Share

मुंबई : दिवसेंदिवस राज्यात कोरोना रुग्णसंख्येच्या आकडा वाढत चालला असून बुधवारी तब्बल कोरोना रुग्णसंख्या पावणे तीन हजारांच्या घरात गेली आहे. बुधवारी राज्यात २७०१ कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर यापैकी १७६५ कोरोना रुग्ण मुंबईत आढळले आहेत.

राज्यात बुधवारी बरे झालेल्या रुग्णांची संख्या १३२७ आहे, तर यातील ७३९ रुग्ण हे मुंबईचे आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर हा ९८ टक्के आहे, तर मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या ही ७००० एवढी झाली आहे.

मुंबईत रुग्ण वाढीचा दर देखील वाढला असून कोविड दुप्पटीचे दिवस कमी झाले असून ८६६ झाले आहेत.

देशात ५२३३ नव्या रुग्णांची नोंद

देशात कोरोना रुग्णसंख्येत ४१ टक्क्यांनी वाढ झाली असून महाराष्ट्रात २७०१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात कोरोना रुग्णसंख्येने मागील ९३ दिवसानंतर पाच हजारांचा टप्पा पार केला आहे. बुधवारी ५२३३ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. या रुग्णसंख्येसह सध्या देशात २८ हजार ८५७ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

काही दिवसांपासून देशात कोरोना संसर्गामध्ये वाढ होत आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांतही रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, बुधवारी देशात ५२३३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारच्या तुलनेत ही रुग्णसंख्या ४१ टक्क्यांनी जास्त आहे. या रुग्णवाढीमुळे आता चिंता व्यक्त केली जात असून खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

Recent Posts

SRH vs MI, IPL 2025: मुंबई इंडियन्स विजयाचा चौकार मारेल का?

मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…

54 minutes ago

दक्षिण मुंबईतील १४ हजार इमारतींचे होणार ‘स्ट्रक्चरल ऑडिट’

अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…

1 hour ago

चिपी विमानतळ विद्युतीकरणाचा प्रश्न सुटणार

पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…

2 hours ago

१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू…हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…

3 hours ago

PahalgamTerrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…

3 hours ago

PahalgamTerrorist Attack : डोंबिवलीच्या तीन जणांसह महाराष्ट्राचे चार पर्यटक ठार

पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…

4 hours ago