रिक्षा स्टॅण्ड बंद असल्यामुळे रिक्षाचालक आक्रमक

कल्याण (प्रतिनिधी) : रेल्वे हद्दीतील तीस वर्षे जूना असलेला गेट नंबर २ येथील रिक्षा स्टॅण्ड रेल्वे प्रशासनाने कोरोना कालावधीपासून बंद केला आहे. रेल्वे प्रशासनाचा हा निर्णय अन्यायकारक असून बाहेर रिक्षा लावल्याने वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे वाहतूक पोलीस रिक्षाचालकांकडून दंड आकारात असून रोजच्या या त्रासाला कंटाळून रिक्षाचालक संतप्त झाले आहेत. या रिक्षाचालकांनी माजी सभापती रमेश म्हात्रे यांची भेट घेऊन आपली समस्या मांडली आहे. याबाबत लवकरच खा. डॉ. श्रीकांत शिंदे व रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन रमेश म्हात्रे यांनी या रिक्षाचालकांना दिले आहे. यावेळी विक्की म्हात्रे, जगदीश राठोड, अन्नू डोंगरे आदींसह रिक्षाचालक उपस्थित होते.


रेल्वे स्टेशन परिसरात स्मार्ट सिटीअंतर्गत सॅटीसचे काम सुरू आहे. सॅटीस काम सुरू असताना प्रशासनाकडून वाहतूक व्यवस्थासंदर्भात नियोजन व उपाययोजना केलेल्या नाहीत. महापालिका, रेल्वे, स्मार्ट सिटी, आरटीओ, वाहतूक पोलीस प्रशासन यांच्यामध्ये कोठेही समन्वय नाही. रेल्वे प्रशासनाने होम प्लॅटफॉर्म क्रमांक १ समोरील जुने रिक्षा स्टॅण्ड पर्यायी व्यवस्था न करता कोरोना कालवधीपासून बंद केले आहे. यातील दोन स्टॅण्ड सुरू केले असून गेट नंबर दोन येथील रिक्षा स्टॅण्ड अद्यापही बंदच आहे. यामुळे ४००हून अधिक रिक्षा बाहेर उभ्या कराव्या लागत आहे. येथील रिक्षा या कल्याण पूर्वेतील नेतिवली, चक्कीनाका, चेतना, नांदिवली, काका ढाबा याठिकाणी प्रवासी वाहतूक करतात.


नियोजनाअभावी स्टेशन परिसरात नित्यरोज वाहतूक खोळंबा होत आहे. दररोज वाहतूक पोलिसांकडून होणारा हजारो रुपये दंड नाहक रिक्षाचालकांना भरावा लागत आहे. रिक्षा वाहतूक हे सार्वजनिक प्रवासी व्यवस्थेचे प्रमुख घटक आहे. महापालिका, रेल्वे, स्मार्ट सिटी, आरटीओ, वाहतूक पोलीस, पोलीस प्रशासन यांची एक समन्वय समिती नेमून स्टेशन परिसरातील वाहतूक व्यवस्था व रिक्षा स्टॅण्डबाबत तातडीने निर्णय घ्यावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.


रिक्षा, टॅक्सी चालक-मालक असोसिएशनतर्फे रिक्षाचालकांकडून दररोज दहा रुपयांची पावती घेतली जाते, गेट नंबर २ रिक्षा स्टँड आत घेण्यासाठी मदत केली जात नसल्याचा आरोप या रिक्षाचालकांनी केला आहे. याबद्दल रिक्षा, टॅक्सी चालक-मालक असोसिएशनचे अध्यक्ष प्रणव पेणकर यांना विचारले असता, होम प्लॅटफॉर्म नंबर १ येथील तिन्ही रिक्षा स्टॅण्ड कोरोना काळात रेल्वे प्रशासनाने नियोजित हॉटेल व प्रवासी प्रतीक्षागृह नवनिर्माण याकरिता कायमस्वरूपी बंद करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

Comments
Add Comment

यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी गुड न्यूज

नोव्हेंबरपासून जूनपर्यंत तब्बल ६८ विवाह मुहूर्त ठाणे  : तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा धडाका सुरू होतो. यंदा

सुजाता मडके या शहापूरच्या कन्येची ‘इस्रो’मध्ये थरारक झेप

ठाणे : ‘यशाला शॉर्टकट नसतो, पण जिद्द, मेहनत आणि स्वप्नांवर विश्वास असेल तर अवकाशातही भरारी घेता येते,’ या शब्दात

यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी गुड न्यूज, नोव्हेंबरपासून जूनपर्यंत तब्बल ६८ विवाह मुहूर्त

ठाणे (वार्ताहर) : तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा धडाका सुरू होतो. यंदा नोव्हेंबरपासून जूनअखेरपर्यंत तब्बल ६८ विवाह

उल्हासनगरमध्ये गुंडांनी केला पत्रकारावर हल्ला! पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये गुंडांनी पत्रकारावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प

‘आपला दवाखान्या’चा वापर अन्य ‘उद्योगां’साठी

पगार थकला; आमदार संजय केळकर यांच्याकडे तक्रारी ठाणे  : ठाणे शहरात ४० ठिकाणी सुरू करण्यात आलेला 'आपला दवाखाना' हा

सोन्याचा हार कचऱ्यात गेला; कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शोधाशोध झाली आणि अखेर...

कल्याण : सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत असून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. अशा काळात सोनं जपून ठेवणं