‘टी-२०’मधील अनोखा सामना

  102

क्वालालंपूर (वृत्तसंस्था) : ‘टी-२०’ क्रिकेट म्हणजे धावांचा पाऊस आणि चौकार षटकारांची आतेबाजी असे चित्र असते. पण टी-२० मध्ये जर एखादा संघ फक्त ८ धावांवर ऑलआऊट झाला असे कोणी सांगितले, तर त्यावर कदाचित कुणाचाच विश्वास बसणार नाही. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेद्वारे आयोजित एका स्पर्धेमध्ये असेच काहीसे घडले आहे.


आयसीसी १९ वर्षांखालील महिला ‘टी-२०’ वर्ल्डकप आशिया क्वालिफायरमध्ये अशी मॅच झाली ज्याचा कोणी विचार देखील केला नव्हता. युएई आणि नेपाळ यांच्यात शनिवारी ही मॅच झाली. या लढतीत नेपाळचा महिला संघ ८.१ षटकात फक्त ८ धावांमध्ये गारद झाला. उत्तरादाखल युएईने विजयाचे लक्ष्य १.१ म्हणजे फक्त ७ चेंडूत पार केले. एका दिवसापूर्वी नेपाळने कतारच्या संघावर ७९ धावांनी विजय मिळवला होता. या खास सामन्यात झाले असे की, नेपाळच्या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या ओव्हरमध्ये त्यांची पहिली विकेट पडली.


त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये एका पाठोपाठ ३ गडी त्यांनी गमावले. त्यामुळे नेपाळची अवस्था २ बाद ४ अशी झाली. संपूर्ण डावात नेपाळच्या ६ खेळाडूंना भोपळाही फोडता आला नाही. स्नेहा माहारने सर्वाधिक ३ धावा केल्या. अन्य ३ फलंदाजांनी प्रत्येकी १ तर एका खेळाडूने २ धावा केल्या. युएईकडून महिका गौरने ४ षटकात २ धावा देत ५ विकेट घेतल्या, तर इंदुजाने ३ आणि समायराने १ विकेट मिळवली.


विजयासाठी असलेले फक्त ९ धावांचे लक्ष्य, युएईच्या संघाने केवळ ७ चेंडूत पार केले. कर्णधार तीर्था सतीशने ४, तर लावण्याने नाबाद ३ धावा केल्या. युएईचा पात्रता स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय आहे. याआधी त्यांनी ३ जून रोजी भूतानवर १६० धावांनी मोठा विजय मिळवला होता.

Comments
Add Comment

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

IND vs ENG : चक दे इंडिया! ओव्हल कसोटीत टीम इंडियाने रचले अनेक विक्रम, इतिहासात होईल नोंद

लंडन: लंडनच्या ओव्हल मैदानावर पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने केवळ इंग्लंडला पराभूतच केले नाही तर अनेक

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट