‘मुंबईची तुंबई’ प्रतिमा बदलण्यासाठी पालिका सज्ज

मुंबई (प्रतिनिधी) : दर वर्षी पाऊस आणि रस्त्यावरचे खड्डे असे समीकरण मुंबई शहर व उपनगरांमध्ये पाहायला मिळते. अनेकदा या खड्ड्यांमुळे अपघात होतात आणि चालकांना तसेच प्रवाशांसह पादचाऱ्यांचा जीवदेखील जातो. त्यामुळे पालिका प्रशासन खड्डे बुजवण्यासाठी प्रयत्नशील असते. मुंबईतही पावसाळ्यात एकीकडे पाणी तुंबते; तर दुसरीकडे रस्त्यांची चाळण झालेली पाहायला मिळते. दर वर्षी मुंबईकरांना या समस्यांना सामोरे जावे लागते.


या वर्षी मुंबई महापालिकेने मान्सूनचा सामना करण्यासाठी कंबर कसली आहे. या वर्षी मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते विभागाकडून मॉन्सूनपूर्व तयारी म्हणून १५०० मेट्रिक टन कोल्डमिक्सचा पुरवठा सर्व २४ वॉर्डंत करण्यात आला आहे, तर एमएमआरडीएद्वारे ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेला खड्डे बुजविण्यासाठी तसेच पाणी साचू नये म्हणून टीम सज्ज ठेवण्यात येणार आहे.


मुंबई महापालिकेचे पॉटहोल ट्रॅकर अॅप सध्या कार्यन्वित असून याद्वारे मुंबईकरांच्या तक्रारीचे निवारण केले जाते. या अॅपवर येणाऱ्या तक्रारींचे २४ ते ४८ तासांत निवारण करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांनी दिली. रस्त्यांवरील खड्डयांबाबत नागरिकांना तक्रार करता यावी, यासाठी महानगरपालिकेच्या ८९९९-२२८-९९९ या ‘व्हॉट्सअॅप चॅट’ क्रमांकासह महानगरपालिकेच्या अॅपवर आणि संकेतस्थळावर देखील ही सुविधा उपलब्ध असणार आहे.


याशिवाय मान्सूनची प्रत्येक खबरबात मुंबईकरांना आधीच कळावी यासाठी मुंबई महापालिका एक नवे अॅपदेखील लवकरच कार्यन्वित करणार आहे. मान्सून आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेत मान्सूनच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे.


पावसाळ्यात येणाऱ्या विविध अडचणींचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिका विविध उपाययोजना करत आहे. तरीही दर वर्षी मुंबईकरांना पावसाळ्यात वेवगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागतेच. यंदा कोठेही पाणी तुंबू नये आणि मुंबईची तुंबई या प्रतिमेला छेद बसावा यासाठी पालिका प्रशासनाकडून अथक प्रयत्न केले जात आहे.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.