मोदी १३० करोड जनतेच्या स्वप्नाचे सामर्थ्य असलेला नेता

ठाणे (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा १३० करोड जनतेचा स्वप्नाचे सामर्थ्य असलेला नेता आहे. नरेंद्र मोदी यांनी गेल्या ८ वर्षात जी कामे केली ती आधीचे सरकार करू शकले नाही. त्यामुळे ८ वर्षानंतर नागरिकांच्या डोळ्यात मोदींबद्दल आत्मविश्वास पाहायला मिळतो, असे गौरवोद्गार केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी ठाण्यात आयोजित ओबीसी कल्याण संमेलनात ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधानपद व केंद्र सरकारला आठ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण अंतर्गत भारतीय जनता पार्टी ओबोसी मोर्चा ठाणे शहर यांच्या वतीने ओबीसी कल्याण संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यानिमित्त ओबीसीसाठी काम करणाऱ्या विविध मान्यवर व संस्थांचा सन्मान सोहळा ठाण्यातील कळवा येथील सायबा हॉल येथे आयोजित करण्यात आला होता.


या कार्यक्रमाला केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील, आमदार संजय केळकर, भाजप ठाणे शहर अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, प्रदेश सचिव संदीप लेले, प्रदेश उपाध्यक्ष माधवी नाईक, भाजप ओबोसी मोर्चा ठाणे शहर अध्यक्ष सचिन केदारी, महिला अध्यक्ष नयना भोईर, नगरसेवक संजय वाघुले, नगरसेविका नम्रता कोळी, दीपा गावंड,अर्चना मणेरा, ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव हरिश्चंद्र भोईर, जिल्हा सरचिटणीस कैलास म्हात्रे, माजी उपमहापौर अशोक भॊईर, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन भाजप ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष सचिन केदारी यांनी केले होते.

Comments
Add Comment

भिवंडीत श्वानदंश झालेल्या मुलाचा मृत्यू

भिवंडी : श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय हमीद खान याचा उपचारादरम्यान मृत्यूची घटना भिवंडीत घडली आहे. १० जानेवारीला

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या

ठाणे-घोडबंदर रोडचे रुंदीकरण होणार?

मीरा-भाईंदर (वार्ताहर): ठाणे-घोडबंदर रस्ता ६० मीटर रुंद करण्यासाठी आवश्यक असणारी भूसंपादनाची प्रक्रिया

कोयना प्रकल्पग्रस्त सुविधांपासून वंचित

ठाणे ( प्रतिनिधी): साडेसहा दशकांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पात बाधित झालेल्या सुमारे ८०हून अधिक

ठाणे शहरात उभारणार १९ ई-वाहन चार्जिंग स्टेशन्स

ठाणे (प्रतिनिधी) : महापालिका क्षेत्रातील इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहरात ई-वाहन वापराला

सायबर दृष्टी सेलचा डिजिटल साक्षरता प्रवास

कल्याण (प्रतिनिधी) : बी. के. बिर्ला नाईट कॉलेज, कल्याण येथील सायबर दृष्टी सेल यांच्या विद्यमाने नागरिकांमध्ये