मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने शिवसेनेवर घोटाळ्याचे गंभीर आरोप केले आहेत. शिवसेनेबद्दलची नाराजी चव्हाट्यावर आणणारे ट्वीट करत मुंबई काँग्रेसचे नेते रवी राजा यांनी सुप्रिम कोर्टात धाव घेतल्याची माहिती दिली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या ६ एसटीपी प्रकल्पांविरोधात काँग्रेस सुप्रिम कोर्टात गेली आहे. महापालिकेद्वारे प्रदान केलेल्या ६ एसटीपी प्रकल्पांच्या अंदाजांचा अभ्यास करण्यासाठी महानगरपालिकेला एक नवीन पुनरावलोकन समिती स्थापन करण्याचे निर्देश द्यावेत आणि फक्त २ वर्षात ५००० कोटींची वाढ झाली आहे, त्याची चौकशी व्हावी, या मागणीसाठी काँग्रेसने न्यायालयात धाव घेतली आहे.
या प्रकल्पांचे पुनरावलोकन होईपर्यंत त्यांनी महापालिकेला निविदा प्रक्रियेवर स्थगिती आणण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही मुंबई काँग्रेसने सुप्रिम कोर्टात केली आहे.
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…