मेट्रो कारशेडच्या जमिनीवरील खाजगी मालकी हायकोर्टाने फेटाळली

मुंबई (हिं.स.) : कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या वादात मुंबई उच्च न्यायालयाने आदर्श वॉटर पार्क ॲण्ड रिसॉर्ट या खाजगी कंपनीचा मालकी हक्क फेटाळला आहे. त्यामुळे राज्य सरकारला तूर्तास दिलासा मिळाला आहे. मात्र अजूनही इतरांच्या मालकी हक्काचा वाद प्रलंबित आहे. मेट्रो कारशेडच्या जमिनीच्या मालकी हक्कावरून निर्माण झालेला मूळ वाद राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात असून तो मिटणे आवश्यक आहे. उपरोक्त वादावर दोन्ही पक्षांकडून मंगळवारी युक्तिवाद पूर्ण झाला आणि त्यानंतर आज (बुधवारी) न्यायालयाने संबंधित खाजगी कंपनीचा मालकी हक्क फेटाळून लावला.


कांजूरमार्ग येथील प्रस्तावित मेट्रो कारशेड येथील जमीन आपल्या मालकीची असल्याचा दावा आदर्श वॉटर पार्कने केला होता. त्या विरोधात राज्य सरकारने न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर आज सुनावणी करताना न्यायालयाने आदर्श वॉटर पार्कचा दावा फेटाळला. आदर्श वॉटर पार्कने चुकीच्या पद्धतीने जमीन (फ्रॉड करून) घेतल्याचे न्यायालयाने मान्य केले. तसेच आदर्श वॉटर पार्कचे मालकी हक्क रद्द केले आहेत.


त्यामुळे आता आता मालकी हक्काबाबत राज्य सरकार, गरोडीया कंपनी आणि केंद्र सरकार या तिघांमध्ये वाद आहे. त्यावर पुढे युक्तिवाद सुरू राहिल. मात्र, ज्या कारणामुळे न्यायालयाने मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आहे ती स्थगिती उठण्यासाठी आधी राज्य सरकार, केंद्र सरकार यांच्यातील मालकी हक्कचा वाद मिटणे आवश्यक आहे. आता आदर्श वॉटर पार्कचा मालकी हक्क रद्द न्यायालयाने रद्द केल्यामुळे मेट्रो कारशेडच्या कामातील एक अडथळा दूर झाला आहे.

Comments
Add Comment

मध्य, पश्चिम रेल्वेवर आज मेगाब्लॉक

देखभालीच्या कामांमुळे मार्गात बदल मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल

महापालिकेच्या ४२६ घरांची लॉटरी सोडत जाहीर, आणखी २९६ सदनिकांसाठी काढणार लॉटरी

एकूण ४२६ पैकी ३७३ अर्जदारांना लागली घरांची लॉटरी मुंबई : मुंबई महानगरपालिकेतर्फे विकास नियंत्रण व प्रोत्साहन

अखेर मुलुंड अगरवाल रुग्णालय लोकांसाठी होणार खुले

रविवारी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या लोकार्पण मुंबई : मुंबई महानगरपालिका संचालित मनसादेवी तुलसीराम

मुलुंडमध्ये आता देश विदेशातील पक्ष्यांचे घडणार दर्शन

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पक्षी उद्यानाचे भूमिपुजन मुंबई : मुंबईच्या उपनगरीय भागात

रडार स्थलांतराला केंद्राची संमती; दहिसर-जुहू परिसरातील पुनर्विकासाला मिळणार गती

मुंबई : दहिसर आणि जुहू (डी.एन.नगर) येथील उच्च वारंवारता रडार केंद्रांमुळे रखडलेला पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी

दहिसर–जुहू रडार स्थलांतर आणि Housing for All; मुख्यमंत्री फडणवीसांकडे महत्त्वाचं निवेदन

मुंबई : मुंबईतील तील रखडलेल्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी ‘Housing for All’ अंतर्गत नवीन धोरण मांडण्यात आले आहे. फनेल