‘टी-२०’मधील अनोखा सामना

क्वालालंपूर (वृत्तसंस्था) : ‘टी-२०’ क्रिकेट म्हणजे धावांचा पाऊस आणि चौकार षटकारांची आतेबाजी असे चित्र असते. पण टी-२० मध्ये जर एखादा संघ फक्त ८ धावांवर ऑलआऊट झाला असे कोणी सांगितले, तर त्यावर कदाचित कुणाचाच विश्वास बसणार नाही. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेद्वारे आयोजित एका स्पर्धेमध्ये असेच काहीसे घडले आहे.


आयसीसी १९ वर्षांखालील महिला ‘टी-२०’ वर्ल्डकप आशिया क्वालिफायरमध्ये अशी मॅच झाली ज्याचा कोणी विचार देखील केला नव्हता. युएई आणि नेपाळ यांच्यात शनिवारी ही मॅच झाली. या लढतीत नेपाळचा महिला संघ ८.१ षटकात फक्त ८ धावांमध्ये गारद झाला. उत्तरादाखल युएईने विजयाचे लक्ष्य १.१ म्हणजे फक्त ७ चेंडूत पार केले. एका दिवसापूर्वी नेपाळने कतारच्या संघावर ७९ धावांनी विजय मिळवला होता. या खास सामन्यात झाले असे की, नेपाळच्या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या ओव्हरमध्ये त्यांची पहिली विकेट पडली.


त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये एका पाठोपाठ ३ गडी त्यांनी गमावले. त्यामुळे नेपाळची अवस्था २ बाद ४ अशी झाली. संपूर्ण डावात नेपाळच्या ६ खेळाडूंना भोपळाही फोडता आला नाही. स्नेहा माहारने सर्वाधिक ३ धावा केल्या. अन्य ३ फलंदाजांनी प्रत्येकी १ तर एका खेळाडूने २ धावा केल्या. युएईकडून महिका गौरने ४ षटकात २ धावा देत ५ विकेट घेतल्या, तर इंदुजाने ३ आणि समायराने १ विकेट मिळवली.


विजयासाठी असलेले फक्त ९ धावांचे लक्ष्य, युएईच्या संघाने केवळ ७ चेंडूत पार केले. कर्णधार तीर्था सतीशने ४, तर लावण्याने नाबाद ३ धावा केल्या. युएईचा पात्रता स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय आहे. याआधी त्यांनी ३ जून रोजी भूतानवर १६० धावांनी मोठा विजय मिळवला होता.

Comments
Add Comment

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए

राष्ट्रीय खोखोपटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती

मुंबई : राष्ट्रीय खोखोपटू तथा क्रीडा प्रसारक श्री. सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना

WPL 2026 Final: बंगळूरची विजयी घोडदौड दिल्ली थांबवू शकणार का?

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. रॉयल चॅलेंजर्स

IND vs PAK : "आयसीसीचे मुख्यालय भारतात असते तर बॉम्बने उडवले असते..."; पाकिस्तानी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने जाहीर केले की त्यांचा संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मैदानात उतरेल,

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीची स्थगिती कायम, रोहित पवारांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली  : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार

IND vs PAK : पाकिस्तान नेहमीप्रमाणे "यू-टर्न" घेईल; सुनील गावस्कर यांची पाकिस्तानवर टीका

मुंबई: टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान सरकारने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.