विश्वचषक नेमबाजी : अंजुमला रौप्य

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या अंजुम मुदगिलने ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारात रौप्यपदक पटकावले. महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारातील सुवर्णपदकाच्या लढतीत अंजुमला डेन्मार्कच्या रिक्के माएंग इब्सेनकडून १२-१६ अशी हार पत्करावी लागली. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या अंजुमने त्यापूर्वी ६०० पैकी ५८७ गुण मिळवत अव्वल आठ नेमबाजांच्या मानांकन फेरीत प्रवेश मिळवला होता.


त्यानंतर मानांकन फेरीत अंजुमने ४०६.५ गुणांसह दुसरे स्थान मिळवले, तर अव्वल स्थानावरील इब्सेनचे ४११.४ गुण होते. सुवर्णपदकाच्या लढतीत अंजुमने इब्सेनला उत्तम झुंज दिली. मात्र, मोक्याच्या क्षणी इब्सेनने अचूक वेध साधत सुवर्णपदक आपल्या नावे केले. त्याचप्रमाणे, ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारातील पुरुषांच्या सांघिक गटात भारताच्या स्वप्निल कुसळे, दीपक कुमार आणि गोल्डी गुर्जर यांनी रौप्यपदक जिंकले. अंतिम लढतीत त्यांना क्रोएशियाच्या त्रिकुटाने १७-७ अशा मोठ्या फरकाने नमवले.


पदकतालिकेत भारत तिसऱ्या स्थानी


अंजुम आणि पुरुष संघाच्या कामगिरीमुळे भारताने विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या पदकतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. भारताच्या खात्यावर एक सुवर्ण आणि तीन रौप्य अशी एकूण चार पदके आहेत. अव्वल स्थानावरील कोरियाने एकूण पाच (तीन सुवर्ण), तर दुसऱ्या स्थानावरील सर्बियाने एकूण चार (दोन सुवर्ण) पदके मिळवली आहेत.

Comments
Add Comment

मुंबईत कुस्तीची महादंगल!

चार राज्यातले दिग्गज पैलवान भिडणार मुंबई : पहिल्यांदाच देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांमधील अव्वल पैलवान एकाच

न्यूझीलंडविरुद्धच्या रायपूर टी २० मध्ये भारताचा विजय, मालिकेत २-० अशी आघाडी

रायपूर : भारताने न्यूझीलंडविरुद्धची रायपूरमधील टी २० मॅच सात विकेट राखून जिंकली. या विजयासह भारताने पाच मॅचच्या

ग्रँड स्लॅम ४०० व्या विजयाच्या उंबरठ्यावर नोव्हाक जोकोविच!

ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश मेलबर्न : टेनिस जगतातील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या नोव्हाक

भारताचे विजयी आघाडीकडे लक्ष्य

रायपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध आज दुसरी टी-२० लढत रायपूर : नागपूरमध्ये मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर, भारतीय

T20 World Cup मध्ये नव्या संघाची एन्ट्री होणार, बांगलादेशच्या बहिष्कारानंतर ICC लवकरच घोषणा करणार

ढाका : बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या आगामी T20 वर्ल्ड कप २०२६ वर बहिष्कार घालत असल्याची

नागपुरात किवींचा धुव्वा उडवत भारताचा दमदार विजय

अभिषेक शर्मा, रिंकू सिंगच्या वादळी खेळीने मालिकेत १-० ने आघाडी नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही