माणगावात सापडले आठ जिवंत गावठी बॉम्ब



  • पहाटेच्या सुमारास आदिवासी वाडीवर धाड




  • बॉम्बशोधक आणि नाशक पथकाची कारवाई




  • ब्रुनो श्वानाची महत्वपूर्ण कामगिरी




अलिबाग (वार्ताहार) : माणगाव तालुक्यातील पाणसई इथे पोलीसांनी केलेल्या कारवाईत ८ जिवंत बॉम्ब हस्तगत केले आहेत. पहाटे साडेचारच्या सुमारास करंजवाडी आदिवासी वाडीवर बॉम्बशोधक आणि नाशक पथकाने ही मोठी कारवाई केली.


पाणसई येथील करंजवाडी आदिवासी वाडीवर गावठी बॉम्ब असल्याची खबर पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार मध्यरात्रीपासूनच या भागात फिल्डींग लावण्यात आली. पहाटे साडेचार वाजता तिथे धाड टाकून ८ जिवंत गावठी बॉम्ब हस्तगत केले. हे बॉम्ब जमिनीत पुरून ठेवण्यात आले होते.


या कारवाईत ब्रुनो नावाच्या श्वानाने महत्वाची कामगिरी बजावली. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत म्हात्रे, सहायक पोलीस निरीक्षक जे. जे. भोईर, हेड कॉन्स्टेबल भूपेंद्र देसाई, संतोष राऊत, राहुल पाटील, शैलेश गोतावडे, जितेंद्र सातोडे यांनी या कारवाईत भाग घेतला.


डुक्कर किंवा तत्सम जंगली प्राण्यांची शिकार करण्यासाठी तसेच मासेमारी करण्यासाठी हे बॉम्ब तयार करण्यात आले होते अशी प्राथमिक माहिती हाती लागली आहे. हे आदिवासी स्वतःच असे बॉम्ब तयार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान या प्रकरणी पोलीसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. बाबुराव दगडू यादव आणि राम यशवंत वाघमारे अशी त्यांची नावे आहेत. माणगाव पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Comments
Add Comment

सिंधुदुर्गचे एआय मॉडेल राष्ट्रीय पातळीवर; नीती आयोग दोन दिवस करणार अभ्यास, पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती

सिंधुदुर्ग : देशातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणाली स्वीकारणारा जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा ओळखला

अरे बापरे! देशभरात २२ बनावट विद्यापीठे

यूजीसीकडून देशातील २२ बनावट विद्यापीठांची यादी जाहीर नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) देशातील २२ बनावट

वाढवण बंदरामध्ये हजारो स्थानिक तरुणांना मिळणार रोजगार, तरुणांसाठी 'जीपी रेटिंग प्री-सी ट्रेनिंग कोर्स' सुरू

पालघर : भारतातील १३ वे प्रमुख बंदर असलेल्या वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड मध्ये स्थानिक तरुणांना नोकरीची संधी

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे पुढील सरन्यायाधीश! चार दशकांहून अधिक अनुभव असणारे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या कार्याबद्दल सविस्तर जाणून घ्या...

नवी दिल्ली: देशाचे विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सरन्यायाधीश हा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन