एका वर्षात दोनवेळा ‘आयपीएल’!

  112

मुंबई (प्रतिनिधी) : यंदा आयपीएलचा ज्वर चांगलाच चढला होता. कोरोनाच्या संकटानंतर पहिल्यांदाच चाहत्यांना स्टेडियममध्ये जाऊन सामने पाहण्याचा आनंद घेता आला. काही दिवसांपूर्वीच आयपीएल संपते न संपते तोच एका गोष्टीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. ही चर्चा आहे एकाच वर्षात दोन आयपीएल खेळवायची. एकाच वर्षात दोन आयपीएल स्पर्धा कशा खेळवल्या जातील, याचा फॉर्म्युलाही पुढे आला आहे. त्याचबरोबर सामने कसे खेळवायचे, हेदेखील स्पष्ट करण्यात आले आहे.


या वर्षी आयपीएलमध्ये बरेच बदल करण्यात आले होते. मोठा बदल म्हणजे यावेळी आयपीएलचा मेगा लिलाव करण्यात आला आणि त्यानंतर सर्व संघांची ओळखच बदलल्याचे पाहायला मिळाले. कोणत्या संघात कोणते खेळाडू आहेत, हे समजायला थोडा वेळ गेला, पण त्यानंतर त्यामधली रंगत चांगलीच वाढली.


त्याचबरोबर या आयपीएलमध्ये दोन नवीन संघांची एंट्री झाली, त्यामुळे आयपीएलमध्ये या वर्षी एकूण १० संघ खेळले. त्याचबरोबर सामन्यांची संख्याही वाढली. पण आता आयपीएल स्पर्धा एका वर्षात दोनदा खेळवायची असेल तर त्यासाठी भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक योजना सांगितली आहे. शास्त्री म्हणाले की, ‘ट्वेन्टी-२० क्रिकेटचे सामने किंवा स्पर्धा या फुटबॉलच्या धर्तीवर खेळायला हव्यात.


फुटबॉलमध्ये दोन देशांमध्ये मालिका खेळवल्या जात नाहीत, तर लीग आणि विश्वचषक खेळवला जातो. त्याप्रमाणे ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या दोन देशांमध्ये होणाऱ्या मालिका बंद करायला हव्या. त्यानंतर ट्वेन्टी-२० सामने हे आयपीएलसारख्या लीग्स आणि फक्त विश्वचषकात खेळवायला हवेत. त्यानुसार एका वर्षात दोनदा आयपीएल होऊ शकते. एका वर्षात १४० सामने होतील, जे ७०-७०मध्ये विभागले जाऊ शकतात. त्यामुळे एका वर्षात दोनदा आयपीएल खेळवणे सोपे होऊ शकते.


‘आयपीएल संपल्यावर आता भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ट्वेन्टी-२० मालिका होणार आहे. या मालिकेपूर्वी भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी काही मोठी वक्तव्ये केली आहेत. त्यामधील हे एक मोठे वक्तव्य आहे.

Comments
Add Comment

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

IND vs ENG : चक दे इंडिया! ओव्हल कसोटीत टीम इंडियाने रचले अनेक विक्रम, इतिहासात होईल नोंद

लंडन: लंडनच्या ओव्हल मैदानावर पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने केवळ इंग्लंडला पराभूतच केले नाही तर अनेक

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट