Categories: क्रीडा

एका वर्षात दोनवेळा ‘आयपीएल’!

Share

मुंबई (प्रतिनिधी) : यंदा आयपीएलचा ज्वर चांगलाच चढला होता. कोरोनाच्या संकटानंतर पहिल्यांदाच चाहत्यांना स्टेडियममध्ये जाऊन सामने पाहण्याचा आनंद घेता आला. काही दिवसांपूर्वीच आयपीएल संपते न संपते तोच एका गोष्टीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. ही चर्चा आहे एकाच वर्षात दोन आयपीएल खेळवायची. एकाच वर्षात दोन आयपीएल स्पर्धा कशा खेळवल्या जातील, याचा फॉर्म्युलाही पुढे आला आहे. त्याचबरोबर सामने कसे खेळवायचे, हेदेखील स्पष्ट करण्यात आले आहे.

या वर्षी आयपीएलमध्ये बरेच बदल करण्यात आले होते. मोठा बदल म्हणजे यावेळी आयपीएलचा मेगा लिलाव करण्यात आला आणि त्यानंतर सर्व संघांची ओळखच बदलल्याचे पाहायला मिळाले. कोणत्या संघात कोणते खेळाडू आहेत, हे समजायला थोडा वेळ गेला, पण त्यानंतर त्यामधली रंगत चांगलीच वाढली.

त्याचबरोबर या आयपीएलमध्ये दोन नवीन संघांची एंट्री झाली, त्यामुळे आयपीएलमध्ये या वर्षी एकूण १० संघ खेळले. त्याचबरोबर सामन्यांची संख्याही वाढली. पण आता आयपीएल स्पर्धा एका वर्षात दोनदा खेळवायची असेल तर त्यासाठी भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक योजना सांगितली आहे. शास्त्री म्हणाले की, ‘ट्वेन्टी-२० क्रिकेटचे सामने किंवा स्पर्धा या फुटबॉलच्या धर्तीवर खेळायला हव्यात.

फुटबॉलमध्ये दोन देशांमध्ये मालिका खेळवल्या जात नाहीत, तर लीग आणि विश्वचषक खेळवला जातो. त्याप्रमाणे ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या दोन देशांमध्ये होणाऱ्या मालिका बंद करायला हव्या. त्यानंतर ट्वेन्टी-२० सामने हे आयपीएलसारख्या लीग्स आणि फक्त विश्वचषकात खेळवायला हवेत. त्यानुसार एका वर्षात दोनदा आयपीएल होऊ शकते. एका वर्षात १४० सामने होतील, जे ७०-७०मध्ये विभागले जाऊ शकतात. त्यामुळे एका वर्षात दोनदा आयपीएल खेळवणे सोपे होऊ शकते.

‘आयपीएल संपल्यावर आता भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ट्वेन्टी-२० मालिका होणार आहे. या मालिकेपूर्वी भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी काही मोठी वक्तव्ये केली आहेत. त्यामधील हे एक मोठे वक्तव्य आहे.

Tags: iplt20

Recent Posts

कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चार मराठी चित्रपट प्रदर्शित होणार

मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…

22 minutes ago

Summer Food Alert : उन्हाळ्यात शरीराची उष्णता वाढवणारे ‘हे’ पदार्थ टाळा

मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…

31 minutes ago

Health Tips: कडक उन्हामुळे चक्कर येत असेल तर हे पेय प्या!

तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…

39 minutes ago

प्रसिद्ध डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी महिलेला पोलीस कोठडी

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…

53 minutes ago

Central Railway News : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; बदलापुरातील फलाट क्रमांक १ कायमस्वरूपी बंद!

बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…

2 hours ago

संग्राम थोपटे २२ एप्रिल रोजी भाजपात प्रवेश करणार, काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी

पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…

2 hours ago