विधान परिषदेसाठी आज ‘मैदान-ए-जंग’

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्य विधानसभा सदस्यांकडून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असून, सोमवारी २० जून रोजी विधान परिषदेसाठी होणाऱ्या निवडणुकीत ‘मैदान-ए-जंग’मध्ये कोण बाजी मारणार, याकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. राज्यसभेच्या जागांसाठी अपक्षांना आपलेसे करून दुसरी जागा जिंकून आणण्याची किमया दाखविणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे विधान परिषदेत उभे राहिलेल्या पाचही भाजप उमेदवारांना निवडून आणण्यासाठी कौशल्य पणाला लावतील आणि पाचजणांच्या गळ्यात विजयश्रीची माळ पडेल, असा ठाम विश्वास भाजप कार्यकर्त्यांना वाटत आहे.


या आधी विधानसभेच्या आमदारांच्या मतांवर निवडून जाणाऱ्या राज्य सभेची निवडणूक अटीतटीची झाली होती. महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ असताना शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव करत भाजपचे धनंजय महाडिक हे निवडून आले होते. राज्यसभेच्या निवडणुकीचा राज्यातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. विशेष म्हणजे अपक्षांबरोबर स्वपक्षातील सत्ताधारी आमदारांकडे अडीच वर्षांत लक्ष देणाऱ्या ठाकरे सरकारवर निधी वाटपावरूनही नाराजी आहे.


आता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे उमेदवार रिंगणात असले तरी, आपापल्या उमेदवारांसाठी परस्परांच्या समर्थक आमदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केल्याने आघाडीतच बिघाडी होणार की काय, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर दगाफटका होऊ नये यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडी तसेच विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टीने आपापल्या आमदारांना शनिवारी मुंबईत दाखल होण्याचे फर्मान सोडले होते. दरम्यान शिवसेनेच्या नेत्यांनी रविवारीच आपल्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावले.


देवेंद्र फडणवीस पुन्हा ठरणार किंगमेकर?


भाजपच्या पाचव्या उमेदवाराला विजयी होण्यासाठी २२ मतांची आवश्यकता आहे. मात्र विधान परिषदेसाठी गुप्त पद्धतीने आमदार मतदान करणार असल्याने, भाजपचा पाचवा उमेदवार विजयी होईल, असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांना वाटत आहे. राज्यसभेत भाजपच्या दुसऱ्या उमेदवाराचा विजय


देवेंद्र फडणवीस यांनी खेचून आणल्याने, विधान परिषदेच्या निवडणुकीत पाच भाजप उमेदवार निवडून येतील. राज्यातील आघाडी सरकारवरील जनतेचा विश्वास उडाला आहे. त्यात जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांची भाजपला साथ मिळाली तर देवेंद्र फडणवीस पुन्हा किंगमेकर ठरणार आहेत.


११ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत


भाजप - प्रवीण दरेकर, राम शिंदे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, प्रसाद लाड
काँग्रेस - चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप
राष्ट्रवादी काँग्रेस - रामराजे नाईक - निंबाळकर, एकनाथ खडसे
शिवसेना - सचिन आहीर, आमशा पाडवी

Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती