जम्मू-काश्मीर शोपियानमध्ये दोन दहशतवादी ठार

श्रीनगर (हिं.स.) : जम्मू-काश्मीरमधील शोपियानमधील कांजिलूर भागात बुधवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत लश्कर-ए-तोयबा या प्रतिबंधित जिहादी दहशतवादी संघटनेचे २ दहशतवादी मारले गेले.


पोलिसांनी दावा केला आहे की या चकमकीत ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांमध्ये इलाका-ए-देहाती बँकेचे व्यवस्थापक राजस्थानचे रहिवासी विजय कुमार यांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याचा समावेश आहे. जान मोहम्मद लोन असे मारल्या गेलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. तर चकमकीत ठार झालेल्या दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव तुफैल गनई आहे. पोलिसांनी दोन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत.


चकमकीच्या ठिकाणाहून मोठा शस्त्रसाठा आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे. सध्या परिसरात आणखी दहशतवादी असल्याच्या पार्श्वभूमीवर शोधमोहीम सुरू आहे. या भागात आणखी दहशतवादी नसल्याची खात्री झाल्यानंतर, ऑपरेशन मागे घेण्यात येईल. या चकमकीनंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी ट्विट करत दोन दहशतवादी ठार केल्याची माहिती दिलीय. यासंदर्भात राज्याचे पोलिस महासंचालक विजयकुमार म्हणाले की, चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एकाचे नाव शोपियान येथील जान मोहम्मद लोन असे आहे. अलीकडेच कुलगाम जिल्ह्यात २ जून रोजी बँक मॅनेजर विजय कुमार यांच्या हत्येसह इतर दहशतवादी गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता.


जिल्ह्याच्या बाहेरील बेमिना येथे सोमवारी रात्री उशिरा सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत पाकिस्तानी कमांडर अब्दुल्ला गोजरी आणि लश्कर-ए-तोयबाचा स्थानिक कमांडर मुसैब यांच्यासह दोन दहशतवादी ठार झाले. यादरम्यान एक पोलीस कर्मचारीही गंभीर जखमी झाला. मारले गेलेले दोन्ही दहशतवादी अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्यासाठी गेल्या महिन्यात काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या लश्कर-ए-तोयबाच्या तीन सदस्यीय आत्मघातकी पथकाचा भाग होते. या पथकातील हंजला हा पाकिस्तानी दहशतवादी ६ जून रोजी सोपोरमधील जालुरा येथे चकमकीत ठार झाला होता.

Comments
Add Comment

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या