मोदी १३० करोड जनतेच्या स्वप्नाचे सामर्थ्य असलेला नेता

ठाणे (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा १३० करोड जनतेचा स्वप्नाचे सामर्थ्य असलेला नेता आहे. नरेंद्र मोदी यांनी गेल्या ८ वर्षात जी कामे केली ती आधीचे सरकार करू शकले नाही. त्यामुळे ८ वर्षानंतर नागरिकांच्या डोळ्यात मोदींबद्दल आत्मविश्वास पाहायला मिळतो, असे गौरवोद्गार केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी ठाण्यात आयोजित ओबीसी कल्याण संमेलनात ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधानपद व केंद्र सरकारला आठ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण अंतर्गत भारतीय जनता पार्टी ओबोसी मोर्चा ठाणे शहर यांच्या वतीने ओबीसी कल्याण संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यानिमित्त ओबीसीसाठी काम करणाऱ्या विविध मान्यवर व संस्थांचा सन्मान सोहळा ठाण्यातील कळवा येथील सायबा हॉल येथे आयोजित करण्यात आला होता.


या कार्यक्रमाला केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील, आमदार संजय केळकर, भाजप ठाणे शहर अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, प्रदेश सचिव संदीप लेले, प्रदेश उपाध्यक्ष माधवी नाईक, भाजप ओबोसी मोर्चा ठाणे शहर अध्यक्ष सचिन केदारी, महिला अध्यक्ष नयना भोईर, नगरसेवक संजय वाघुले, नगरसेविका नम्रता कोळी, दीपा गावंड,अर्चना मणेरा, ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव हरिश्चंद्र भोईर, जिल्हा सरचिटणीस कैलास म्हात्रे, माजी उपमहापौर अशोक भॊईर, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन भाजप ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष सचिन केदारी यांनी केले होते.

Comments
Add Comment

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा पुन्हा हल्ला; ७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, परिसरात संताप

कल्याण : काही दिवसांपूर्वीच कुत्र्याच्या चाव्यानंतर भीतीतून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती.

भटका कुत्रा चावला अन् तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

कल्याण : दहशतवादी संघटनांप्रमाणेच आता भटक्या कुत्रांचीही दहशत अनेक शहरात वाऱ्यासारखी परसरत आहेत. अनेक

ठाणाच्या नगरसेवकांचा वेगळाच थाट; ठाणे महापालिकेच्या दारात सजल्या आलिशान गाड्या

ठाणे : कार एक्स्पो नव्हे तर ठाण्याच्या महानगरपालिका मुख्यालयाच अंगण आलिशान गाड्यांनी व्यापून गेलं होत. निमित्त

डोंबिवलीत जलवाहिनी फुटली, हजारो लीटर पाण्याची नासाडी

डोंबिवली : डोंबिवलीत जेसीबीचा धक्का लागल्यामुळे जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाण्याची

Thane Municipal Corporation : ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये ठाणे महापालिकेने पटकाविला तिसरा क्रमांक

ठाणे : राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरण बदल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’

Ravindra Chavan : भिवंडी पालिकेत बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई करणार : रवींद्र चव्हाण

काँग्रेसच्या सहकार्याने भाजपचे बंडखोर महापौर पदी मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत