स्वामीकृपेने तब्येत बरी झाली

Share

विलास खानोलकर

नारायण परशुराम सोलापूरकर हे व्यवसायाने वकील होते. श्री स्वामी समर्थ त्यास गणपती म्हणून हाका मारीत. श्री स्वामी समर्थ चरणी त्यांची निष्ठा होती. त्यांना मूळव्याधीचा आजार झाला. पुष्कळ वैद्य-डॉक्टर झाले, पण गुण येईना. एकदा नाइलाजास्तव त्यांनी डॉक्टरांकडून मूळव्याधीचे मोड कापले. त्यामुळे रक्तस्त्राव होऊ लागला. या दुखण्याने ते पूर्वीपेक्षाही अधिक बेजार झाले. दिवसेंदिवस त्यास जास्त अशक्तपणा येऊ लागला. घरातल्या घरातही त्यांना फिरवेना. तेव्हा त्यांनी ही सर्व हकिकत अक्कलकोटात असलेल्या मोरोपंत सेवेकार्यास लिहून कळविली. त्यास श्री स्वामी समर्थ महाराजांस त्यावर औषध विचारावे, असेही लिहिले. त्याप्रमाणे मोरोपंतांनी श्री स्वामींस विचारले असता, रोज थोडे गोमूत्र घ्यावे म्हणजे व्याधी जाईल असे सांगितले. त्याप्रमाणे नारायणरावांनी उपचार करताच ते निखालस बरे झाले. नंतर स्वामींनी स्वप्नात येऊन आशीर्वाद दिला.

स्वामी नारायणाच्या स्वप्नमंदिरी
भव्य कपाळ मुकुटशिरी ।। १।।
कमंडलू त्रिशूळ डमरु करी
गाय मागे उभी हंभरी ।। २।।
स्वामी म्हणे दत्तनाम पवित्र
दत्ताची गाय अति पवित्र ।। ३।।
पोटातील ३३ कोटी देव पवित्र
गोमातेचे गोमुत्रही पवित्र ।। ४।।
घे गोमुत्र मानुनी गंगातीर्थ
सारे शरीर रोगमुक्त पावनतीर्थ ।।५।।
पहाटे आले भरुनी ऊरी
आशीर्वाद दिला उजवा करी।। ६।।
आयुष्यात कमी पडले काही जरी
स्वामीनाम घेता इच्छा होईल पुरी।।७।।
गरिबाला मिळेल आमरस पुरी
विद्यार्थ्याची प्रगती
आकाशा परी।। ८।।
गृहिणीला प्राप्त सुवर्ण अलंकार
निपुत्रीकाला सुंदर पुत्र अलंकार।।९।।
अपंगाला लाभेल शक्ती
विद्वानाला लाभेल युक्ती ।। १०।।
कन्या लाभेल गुणी भ्रतार
शेतकऱ्याचे भरेल
धान्यकोठार ।।११।।
कार्य करता नाम घ्या स्वामी
स्वामींची दृष्टी अति दूरगामी ।।१२।।
श्रीकृष्णार्पण करा सारी कामे
ब्रह्मदेवाचरणी लीन सारी
कामे ।।१३।।
निस्वार्थ बुद्धीने करा काम
दिवसभर गाळा भरपूर घाम ।।१४।।
सारे काम होईल तमाम
कार्यसुगंध पसरेल हमाम ।। १५।।
करा नामाचा प्रचार आजन्म
कीर्ती पसरेल १०० जन्म ।। १६।।
जन्मता आणले नाही काही
जातानाही नेणार नाही काही।। १७।।
गळ्यात तुळशी माळा
मुखी विष्णू नाम बाळा ।। १८।।
कष्टांच्या लागणार नाही कळा
स्वामींनाच आहे तुमचा
कळवळा ।।१९।।
निर्गुण सगुण प्रेमळ स्वामी
भिऊ नको पाठीशी आहेत
स्वामी ।।२०।।

vilaskhanolkardo@gmail.com

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

8 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

9 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

9 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

10 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

11 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

11 hours ago