आता सर्पदंश झाल्यास आरोग्य केंद्रातच मिळणार त्वरित उपचार

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे जिल्ह्याच्या विविध तालुक्यांमधील गाव, वाड्या-पाड्यांवर असलेल्या आरोग्य केंद्रांमध्ये सर्प दंशावर योग्य उपचार न मिळाल्याने रुग्णाला शहराकडे धाव घ्यावी लागते. त्यादरम्यान, त्याचा वाटेतच मृत्यू ओढवतो. अनेक वेळा प्रशिक्षित कर्मचारी आरोग्य केंद्रात नसल्याने रुग्णाला उपचारासाठी तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवावा लागतो.


मात्र आता ही वेळ यापुढे येणार नसून तालुक्यातील आरोग्य केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना सर्पदंश झालेल्या रुग्णाला तत्काळ उपचारासाठी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. आरोग्य विभागाने गाव पातळीवरील प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका, डॉक्टर, इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सर्प दंशाची आवश्यक वैद्यकीय सामग्री, औषध, गोळ्यांचा पुरेसा साठा देऊन, या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.


प्रत्येक आरोग्य केंद्रात पुरेसा औषध साठा, प्रशिक्षित मनुष्यबळ आहे की नाही याची चाचपणी करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य विभागाने जिल्हा परिषद, पंचायत समिती अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुरबाड, शहापूर, भिवंडी, अंबरनाथ, कल्याण, उल्हासनगर तालुक्यांमधील आरोग्य केंद्रांचा या सेवांमध्ये समावेश आहे.


दरम्यान, गेल्या दीड वर्षात शहापुरात ५०५ ग्रामस्थांना सर्प दंश झाला. २२४ जणांना विंचवाने दंश केला होता. या दंशांनी एकूण आठ रुग्णांचा मृत्यू झाला होता. प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंशाची इंजेक्शन उपलब्ध असतात. तेथेच दंश झालेल्या रुग्णावर उपचार करणे अपेक्षित असते. असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

‘आपला दवाखान्या’चा वापर अन्य ‘उद्योगां’साठी

पगार थकला; आमदार संजय केळकर यांच्याकडे तक्रारी ठाणे  : ठाणे शहरात ४० ठिकाणी सुरू करण्यात आलेला 'आपला दवाखाना' हा

सोन्याचा हार कचऱ्यात गेला; कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शोधाशोध झाली आणि अखेर...

कल्याण : सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत असून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. अशा काळात सोनं जपून ठेवणं

दोन वर्षीय चिमुकलीवर गुन्हा दाखल; पोलिसांवर प्रश्नचिन्ह

कल्याण : कल्याणनजीक असलेल्या मोहने येथे फटाके फोडण्याच्या वादातून काल दोन गटात झालेल्या राड्याप्रकरणी एका दोन

कल्याण ते नवी मुंबई मेट्रो प्रवास ४५ मिनिटांत होणार!

मुंबई : मुंबईसह सर्व उपनगरात मेट्रोचे जाळे पसरले आहे. काही प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे तर काही मेट्रो प्रकल्प

Mira Road News : मुंबईजवळच्या मीरा रोडमध्ये पुन्हा हिंसाचार! 'पार्किंग'च्या किरकोळ वादातून ३० वाहनांची तोडफोड; परिसरात तणाव

मीरा रोड : मुंबईला लागून असलेल्या मीरा रोड (Mira Road) परिसरात पुन्हा एकदा एका किरकोळ वादावरून परिस्थिती चिघळल्याची

काशिमीरा परिसरात मोठा राडा, २५ रिक्षांचे नुकसान, मुलींची छेडछाड; मंत्री प्रताप सरनाईकांनी व्यक्त केली बांगलादेशींच्या सहभागाची शंका

ठाणे : राज्यभरात दिवाळीचा जल्लोष सुरू असताना ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मीरा रोडजवळील