इंग्रजी माध्यमामील २५ टक्के विद्यार्थ्यांचा मराठी शाळेत प्रवेश

  139

प्रशांत जोशी


डोंबिवली : इंग्रजी माध्यम शाळा पसंतीमुळे मराठी माध्यम शाळा दुर्लक्षित झाल्या. जागतिकीकरण व सध्याची गरज तसेच मुलांना इंग्रजीमुळे अडचण निर्माण होऊ नये असा पालकांचा यामागे व्होरा होता. पण कोरोना महामारीमुळे आर्थिक डबघाई व बेकारीमुळे हा महागडा शैक्षणिक खर्च पालकांना अशक्य होत गेला. परिणामी पालकांनी पुन्हा कमी खर्चीक आणि दर्जेदार मराठी माध्यमातील सेमी इंग्रजी पर्याय शोधला. यामुळेच २५ टक्के पूर्वीच्या इंग्रजी माध्यम असलेल्या विद्यार्थ्यांनी मराठी शाळेत प्रवेश घेतला. या बदलामुळे मराठी माध्यम शाळा संस्था चालकांना पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत.


सामान्य पालकांनी इंग्रजी माध्यम शाळेला पसंती दिली आणि यामुळे मराठी माध्यमाच्या दर्जेदार शाळा विद्यार्थी मिळत नसल्याने ओस पडू लागल्या. पण दोन वर्षांपूर्वी कोरोना महामारीत आर्थिक परिस्थिती आणि बेकारीचे सावट सर्वसामान्यांवर आले. इंग्रजी माध्यमाच्या शाळेची फी भरणे आणि इतर खर्च डोईजड झाला.


विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद पडण्याची वेळ येऊ लागली. हा अनुभव पालकांना कोरोनाकाळात आल्याने आता शैक्षणिक फी चा विचार करून पालकांनी पुन्हा कमी फी असलेल्या खासगी शासकीय अनुदानित मराठी माध्यम शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यास सुरुवात केली आहे. परिणामी २५ टक्के इंग्रजी माध्यम शाळेतील विद्यार्थ्यांनी पुन्हा मराठी माध्यम शाळेत प्रवेश घेतल्याचे सिद्ध होत आहे. मराठी माध्यम शाळेत सेमी इंग्रजी माध्यम असल्याने कोणतीच अडचण येत नसल्याचे पालक सांगत आहेत.


कोरोनामुळे आता पालकांची मानसिकता बदलली आहे. आमच्याकडेही आता प्रवेशासाठी मुले येत असून आता शाळेच्या पटसंख्येत बदल दिसून येत आहे. भविष्यात आता मराठी शाळेला विद्यार्थी मिळत नाहीत, असे होणार नाही. -आशीर्वाद बोन्द्रे, कार्यवाह, टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ


सेमी इंग्रजी माध्यमातून मुख्य विषय इंग्रजीतून शिकविले जात असून पुढील पदवी शिक्षण घेण्यात अडचण येत नाही. या संदर्भात अधिक प्रमाणात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये भर देण्यात आला आहे. हे धोरण जाहीर झालेले आहे. त्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी झाल्यानंतर मातृभाषेचे महत्त्व जास्त अधोरेखित होईल.
-प्र. भा. पिंगाळकर, पर्यवेक्षक - धनाजी नाना चौधरी विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय डोंबिवली

Comments
Add Comment

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पावसामुळे ठाण्यात ४ महिन्यांत २० जणांचा बळी!

ठाणे: गेल्या चार महिन्यांत ठाणे जिल्ह्यात पावसामुळे संबंधित घटनांमध्ये किमान २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुरू केले ‘लाडकी सून’ अभियान

ठाणे: 'लाडकी बहीण' योजनेच्या यशामुळे उत्साहित होऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी