नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या अंजुम मुदगिलने ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारात रौप्यपदक पटकावले. महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारातील सुवर्णपदकाच्या लढतीत अंजुमला डेन्मार्कच्या रिक्के माएंग इब्सेनकडून १२-१६ अशी हार पत्करावी लागली. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या अंजुमने त्यापूर्वी ६०० पैकी ५८७ गुण मिळवत अव्वल आठ नेमबाजांच्या मानांकन फेरीत प्रवेश मिळवला होता.
त्यानंतर मानांकन फेरीत अंजुमने ४०६.५ गुणांसह दुसरे स्थान मिळवले, तर अव्वल स्थानावरील इब्सेनचे ४११.४ गुण होते. सुवर्णपदकाच्या लढतीत अंजुमने इब्सेनला उत्तम झुंज दिली. मात्र, मोक्याच्या क्षणी इब्सेनने अचूक वेध साधत सुवर्णपदक आपल्या नावे केले. त्याचप्रमाणे, ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारातील पुरुषांच्या सांघिक गटात भारताच्या स्वप्निल कुसळे, दीपक कुमार आणि गोल्डी गुर्जर यांनी रौप्यपदक जिंकले. अंतिम लढतीत त्यांना क्रोएशियाच्या त्रिकुटाने १७-७ अशा मोठ्या फरकाने नमवले.
पदकतालिकेत भारत तिसऱ्या स्थानी
अंजुम आणि पुरुष संघाच्या कामगिरीमुळे भारताने विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या पदकतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. भारताच्या खात्यावर एक सुवर्ण आणि तीन रौप्य अशी एकूण चार पदके आहेत. अव्वल स्थानावरील कोरियाने एकूण पाच (तीन सुवर्ण), तर दुसऱ्या स्थानावरील सर्बियाने एकूण चार (दोन सुवर्ण) पदके मिळवली आहेत.
पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…
ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा…
पुणे : पुण्यातून काँग्रेससाठी आणखी एक धक्का देणारी राजकीय कुजबुज सुरु झाली आहे. संग्राम थोपटेंनी…
पुणे : पुणे भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला अखेर रामराम…
मुंबई: टायगर श्रॉफला (Tiger Shroff) जीवे मारण्याच्या धमकी संदर्भात केलेल्या खोट्या तक्रारीबद्दल, मुंबई पोलिसांनी पंजाबमधील…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक…