राज्यातील आघाडी सरकारवरील जनतेचा विश्वास उडाला आहे. त्यात जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांची भाजपला साथ मिळाली तर देवेंद्र फडणवीस पुन्हा किंगमेकर ठरणार आहेत.


११ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत


भाजप - प्रवीण दरेकर, राम शिंदे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, प्रसाद लाड
काँग्रेस - चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप
राष्ट्रवादी काँग्रेस - रामराजे नाईक - निंबाळकर, एकनाथ खडसे
शिवसेना - सचिन आहीर, आमशा पाडवी

Comments
Add Comment

मार्चच्या 'या' तारखेपासून बेस्ट बससेवेत बदल; काही मार्गांमध्ये फेरबदल तर काही ठिकाणी एसी सेवा

मुंबई : मुंबईकरांची सेवा करणारी बेस्ट बसच्या मार्गात आणि तिच्या फेऱ्यांमध्ये मुंबईकरांच्या सोयीनुसार परिवहन

1 March Rules Change : १ मार्चपासून बदलणार तुमच्या आयुष्याशी संबंधित 'हे' नियम; रेल्वे तिकीट बुकिंग पासून ते LPG सुद्धा...

येत्या १ मार्चपासून सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत.

दोन वर्षांत दादर-पुणे हिरकणी बसच्या ७८ टक्के फेऱ्यांमध्ये घट…

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या दादर – पुणे मार्गावरील हिरकणी बसच्या फेऱ्यांमध्ये कमालीची घसरण झाली आहे. दोन

मुंबईत ७०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ?

उबाठाच्या प्रस्तावाला सत्ताधारी भाजप- शिवसेनेची मंजुरी मुंबई : मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना

होळीसाठी मुंबई-रत्नागिरी दरम्यान ६ अतिरिक्त गाड्या

'दिवा-चिपळूण' गाडीच्या तारखेत बदल पनवेल-रत्नागिरी मार्गावर मेमू स्पेशल धावणार मुंबई : येत्या होळी सणानिमित्त

राज्य शासनाकडे पालिकेची ११ हजार कोटींची थकबाकी

वसुलीसाठी नेमलेली समिती कागदावरच? मुंबई : मुंबईतील राज्य शासनाच्या अखत्यारितील विविध कार्यालयांकडून सहाय्यक