देवनार पशुवधगृहात प्रथमच ऑनलाइन परवानगी

  99

मुंबई (प्रतिनिधी) : आशिया खंडातील सर्वांत मोठे पशुवधगृह असणारे मुंबई महानगरपालिकेचे देवनार पशुवधगृह बकरी ईद सणानिमित्त सर्व सेवा-सुविधांसह सुसज्ज होत आहे. या पूर्वतयारीसह सेवा-सुविधांचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. यावेळी प्रथमच देवनार पशुवधगृहात म्हैसवर्गीय प्राणांच्या धार्मिक पशुवधासाठी ऑनलाइन पद्धतीने कत्तल वेळ आरक्षित करण्यासाठी सुविधा देण्यात येणार आहे. कोरोना प्रादुर्भाव होऊ नये, हे विचारात घेऊन ही उपाययोजना करण्यात येत आहे.


या बैठकीला महानगरपालिका उपायुक्त विश्वास शंकरवार, एम/पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त महेंद्र उबाळे, पोलीस, इतर संबंधित खाते प्रमुख तसेच देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक कलीमपाशा पठाण, अग्निशमन दल व वाहतूक पोलीस यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बकरी ईदनिमित्त मुंबई पालिकेच्या देवनार पशुवधगृहात जिवंत बकरे व म्हैसवर्गीय प्राण्यांच्या बाजारास परवानगी दिली जाते. यंदा हा सण १० जुलै २०२२ रोजी होणार आहे. यासाठी देवनार पशुवधगृहात २९ जून २०२२ सकाळी ६ वाजेपासून बकऱ्यांना व २८ जून २०२२ पासून म्हैसवर्गीय प्राण्यांना देवनार पशुवधगृहात प्रवेश दिला जाणार आहे.


दरम्यान बकरे व म्हैसवर्गीय प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी स्थायी स्वरूपातील निवास क्षमतेसह अतिरिक्त तात्पुरते निवारे उभारण्यात येणार आहेत.

तसेच संपूर्ण परिसर हा सीसीटीव्हीच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण ३६४ सीसीटीव्ही बसवणार आहेत. त्याचबरोबर प्राण्यांसाठी पाणी, चारा, प्राथमिक पशुवैद्यकीय आरोग्य केंद्रे यांची व्यवस्था करण्यात येत आहे. यावेळी नागरिकांच्या अडचणी सोडविणे व मदत करण्यासाठी २४ X ७ कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येत आहे.


देवनार पशुवधगृहात म्हैसवर्गीय प्राणांच्या धार्मिक पशुवधासाठी ऑनलाइन पद्धतीने कत्तल वेळ आरक्षित करण्यासाठी सुविधा प्रथमच देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांची गर्दी कमी होण्यास मदत होईल. ही उपाययोजना कोविड प्रादुर्भाव होऊ नये, हे विचारात घेऊन करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

सौर पंप शक्य नसल्यास पारंपरिक कृषी पंप देणार

भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घेणार मुंबई : राज्य शासनाने सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर भर दिला आहे.

वाहतूकदारांच्या संपात ७० हजार वाहने सहभागी

नागरिकांसह आयात-निर्यातदारांना संपाचा मोठा फटका मुंबई : ई-चलन व वाहतूकदारावर लाभलेल्या इतर अनेक अन्यायकारक

मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतरखान्यांमुळे श्वसन तसेच फुफ्फुसांचे आजार वाढले असून यात काही रहिवाशांचा

Nitesh Rane : “पिक्चर अभी बाकी हैं”, ‘तुम्हाला सांगून ठेवलेली उत्तर रेकॉर्ड करुन’ नंतर एकत्र…मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल

मुंबई : दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई

आरोग्यास अपायकारक तरीही मुंबई महापालिकेच्या हद्दीत ५१ कबुतरखाने पुन्हा सुरू

मनपाने मुंबईतील कबूतरखान्यांबाबत विशेष अभियान राबवावे – मंत्री उदय सामंत मुंबई : सध्या मुंबई महापालिकेच्या

शक्तीपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी : मंत्री नितेश राणे

मुंबई : शक्तीपीठ महामार्ग हा लोकांच्या विकासासाठी आहे. या प्रकल्पासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी मी पालकमंत्री