राज्याचा बारावीचा निकाल ९४.२२ टक्के

पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या (मार्च २०२२) परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. राज्यातून यंदा १४ लाख ३९ हजार ७३१ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १३ लाख ५६ हजार ६०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राज्याचा एकूण निकाल ९४.२२ टक्के इतका लागला आहे.


राज्यातील बोर्डाच्या 9 विभागांपैकी कोकण विभाग 97.21 टक्क्यांसह अव्वल असून मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 90.91 टक्के लागला आहे. पुणे विभागाचा निकाल 93.61 टक्के, नागपूर विभागाचा 96.52 टक्के, औरंगाबाद 94.97 टक्के, कोल्हापूर विभाग 95.7 टक्के, अमरावती 96.34 टक्के, लातूर 95.25 टक्के आणि नाशिक विभागाचा निकाल 95.03 टक्के लागला आहे. राज्यातील 230769 विद्यार्थ्यांना 75 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले असून 558678 विद्यार्थ्यांनी 60 टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केले आहेत. राज्यातील 6455 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांहून अधिक गुण पटकावले आहेत.

Comments
Add Comment

पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रारंभ, २४ तास दर्शनाची सुविधा!

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तीच्या

नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेले मराठवाड्याचे प्राध्यापक येताना पत्नीसह भीषण अपघात दगावले...

पुणे : छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात विद्यापीठाचे निवृत्त

पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार

भाजप-अजित पवार गट आमने-सामने पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचा फलटण दौरा

सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक झाली आहे.

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यासपीठावर मनोज जरांगे येणार का?

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे