विश्वचषक नेमबाजी : अंजुमला रौप्य

  89

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या अंजुम मुदगिलने ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारात रौप्यपदक पटकावले. महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारातील सुवर्णपदकाच्या लढतीत अंजुमला डेन्मार्कच्या रिक्के माएंग इब्सेनकडून १२-१६ अशी हार पत्करावी लागली. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या अंजुमने त्यापूर्वी ६०० पैकी ५८७ गुण मिळवत अव्वल आठ नेमबाजांच्या मानांकन फेरीत प्रवेश मिळवला होता.


त्यानंतर मानांकन फेरीत अंजुमने ४०६.५ गुणांसह दुसरे स्थान मिळवले, तर अव्वल स्थानावरील इब्सेनचे ४११.४ गुण होते. सुवर्णपदकाच्या लढतीत अंजुमने इब्सेनला उत्तम झुंज दिली. मात्र, मोक्याच्या क्षणी इब्सेनने अचूक वेध साधत सुवर्णपदक आपल्या नावे केले. त्याचप्रमाणे, ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारातील पुरुषांच्या सांघिक गटात भारताच्या स्वप्निल कुसळे, दीपक कुमार आणि गोल्डी गुर्जर यांनी रौप्यपदक जिंकले. अंतिम लढतीत त्यांना क्रोएशियाच्या त्रिकुटाने १७-७ अशा मोठ्या फरकाने नमवले.


पदकतालिकेत भारत तिसऱ्या स्थानी


अंजुम आणि पुरुष संघाच्या कामगिरीमुळे भारताने विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या पदकतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. भारताच्या खात्यावर एक सुवर्ण आणि तीन रौप्य अशी एकूण चार पदके आहेत. अव्वल स्थानावरील कोरियाने एकूण पाच (तीन सुवर्ण), तर दुसऱ्या स्थानावरील सर्बियाने एकूण चार (दोन सुवर्ण) पदके मिळवली आहेत.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार