मुंबई विजयाच्या उंबरठ्यावर

बंगळूरु (वृत्तसंस्था) : यशस्वी जयस्वाल (१८१ धावा) आणि अरमान जाफर (१२७ धावा) या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या मोठ्या भागीदारीच्या जोरावर मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातील दुसऱ्या डावात ६६२ धावांची डोंगराएवढी आघाडी घेतली आहे. त्यामुळे मुंबईचा विजय जवळपास निश्चित मानला जात असून तसे झाल्यास मुंबई अंतिम फेरीत प्रवेश करेल.


अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक वेळा विजेतेपद उंचावलेल्या मुंबईने यंदा आपला धमाका कायम ठेवला. उत्तर प्रदेश विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्याच्या चौथ्या दिवशी यशस्वी जयस्वाल आणि अरमान जाफर या जोडीने कमालीची फलंदाजी केली. जयस्वालने १८१ धावांची मॅरेथॉन खेळी खेळली. त्याला अरमान जाफरने चांगली साथ दिली. जाफरने १२७ धावांची खेळी खेळली. मुंबईने चौथ्या दिवसाअखेर ४ फलंदाजांच्या बदल्यात ४४९ धावांपर्यंत मजल मारली. मुंबईने ६६२ धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात उत्तर प्रदेशचा प्रिंस यादव बळी मिळवण्यात यशस्वी ठरला. त्याने दोन बळी मिळवले. शिवम मावी आणि सौरभ कुमार यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.


दरम्यान मुंबईने उत्तर प्रदेशला पहिल्या डावात १८० धावांवर सर्वबाद केले. तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, तनुष कोटीयन या मुंबईच्या त्रिकुटाने उत्तर प्रदेशच्या फलंदाजीचा कणाच मोडला. या तिघांनीही प्रत्येकी ३ फलंदाज बाद करत उत्तर प्रदेशला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. धवल कुलकर्णीने एक बळी मिळवला. त्यामुळे उत्तर प्रदेशचा पहिला डाव अवघ्या १८० धावांवर आटोपला होता.


तत्पूर्वी पहिल्या डावातही मुंबईची फलंदाजी बहरली. यशस्वी जयस्वालने पहिल्या डावातही शतकी कामगिरी केली होती, तर हार्दिक तामोरेनेही शतक झळकावले होते.

Comments
Add Comment

आश्चर्यकारक! एकदिवसीय सामन्याची तिकीटं आठ मिनिटांत फूल, विराट अन् रोहितची क्रेझ

मुंबई: भारतातील क्रिकेट विश्व सध्या चर्चेत आहे. केवळ पुरुष नाही तर भारतीय महिला संघाचेसुद्धा सर्वत्र कौतुक सुरू

नववर्षाच्या सुरुवातीला भारतीय महिला संघाने घेतले बाबा महाकाल दर्शन

२०२५ च्या अखेरीस धमाका करणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या स्टार खेळाडूंनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला बाबा

India Cricket 2026 Schedule : ठरलं! २०२६ मध्ये टीम इंडियाला श्वास घ्यायलाही वेळ नाही! वर्ल्ड कपसह रोमांचक मालिकांचा गच्च कार्यक्रम, पाहा टीम इंडियाचे संपूर्ण शेड्युल!

मुंबई : क्रिकेट विश्वासाठी २०२५ हे वर्ष ऐतिहासिक ठरले. भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले, तर विराट

आयसीसी क्रमवारीत भारतीय महिलांचा डंका

शफाली, रेणुकाची झेप; दीप्तीचा 'नंबर १' कायम नवी दिल्ली: आयसीसीच्या ताज्या महिला टी-२० क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी

विराटसाठी २८ हजार धावांचा टप्पा हाकेच्या अंतरावर

सचिन-संगकाराच्या क्लबमध्ये एन्ट्रीसाठी २५ धावांची गरज मुंबई : भारतीय क्रिकेटचा 'किंग' विराट कोहली पुन्हा एकदा

भारताचे मिशन ‘क्लीन स्वीप’ यशस्वी

हरमनप्रीतच्या ६८ धावा; मालिका ५-० ने खिशात तिरुवनंतपुरम : भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२०