अर्नाळा ग्रामपंचायतविरोधात कोळी महिलांचे लाक्षणिक उपोषण

विरार (वार्तहर) : पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून लाभार्थी कोळी मच्छी विक्रेता महिलांना अर्नाळा ग्रामपंचायत मागील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील फंडातून शितपेट्या वाटप करणार होती. शितपेट्या मिळाव्यात यासाठी अर्नाळा गावातील मच्छी विक्रेत्या महिलांनी तसेच कोळी महिला मच्छी विक्रेता सोसायटी यांच्यामार्फत वेळोवेळी विनवण्या आणि पाठपुरावा केला होता.


तरीदेखील अजून अर्नाळा ग्रामपंचायतीने कोळी महिलांना शितपेट्या वाटप न केल्याचा विरोधात एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला असल्याचे किरण निजाई यांनी सांगितले. अर्नाळा गावांतील मच्छी विक्रेत्या कोळी महिलांना शितपेट्या वाटप केल्या नाहीत, तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्याचा इशारा किरण नीजाई यांनी पत्राद्वारे दिला होता. ठरल्याप्रमाणे सोमवारी सकाळपासून एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. मोठ्या संख्येने कोळी महिलांनी किरण नीजाई यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत कार्यालय परिसरात ठिय्या ठोकला.


यावेळी घोषणाबाजी आणि पारंपरिक गीते गाऊन सत्ताधाऱ्याविरोधात आंदोलन करण्यात आले. मात्र ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारी सुट्टीवर होते, तर सरपंच हेमलता बाळशी व उपसरपंच महेंद्र पाटील कार्यालयाकडे फिरकलेच नाहीत. अखेर उपसरपंच महेंद्र पाटील यांनी वरिष्ठ लिपिक किशोर कुडू यांच्यामार्फत येत्या आठवडा भरात शितपेट्या वाटप करण्याचे आश्वासन उपोषणकर्त्यांना देऊन त्यांना लिंबूपाणी पाजण्यात आले. त्यानंतर किरण निकाई यांनी अनोलान तूर्तास स्थगित केल्याची सांगितले.


मच्छी विक्रेत्या कोळी महिलांना उपजीविकेचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी शासन निर्णय होऊन १५वा वित्त आयोगातून शितपेटीसाठी निधी मंजूर झाला असतानासुद्धा अर्नाळा ग्रामपंचायत शितपेट्या वाटप करायला तयार नाही. सत्ताधारी मच्छी विक्रेता कोळी महिलांची दिशाभूल करून त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवत असेल, तर हे योग्य नाही. येथील जनतेने एकहाती सत्ता दिली. योजनांचा लाभ मिळत नसल्याने सर्वसामान्य जनतेला पश्चाताप करण्याची वेळ आली आहे, असे किरण निजई म्हणाले. अर्नाळा ग्रामपंचायतीचे उपसपंच महेंद्र पाटील म्हणाले, आम्ही चर्चेसाठी त्यांना पत्र देऊन बोलावले होते; परंतु ते आले नाहीत.


त्यांना आंदोलन करण्यातच स्वारस्य वाटते. नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देणेकामी पाच वर्षांचा आराखडा तयार होताच. त्यामध्ये मच्छी विक्रेत्या कोळी महिलांना शितपेट्या वाटपाबाबत समावेश केला आहे. मासिक सभेत तसा ठराव होऊन निर्णय झाला असून कार्यवाही सुरू आहे. लवकरच शितपेट्यांचे वाटप करण्यात येईल.

Comments
Add Comment

पालघर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कामास गती देण्यासाठी वॉररुमध्ये हा प्रकल्प घेण्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश

मुंबई : पालघरमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याच्या परिसरातील

वसई विरार महापालिका क्षेत्रातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणास गती

विरार, विराट नगर, ओस्वालनगरी नालासोपारा, अलकापुरी, उमेळमान या ठिकाणी रेल्वे उड्डाणपुलाचे नियोजन मुंबई : वसई

वसईत बर्डपार्क उभारण्यासाठी पालकमंत्री गणेश नाईक सरसावले!

मुंबई : वसई विरार महापालिकेच्या हद्दीत बर्ड पार्क उभारण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. या पार्कमध्ये पक्षांना

एक हजार रुपयांच्या मोबदल्यात ६ वर्षाच्या बालकाला जुंपले कामाला !

जिल्ह्यातील आदिवासी कातकरी मुलांचे बालमजुरीसाठी शोषण आजही सुरुच पालघर : पालघर जिल्ह्यातील आदिवासी कातकरी

शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी ६८ कोटींचा खर्च

विरार : वसई - विरार पालिका क्षेत्रातील सर्वच रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यांच्या

नालासोपारा ड्रग्ज कारखाना प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंबित

वसई : मुंबई पोलिसांनी कारवाई करत नालासोपारा येथे ड्रग्जचा अवैध ड्रग्जचा कारखाना उघडकीस आणला. या कारवाईनंतर