धोका वाढला! राज्यात शनिवारी १३५७ तर सर्वाधिक ८८९ कोरोना रूग्णांची नोंद मुंबईत

  62

मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढतच असून शनिवारी राज्यात १३५७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरातील असून मुंबईत आज ८८९ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज कोरोनामुळे एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागला आहे.


राज्यातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्यादेखील वाढताना दिसत आहे. राज्यात आज एकूण ५८८८ सक्रिय रुग्ण आढळले असून मुंबईत सर्वाधिक म्हणजे ४२९४ इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्या खालेखाल ठाण्याचा क्रमांक लागत असून ठाण्यामध्ये ७६९ इतके सक्रिय रुग्ण आहेत. २८ मे रोजी बीए ४ आणि बीए ५ ओमायक्रॉन सब व्हेरीयंट रुग्णांची नोंद झाल्यानंतर ॲक्टिव्ह रुग्णसंख्या दुप्पट झाली आहे. २७ मे रोजी राज्यात ॲक्टिव्ह रुग्णसंख्या २ हजार ७७२ होती. तर आज ४ जून रोजी ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ५ हजार ८८८ वर गेली आहे.


राज्यात आज एकूण ५९५ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत एकूण 77,37,950 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.05 टक्के आहे. राज्यात आज केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला असून मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका झाला आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 78,89,212 झाली आहे.

Comments
Add Comment

नदी, नाल्यांकडे दुर्लक्ष, नालेसफाईत कोट्यावधी खर्च

कांदिवली (वार्ताहर) : कांदिवली, चारकोप आणि बोरिवली गोराईतील खाडीकिनारी असलेली खारफुटी नामशेष होत असून, तिथे

विठुरायाच्या दर्शनासाठी लालपरीलाच पसंती

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी एसटी प्रशासनाकडून विशेष

Success Mantra: सकाळी उठताच लक्षात ठेवा या गोष्टी, जीवनात येणार नाही अडथळे

मुंबई: आचार्य चाणक्य हे भारताचे थोर विचारवंत होते. त्यांनी आपले अनुभव आणि ज्ञानाच्या जोरावर चाणक्य नितीमध्ये

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन