राष्ट्रपतीपदासाठी ११ उमेदवारी अर्ज दाखल

नवी दिल्ली (हिं.स.) : भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीए आणि विरोधक राष्ट्रपती पदासाठी उमेदवाराचा शोध घेत असतानाच देशातील ११ जणांनी या पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी बहुतांश हौशी उमेदवार असल्याची चर्चा आहे.


राष्ट्रपती पदासाठी आतापर्यंत १. डॉ. के. पद्मराजन, सीलम, तामिळनाडू, २. जीवन कुमार मित्तल, दिल्ली, ३. मोहम्मद ए हामिद पटेल, मुंबई, ४. सायरा बानो मोहम्मद पटेल, मुंबई, ५. टी. रमेश, नमक्कल, तामिळनाडू, ६. श्याम नंदन प्रसाद, मोकामा, बिहार, ७. प्रा. दयाशंकर अग्रवाल, दिल्ली, ८. ओम प्रकाश खरबंदा, दिल्ली, ९. लालू प्रसाद यादव, बिहार, १०. ए. मणिथन, तामिळनाडू, ११. डॉ. मंदती तिरुपती रेड्डी, आंध्र प्रदेश या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यातील लालू प्रसाद यादव हे बिहारचे असले तरी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख नाहीत. यादीतील काही उमेदवारांची विविध कारणांनी चर्चा होत असते. यातील एका उमेदवाराचे नाव लिम्का बुक ऑफ रेकोर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे.


तामिळनाडूमधील डॉ. के. पद्मराजन हे होमिओपॅथिक डॉक्टर असून व्यावसायिक आहेत. त्यांचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. मात्र, हे नाव 'सर्वाधिक अपयशी' उमेदवार म्हणून नोंदवण्यात आले आहे.


राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एका दाम्पत्याने अर्ज दाखल केला आहे. मोहम्मद ए हामिद पटेल आणि सायरा बानो मोहम्मद पटेल असे या दाम्पत्याचे नाव असून ते मुंबईतील आहेत. या दाम्पत्याने यापूर्वी २०१७ मध्ये देखील निवडणूक अर्ज दाखल केला होता. यावेळेस त्यांनी पुन्हा एकदा अर्ज दाखल केला आहे.


दिल्लीतून तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, त्यात उद्योगपती जीवन कुमार मित्तल यांच्या नावाचा समावेश आहे. जीवन कुमार मित्तल यांनी आतापर्यंत राष्ट्रपतींना ५ हजारांहून अधिक पत्रे लिहिली आहेत. याच कारणामुळे ते प्रसिद्धही आहेत. वर्ष २०१२ आणि २०१७ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही त्यांनी उमेदवारी दाखल केली होती. आता तिसऱ्यांदा ते निवडणूक रिंगणात उतरले आहेत.


राष्ट्रपती पदासाठी बुधवारी अर्ज दाखल केलेल्या ११ उमेदवारांपैकी एका उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात आला. उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये चूक झाल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवाराला सूचक आणि अनुमोदक म्हणून प्रत्येकी ५० आमदार, खासदारांची स्वाक्षरी हवी असते. त्यामुळे छाननीमध्ये या सर्वांचे अर्ज बाद होण्याची दाट शक्यता आहे.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च