विक्रमगड तालुक्यामध्ये शिक्षण विभागात अनेक पदे रिक्त

पटसंख्या घसरली, अध्यापनात अडचणी


विक्रमगड : कोरोना काळात शाळा बंद असल्याने शिक्षणाची तूट भरून काढण्याचे मोठे आव्हान शिक्षण विभागावर आहे. विक्रमगड तालुक्यात ७८२ मंजूर पदांपैकी तब्बल १९७ पदे रिक्त असून शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्याही घसरत आहे तसेच शिक्षणाचा दर्जाही कमी होतो आहे.


विक्रमगड तालुक्यात शिक्षण विभागातील रिक्त पदांमुळे अध्यापनात अडचणी येत आहेत. याचा सामना शिक्षक, अधिकारी व विद्यार्थ्यांना करावा लागणार आहे. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पहिली ते आठवीच्या २३५ शाळा असून त्यात साधारण १६ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तालुक्यात ७८२ मंजूर पदांपैकी तब्बल १९७ पदे रिक्त आहेत. ३५ मुख्याध्यापक पदापैकी २२ पदे रिक्त असून केंद्रप्रमुखांच्या १६ पदांपैकी ९ पदे रिक्त आहेत.


विस्ताराधिकारी ही सात पदे मंजूर असून त्यातील केवळ एक पद भरले असून सहा पदे रिक्त आहेत. पदवीधर शिक्षकांची ८२, सहशिक्षकांची ७७ पदे रिक्त आहेत. हा शिक्षण विभागाचा कारभार रामभरोसे चालतो का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. ही पदे लवकरात लवकर भरावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अपुऱ्या शिक्षकांमुळे पटसंख्याही कमी होत आहे. दर्जा वाढविण्यासाठी पूर्णवेळ शिक्षक देणे अपेक्षित आहे, असे येथील किरण गहला यांचे मत आहे. तालुक्यातील शिक्षण विभागातील रिक्त पदे भरण्याससंबंधी वरिष्ठ कार्यालयाला पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी ईश्वर पवार यांनी दिली.

Comments
Add Comment

ई-गव्हर्नन्स मूल्यमापनात वसई–विरार पालिकेचा ‘नववा क्रमांक’ कायम

पालघर :  राज्यातील महानगरपालिकांच्या ई-गव्हर्नन्स कामकाजाच्या मूल्यमापनात वसई–विरार महानगरपालिकाने यंदाही

Virar: दारूच्या नशेत सापासोबत मस्ती बेतली जीवावर; विरारमध्ये तरुणाचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू

विरार: दारूच्या नशेत विषारी जातीच्या सापाला पकडणे आणि अति उत्साहाच्या भरात सापसोबतच मस्ती करणे विरार येथील एका

वसई-दिवा मार्गावर मेगाब्लॉक, शनिवारी आणि रविवारी प्रवाशांचे हाल

वसई : दिवा-वसई रोड मार्गावरील खारबाव (Kharbav) स्थानकात नवीन अप आणि डाऊन मालवाहू मार्गिकांच्या कामासाठी शनिवार आणि

धक्राकादायक! १५ वर्षाच्या भाच्याकडून आत्याचा खून

वसई : वसई परिसरामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रागाच्या भरात एका १५ वर्षीय मुलाने आपल्या आत्याचा खून

सत्तेचे गणित बिघडले; बेरजेचे गणित जमले

गणेश पाटील, विरार : वसई-विरारमध्ये एकापेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याची राजकीय शक्ती नसलेल्या भाजपने यावेळी

पाण्याच्या टाकीत मानवी हाडांचा सापळा

वसईच्या माणिकपूर गावातील घटना वसई : वसईच्या माणिकपूर येथील एका चाळीच्या रिकाम्या पाण्याच्या टाकीत पुरुषाच्या