घाटकोपर (वार्ताहर) : मुंबईत डोंगर पायथ्याशी राहणाऱ्या रहिवाशांवर दरडी कोसळण्याचा धोका कायम असल्याचे तुरळक पावसातही अधोरेखीत होत आहे. चार दिवसांपूर्वीच पालिकेच्या कुर्ला ‘एल’ विभागातील साकीनाका परिसरातील काजुपाडा येथे डोंगराचा काही भाग कोसळून एका घराचे नुकसान झाल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा चेंबूर येथील आरसीएफ भागातील भीम टेकडी परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास डोंगराचा काही भाग कोसळून त्यातील दगड एका घरावर पडून दोघेजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अशा धोक्याच्या ठिकाणच्या घरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वीच महापालिकेने डोंगर पायथ्याखाली धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना घरे खाली करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तुरळक पावसामुळे अशा घटना घडत असतील तर मोठ्या पावसात काय होईल? ही भीती रहिवाशांकडून व्यक्त होत आहे. साकीनाका आणि चेंबूरच्या दुर्घटनेत कोणतीही मोठी जीवितहानी झाली नसली तरी धोक्याची टांगती तलवार केवळ या भागातीलच नाही तर मुंबईभरातील धोकादायक घरांवर कायम असल्याचे अधोरेखीत झाले आहे.
दरम्यान, चेंबूर येथील आरसीएफ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भीम टेकडी, न्यू भारत नगर, आरसीएफ, वाशीनाका येथील टेकडीचा काही दगडी भाग एका घरावर कोसळला. त्यामुळे या झोपडीत मोठे दगड सरकत येवून अरविंद अशोक प्रजापती आणि आशिष अशोक प्रजापती हे दोघेजण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थं सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पालिका आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी जाऊन त्यांनी मदत केली. याबाबत आरसीएफ पोलिसांनी अपघाताची माहिती नोंदवली आहे. तपास अधिकारी म्हणून निरीक्षक विलास दातार हे काम पहात आहेत.
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…