नुपूर शर्माला फाशी द्या- इम्तियाज जलील

औरंगाबाद (हिं.स.) : भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या कथित आक्षेपार्ह टिप्पणीचे पडसात देशासह राज्यातही उमटलेत. एआयएमआयएम पक्षाचे औरंगाबदचे खासदार इम्तियाज जलील यांनी थेट नुपूर शर्मा यांना फाशी देण्याची मागणी केली.


काही दिवसांपूर्वी एका टीव्ही डीबेटमध्ये डॉ. सस्लिम रहमानी यांनी वारंवार चिथावणी दिल्यामुळे भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या विरोधात कथित आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर ३ जून रोजी कानपूर येथे नुपूरच्या कथित आक्षेपार्ह टिप्पणीवरून हिंसाचार झाला. या घटनेचे परदेशातही पडसाद उमटून मुस्लीम देशांकडून निषेध नोंदवण्यात आला. याप्रकरणी भाजपने तत्काळ कारवाई करत नुपूर शर्मा आणि नवीन जिंदल यांना पक्षातून काढून टाकले. तसेच नुपूर आणि नवीन यांच्यासह वेळोवेळी विविध धर्मांवर आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या ३० जणांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यामध्ये एआयएमआयएमचे अध्यक्ष खा. असदुद्दीन ओवैसी यांचाही समावेश आहे.


यापार्श्वभूमीवर शुक्रवारच्या नमाजनंतर आंदोलन करू नये असे आवाहन दिल्लीतील जामा मशिदीच्या शाही इमामांनी केले होते. परंतु, त्यानंतरही आज, शुक्रवारच्या नमाजनंतर जामा मशिदीबाहेर आंदोलन करण्यात आले. दिल्लीसोबतच लखनऊ, प्रयागराज, सहारणपूर इत्यादी शहरांमध्येही मुस्लिमांनी नुपूर आणि नवीन यांच्या विरोधात आंदोलन करत त्यांच्या अटकेची मागणी केली. यासोबतच महाराष्ट्रातील सोलापूर, औरंगाबद आणि मुस्लीम बहुल शहरांमध्ये देखील निषेध मोर्चे काढण्यात आले.


यासंदर्भात औरंगाबदचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, नुपूर शर्मा यांची पक्षातून हकालपट्टी करणे आणि त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवणे ही दिखाव्याची कारवाई आहे. नवीन जिंदल आणि नुपूर शर्मा यांच्यावर पोलिस, प्रशासन काहीच कारवाई करीत नाही. इतरांना मात्र छोट्या गोष्टींसाठी देखील तुरुंगात डांबले जाते. एकीकडे शांततेचे आवाहन करतानाच केंद्र सरकारने नुपूर शर्माला फाशी द्यावी अशी मागणी देखील जलील यांनी केलीय.

Comments
Add Comment

भाजपाचे विकासाचे, याउलट काँग्रेसचे विनाशाचे राजकारण - बावनकुळे

नागपूर : भाजप कार्यकर्त्यांनी नेहमीच जनसेवकाच्या भूमिकेतून विकासाचे राजकारण केले आहे. काँग्रेसने

मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे पर्यटक तरुणी ४० फूट खोल दरीत कोसळली

राजगड : राजगडावर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर अचानक मधमाश्यांनी हल्ला केला. त्यामुळे पर्यटकांची पळापळ झाली.

जमीन मोजणी आता होणार केवळ ३० दिवसांत !

सरकारने अधिसूचना जारी केल्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील जमीन

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू; पहा आपल्या तालुक्यातील शेतक-यांना काय मिळालं?

२५१ तालुके पूर्णतः तर ३१ तालुके अंशतः आपत्तीग्रस्त म्हणून घोषित शेती, घरे, जनावरे, मत्स्यव्यवसाय, पायाभूत सुविधा

Diwali Firecracker Ban 2025 : फटाक्यांशिवाय दिवाळी? पुण्यापाठोपाठ मुंबईतही 'नो क्रॅकर'चा कडक नियम! मुंबईकरांची यंदाची दिवाळी 'शांत'?

मुंबई: "दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदा तोटा" या उक्तीप्रमाणे अवघ्या आठवड्याभरावर आलेल्या दिवाळीमुळे मुंबईतील

Kolhapur Student Assault Video : ‘रँगिंग’च्या नावाखाली दहशत! हाॅस्टेलमध्ये सर्रास 'रॅगिंग' की टोळीयुद्ध? तळसंदे पाठोपाठ पेठवडगावमध्येही विद्यार्थ्यांची अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षण संस्थांमधील खासगी वसतिगृहे (Hostel) आता विद्यार्थ्यांच्या अमानुष