मुंगूस पाळणाऱ्यावर वनविभागाकडून कारवाई

डोंबिवली : मुगुंस दिसल्यास दिवस शुभ जातो. धनप्राप्ती होते अशी अंधश्रध्दा आहे. याच अंधश्रद्धेतून डोंबिवलीकराने चक्क घरात पिंजरा ठेऊन त्यात चार मुंगूस पाळल्याची घटना उघडकीस आली आहे. या संदर्भात वन खात्याला माहिती मिळताच वनविभगाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी जाऊन पिंजऱ्यातून चार मुंगुसांची सुटका करत मुंगूस पाळणाऱ्या विठ्ठल जोशी यांच्या विरोधात कारवाई केली.


आजपर्यंत कासव शुभ असल्याचा समज असल्याने अनेकांनी घरात कासव पाळल्याचे अनेकदा ऐकले असेल. स्टार प्रजातीचे कासव पाळणे गुन्हा असून अनेकदा यावर कारवाई देखील करण्यात आली आहे. मुंगूस हा शुभ प्राणी मानला जातो. त्यामुळे काही अंधश्रद्धाळू नियम व कायदा धाब्यावर बसवून मुंगूस पाळून आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.


पश्चिम डोंबिवलीतल्या शास्त्रीनगर अर्थात जुनी डोंबिवली परिसरात गणेश स्मृती इमारतीमध्ये विठ्ठल जोशी हे आपल्या कुटुंबासह राहतात. मुंगूसचा चेहरा रोज सकाळी पाहिल्यावर दिवस चांगला जातो. तसेच धनप्राप्ती देखिल होते असा विठ्ठल जोशी यांचा समज होता. या भोळ्या समजूतीतून विठ्ठल यांनी चक्क मुंगूस पाळण्याचा निर्णय घेतला. एका जंगलातून चार मुंगूस पकडून आणून त्यांनी आपल्या घरात ठेवले.


हे चारही मुंगूस पिंज-यात ठेवण्यात आले होते. याची खबर कल्याण वनविभागाच्या पथकाला माहिती मिळाली. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ कायद्यांतर्गत मुंगूस पाळणे हा गुन्हा आहे. वनविभागाच्या पथकाने तत्काळ विठ्ठल जोशी यांच्या घरी छापा टाकून पिंजऱ्यात बंदिस्त असलेले हे चार मुंगूस ताब्यात घेतले. या प्रकरणी वन विभागाने विठ्ठल जोशी यांच्या विरोधात कारवाई केली आहे. कायद्याने बंदी असलेले वन्यजीवांपैकी पशू-पक्षी पाळू नये असे आवाहन वन अधिकारी एम. डी. जाधव यांनी केले आहे.

Comments
Add Comment

भिवंडीत श्वानदंश झालेल्या मुलाचा मृत्यू

भिवंडी : श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय हमीद खान याचा उपचारादरम्यान मृत्यूची घटना भिवंडीत घडली आहे. १० जानेवारीला

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या

ठाणे-घोडबंदर रोडचे रुंदीकरण होणार?

मीरा-भाईंदर (वार्ताहर): ठाणे-घोडबंदर रस्ता ६० मीटर रुंद करण्यासाठी आवश्यक असणारी भूसंपादनाची प्रक्रिया

कोयना प्रकल्पग्रस्त सुविधांपासून वंचित

ठाणे ( प्रतिनिधी): साडेसहा दशकांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पात बाधित झालेल्या सुमारे ८०हून अधिक

ठाणे शहरात उभारणार १९ ई-वाहन चार्जिंग स्टेशन्स

ठाणे (प्रतिनिधी) : महापालिका क्षेत्रातील इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहरात ई-वाहन वापराला

सायबर दृष्टी सेलचा डिजिटल साक्षरता प्रवास

कल्याण (प्रतिनिधी) : बी. के. बिर्ला नाईट कॉलेज, कल्याण येथील सायबर दृष्टी सेल यांच्या विद्यमाने नागरिकांमध्ये