मोदी १३० करोड जनतेच्या स्वप्नाचे सामर्थ्य असलेला नेता

  79

ठाणे (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा १३० करोड जनतेचा स्वप्नाचे सामर्थ्य असलेला नेता आहे. नरेंद्र मोदी यांनी गेल्या ८ वर्षात जी कामे केली ती आधीचे सरकार करू शकले नाही. त्यामुळे ८ वर्षानंतर नागरिकांच्या डोळ्यात मोदींबद्दल आत्मविश्वास पाहायला मिळतो, असे गौरवोद्गार केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी ठाण्यात आयोजित ओबीसी कल्याण संमेलनात ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधानपद व केंद्र सरकारला आठ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण अंतर्गत भारतीय जनता पार्टी ओबोसी मोर्चा ठाणे शहर यांच्या वतीने ओबीसी कल्याण संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यानिमित्त ओबीसीसाठी काम करणाऱ्या विविध मान्यवर व संस्थांचा सन्मान सोहळा ठाण्यातील कळवा येथील सायबा हॉल येथे आयोजित करण्यात आला होता.


या कार्यक्रमाला केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील, आमदार संजय केळकर, भाजप ठाणे शहर अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, प्रदेश सचिव संदीप लेले, प्रदेश उपाध्यक्ष माधवी नाईक, भाजप ओबोसी मोर्चा ठाणे शहर अध्यक्ष सचिन केदारी, महिला अध्यक्ष नयना भोईर, नगरसेवक संजय वाघुले, नगरसेविका नम्रता कोळी, दीपा गावंड,अर्चना मणेरा, ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव हरिश्चंद्र भोईर, जिल्हा सरचिटणीस कैलास म्हात्रे, माजी उपमहापौर अशोक भॊईर, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन भाजप ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष सचिन केदारी यांनी केले होते.

Comments
Add Comment

आनंदाची बातमी शिळफाटा-कल्याण ते रांजनोली वाहतूककोंडी सुटणार

ठाणे : शिळफाटा-कल्याण ते रांजनोली या पट्ट्यात वाहतूक कोंडी ही रोजची समस्या झाली आहे. यावर उपाय करण्यासाठी

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पावसामुळे ठाण्यात ४ महिन्यांत २० जणांचा बळी!

ठाणे: गेल्या चार महिन्यांत ठाणे जिल्ह्यात पावसामुळे संबंधित घटनांमध्ये किमान २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या