ईडी चौकशीमुळे काँग्रेस हैराण झालीय- व्ही.के. सिंग

  65

नागपूर (हिं.स.) : मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीच्या चौकशीमुळे काँग्रेस हैराण झाली आहे. त्यामुळेच केंद्र सरकारच्या प्रत्येक निर्णयात आणि योजनेसंदर्भात तरुणांना भडकवणे, हिंसेला चिथावणी देणे असले उद्योग करीत असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांनी रविवारी नागपुरात सांगितले.


केंद्र सरकारने सैन्य भरतीसाठी आणलेल्या ‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात काँग्रेसने नवी दिल्लीत सत्याग्रह सुरू केला आहे. यावेळी काँग्रेस नेत्या प्रियांका वड्रा यांनी ‘अग्निपथ’ योजनेवरून सरकारवर गंभीर आरोप केले. तसेच हे सरकार तरुणांचे नव्हे तर उद्योगपतींचे हित डोळ्यापुढे ठेवून काम करत असल्याची टीका देखील वाड्रा यांनी केली.


यापार्श्वभूमिवर ‘जन आक्रोश’ या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यक्रमासाठी नागपूर दौऱ्यावर असलेल्या व्ही.के. सिंग यांनी सांगितले की, काँग्रेस सध्या ईडीच्या तपासावर नाराज आहे. केंद्र सरकारच्या प्रत्येक योजनेनंतर त्यांची हतबलता दिसून येते. हिंसक निदर्शने आयोजित करणे, तरुणांची आणि सर्वसामान्यांची दिशाभूल करून सरकारच्या विरोधात आंदोलन करवून घेणे हे त्यांचे काम आहे. काँग्रेससह इतर विरोधी पक्ष केवळ सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्नात असतात.


सामान्य नागरिकांनी लष्करी प्रशिक्षण मिळाले पाहिजे ही फार जुनी मागणी आहे. लोकांनी एनसीसी ऐवजी थेट लष्कराकडून प्रशिक्षण मिळावे अशी मागणी होती. अग्निपथ योजना ही या मागणीची पूर्तता करते. लष्कर हे रोजगाराचे साधन नाही. ती कंपनी किंवा दुकान समजू नये. देशात १९६१ मध्ये इमर्जन्सी आयोग तयार करून देशात एक योजना सुरू करण्यात आली. ज्याअंतर्गत ३ महिन्यांचे प्रशिक्षण घेतल्यानंतर अनेक जण सैन्यात अधिकारी म्हणून रुजू झाले. पुढे १९६५ मध्ये त्या लोकांच्या सेवा संपल्या. या योजनेअंतर्गत सैन्यात भरती झालेल्या लोकांना पेन्शन दिली जात नव्हती. त्यानंतर देशात ५ वर्षांचा शॉर्ट सर्व्हिस कमिशनही सुरू करण्यात आले होते. काँग्रेस आणि विरोधी पक्ष अशा जुन्या तथ्यांकडे दुर्लक्ष करून केवळ 'अग्निपथ' योजनेच्या विरोधात संभ्रम पसरवण्यात मग्न असल्याचा दावा व्ही. के. सिंग यांनी केला.


देशात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे २ व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये आंदोलक कोणत्या मुद्द्यावर रस्त्यावर आले आहेत हे कळत नसल्याचे संवादातून कळते. त्यामुळे या तरुणांना भडकावले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. आंदोलक तरुणांबाबत व्ही के सिंग यांनी स्पष्ट केले की, लष्कर हे रोजगार बोर्ड नाही. प्रवेशासाठी तुमची पात्रता सिद्ध करावी लागेल. जे निकष पूर्ण करतात, त्यांना सैन्यात भरती केले जाते. निकषांची पूर्तता केल्याशिवाय, सैन्यात भरती होणे शक्य नाही. त्यामुळे अग्निपथ योजनेला थेट रोजगाराशी कसे जोडता येईल..? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Comments
Add Comment

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित

प्रसाद ओक यांना निळू फुले कृतज्ञता सन्मान जाहीर

पुणे : निळू फुले यांचे कुटुंबीय व बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या वतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणारा निळू फुले