Tuesday, March 25, 2025
Homeमहत्वाची बातमीप्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवर ई-केवायसी करण्यास ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवर ई-केवायसी करण्यास ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्याची ई-केवायसी ३१ मे वरुन मुदत वाढवून देवून ३१ जुलै २०२२ पर्यंत करण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्याना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमेट्रीक हे पर्याय उपलब्ध करुन दिलेले आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी वेळेत ई-केवायसी करणे बंधनकारक आहे.

जे शेतकरी ई-केवायसी करतील अशाच पात्र लाभार्थ्यांना यापुढे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात आजअखेर एकूण ४ लाख ९८ हजार ८० शेतकऱ्यांपैकी केवळ २ लाख ९८ हजार ६२३ शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण केलेले आहे. उर्वरीत २ लाख ७९ हजार ४५७ ई-केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित आहे.

तरी या लाभार्थ्यांनी तात्काळ आपले ई-केवायसी प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -