तुरळक पावसातही दरड कोसळण्याचा धोका कायम

घाटकोपर (वार्ताहर) : मुंबईत डोंगर पायथ्याशी राहणाऱ्या रहिवाशांवर दरडी कोसळण्याचा धोका कायम असल्याचे तुरळक पावसातही अधोरेखीत होत आहे. चार दिवसांपूर्वीच पालिकेच्या कुर्ला ‘एल’ विभागातील साकीनाका परिसरातील काजुपाडा येथे डोंगराचा काही भाग कोसळून एका घराचे नुकसान झाल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा चेंबूर येथील आरसीएफ भागातील भीम टेकडी परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास डोंगराचा काही भाग कोसळून त्यातील दगड एका घरावर पडून दोघेजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अशा धोक्याच्या ठिकाणच्या घरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


पावसाळा सुरू होण्यापूर्वीच महापालिकेने डोंगर पायथ्याखाली धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना घरे खाली करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तुरळक पावसामुळे अशा घटना घडत असतील तर मोठ्या पावसात काय होईल? ही भीती रहिवाशांकडून व्यक्त होत आहे. साकीनाका आणि चेंबूरच्या दुर्घटनेत कोणतीही मोठी जीवितहानी झाली नसली तरी धोक्याची टांगती तलवार केवळ या भागातीलच नाही तर मुंबईभरातील धोकादायक घरांवर कायम असल्याचे अधोरेखीत झाले आहे.


दरम्यान, चेंबूर येथील आरसीएफ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भीम टेकडी, न्यू भारत नगर, आरसीएफ, वाशीनाका येथील टेकडीचा काही दगडी भाग एका घरावर कोसळला. त्यामुळे या झोपडीत मोठे दगड सरकत येवून अरविंद अशोक प्रजापती आणि आशिष अशोक प्रजापती हे दोघेजण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थं सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पालिका आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी जाऊन त्यांनी मदत केली. याबाबत आरसीएफ पोलिसांनी अपघाताची माहिती नोंदवली आहे. तपास अधिकारी म्हणून निरीक्षक विलास दातार हे काम पहात आहेत.

Comments
Add Comment

राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; जमीन मोजणीच्या शुल्कात मोठी कपात

मुंबई : राज्य सरकारने महसूल प्रशासन अधिक सशक्त करण्यासाठी अनेक बदल राबवले असून, आता शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा

'जिजामाता नगरवासियांच्या पुनर्वसनाचा विषय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडणार'

मुंबई :  मागील तीस वर्षांपासून काळाचौकी येथील जिजामाता नगरवासियांचे पुनर्वसन विकासकाच्या आडमुठेपणाच्या

चेंबूरमध्ये शिक्षणासाठी पाच किलोमीटर पायपीट

मराठी शाळेअभावी विद्यार्थ्यांचे हाल मुंबई : चेंबूर येथील वाशीनाका परिसरात पालिकेच्या मराठी माध्यमाची

मुंबईतील अनधिकृत झोपड्यांवर ‘नेत्रम’ची नजर

बांधकामाचे फोटो, बांधकाम करणाऱ्या व्यक्तीचे नाव अॅपवर समजणार मुंबई : मुंबईतील अनधिकृत झोपड्यांच्या समस्येवर

राज्यातील शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत कर्जमाफी!

परदेशी कमिटीचा अंतिम अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार मुंबई : कर्जमाफीबाबत राज्यातील

माहिम मोरी रोड शाळेच्या पुनर्विकासाच्या भूमिपुजनाचा लवकरच वाढणार नारळ

तब्बल सात वर्षांपासून बंद करण्यात आली शाळा, दोन वर्षांपासून आहे जमिनदोस्त मुंबई (विशेष प्रतिनिधी): माहिममधील