जम्मू-काश्मीर शोपियानमध्ये दोन दहशतवादी ठार

Share

श्रीनगर (हिं.स.) : जम्मू-काश्मीरमधील शोपियानमधील कांजिलूर भागात बुधवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत लश्कर-ए-तोयबा या प्रतिबंधित जिहादी दहशतवादी संघटनेचे २ दहशतवादी मारले गेले.

पोलिसांनी दावा केला आहे की या चकमकीत ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांमध्ये इलाका-ए-देहाती बँकेचे व्यवस्थापक राजस्थानचे रहिवासी विजय कुमार यांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याचा समावेश आहे. जान मोहम्मद लोन असे मारल्या गेलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. तर चकमकीत ठार झालेल्या दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव तुफैल गनई आहे. पोलिसांनी दोन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत.

चकमकीच्या ठिकाणाहून मोठा शस्त्रसाठा आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे. सध्या परिसरात आणखी दहशतवादी असल्याच्या पार्श्वभूमीवर शोधमोहीम सुरू आहे. या भागात आणखी दहशतवादी नसल्याची खात्री झाल्यानंतर, ऑपरेशन मागे घेण्यात येईल. या चकमकीनंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी ट्विट करत दोन दहशतवादी ठार केल्याची माहिती दिलीय. यासंदर्भात राज्याचे पोलिस महासंचालक विजयकुमार म्हणाले की, चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एकाचे नाव शोपियान येथील जान मोहम्मद लोन असे आहे. अलीकडेच कुलगाम जिल्ह्यात २ जून रोजी बँक मॅनेजर विजय कुमार यांच्या हत्येसह इतर दहशतवादी गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता.

जिल्ह्याच्या बाहेरील बेमिना येथे सोमवारी रात्री उशिरा सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत पाकिस्तानी कमांडर अब्दुल्ला गोजरी आणि लश्कर-ए-तोयबाचा स्थानिक कमांडर मुसैब यांच्यासह दोन दहशतवादी ठार झाले. यादरम्यान एक पोलीस कर्मचारीही गंभीर जखमी झाला. मारले गेलेले दोन्ही दहशतवादी अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्यासाठी गेल्या महिन्यात काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या लश्कर-ए-तोयबाच्या तीन सदस्यीय आत्मघातकी पथकाचा भाग होते. या पथकातील हंजला हा पाकिस्तानी दहशतवादी ६ जून रोजी सोपोरमधील जालुरा येथे चकमकीत ठार झाला होता.

Recent Posts

Team india: बीसीसीआयकडून टीम इंडियाला १२५ कोटींचे बक्षीस

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या…

7 hours ago

Indian player: विश्वविजेत्या संघातील मुंबईकर खेळाडूंसाठी शिंदे सरकारकडून बक्षीस जाहीर

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…

7 hours ago

Shubh: शुभ काम करण्याआधी का खातात दही-साखर, हे खरंच शुभ असतं का?

मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…

8 hours ago

नूतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अखेर १२ वर्षानंतर कार्यान्वीत

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई…

8 hours ago

Video: मरीन ड्राईव्हवर गर्दीत अडकली अ‍ॅम्ब्युलन्स, चाहत्यांनी असा दिला रस्ता

मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप…

9 hours ago

Team India Victory Parade: टी-२० चॅम्पियन्सचे मुंबईत ग्रँड वेलकम, मरिन ड्राईव्हवर चाहत्यांची गर्दी

मुंबई: टीम इंडिया(team india) विक्ट्री परेडसाठी मुंबईत पोहोचले आहेत. भारतीय संघाचे मुंबई एअरपोर्टवर दिमाखात स्वागत…

10 hours ago