एका वर्षात दोनवेळा ‘आयपीएल’!

मुंबई (प्रतिनिधी) : यंदा आयपीएलचा ज्वर चांगलाच चढला होता. कोरोनाच्या संकटानंतर पहिल्यांदाच चाहत्यांना स्टेडियममध्ये जाऊन सामने पाहण्याचा आनंद घेता आला. काही दिवसांपूर्वीच आयपीएल संपते न संपते तोच एका गोष्टीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. ही चर्चा आहे एकाच वर्षात दोन आयपीएल खेळवायची. एकाच वर्षात दोन आयपीएल स्पर्धा कशा खेळवल्या जातील, याचा फॉर्म्युलाही पुढे आला आहे. त्याचबरोबर सामने कसे खेळवायचे, हेदेखील स्पष्ट करण्यात आले आहे.


या वर्षी आयपीएलमध्ये बरेच बदल करण्यात आले होते. मोठा बदल म्हणजे यावेळी आयपीएलचा मेगा लिलाव करण्यात आला आणि त्यानंतर सर्व संघांची ओळखच बदलल्याचे पाहायला मिळाले. कोणत्या संघात कोणते खेळाडू आहेत, हे समजायला थोडा वेळ गेला, पण त्यानंतर त्यामधली रंगत चांगलीच वाढली.


त्याचबरोबर या आयपीएलमध्ये दोन नवीन संघांची एंट्री झाली, त्यामुळे आयपीएलमध्ये या वर्षी एकूण १० संघ खेळले. त्याचबरोबर सामन्यांची संख्याही वाढली. पण आता आयपीएल स्पर्धा एका वर्षात दोनदा खेळवायची असेल तर त्यासाठी भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक योजना सांगितली आहे. शास्त्री म्हणाले की, ‘ट्वेन्टी-२० क्रिकेटचे सामने किंवा स्पर्धा या फुटबॉलच्या धर्तीवर खेळायला हव्यात.


फुटबॉलमध्ये दोन देशांमध्ये मालिका खेळवल्या जात नाहीत, तर लीग आणि विश्वचषक खेळवला जातो. त्याप्रमाणे ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या दोन देशांमध्ये होणाऱ्या मालिका बंद करायला हव्या. त्यानंतर ट्वेन्टी-२० सामने हे आयपीएलसारख्या लीग्स आणि फक्त विश्वचषकात खेळवायला हवेत. त्यानुसार एका वर्षात दोनदा आयपीएल होऊ शकते. एका वर्षात १४० सामने होतील, जे ७०-७०मध्ये विभागले जाऊ शकतात. त्यामुळे एका वर्षात दोनदा आयपीएल खेळवणे सोपे होऊ शकते.


‘आयपीएल संपल्यावर आता भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ट्वेन्टी-२० मालिका होणार आहे. या मालिकेपूर्वी भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी काही मोठी वक्तव्ये केली आहेत. त्यामधील हे एक मोठे वक्तव्य आहे.

Comments
Add Comment

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे

IND vs PAK : पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटमधील संघर्ष हा जगातील सर

भारताची बॉक्सर जॅस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पटकावले सुवर्णपदक, रचला इतिहास

नवी दिल्ली: भारताची प्रतिभावान बॉक्सर जैस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५

BCCI च्या कुटुंबातील कोणीही मेलं नाही, म्हणून..., शुभम द्विवेदीच्या पत्नीची प्रतिक्रिया

"सामान्य लोक माझं ऐकतील आणि सामन्यावर बहिष्कार टाकतील" ऐशन्या द्विवेदी Asia Cup 2025 India Vs Pak Match Controversy: पहलगाम हल्ल्यात

भारत-पाकिस्तान सामन्यावर बीसीसीआयचा बहिष्कार?

मॅचमध्ये दिसणार नाहीत बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी (१४ सप्टेंबर) दुबई