दापचरीत अनधिकृत बांधकामावर हातोडा

कासा (वातार्हर) : डहाणू तालुक्यातील दापचरी बोर्डाच्या समोर असलेल्या जागेत कृषी विभागाच्या राज्यस्तरीय मध्यवर्ती फळ वाटिकेच्या प्रवेशद्वाराजवळ उभारलेल्या अनधिकृत बांधकामावर जिल्हा प्रशासनाने बुलडोझर लावून धडक कारवाई केली. कारवाई केल्यानंतर ती जागा कृषी विभागाच्या कार्यालयाच्या ताब्यात दिली.


दापचरी दुग्ध प्रकल्पातील चिकित्सलयाच्या इमारतीवर इंडो इस्माईल ऍग्रो इंडस्ट्रीज मुंबई यांनी अतिक्रमण केले होते येथे अतिक्रमण केलेल्या जागेत अनधिकृत बांधकाम करून पत्र्याचे शेड उभारून तेथे शैक्षणिक संस्था उभारली होती. ही जागा कृषी विभागाच्या ताब्यात होती. त्यांनी तीन वर्षासाठी इंडो इस्राईल ॲग्रो इंडस्ट्रिज मुंबई यांना भाडे तत्त्वावर दिली होती. कृषी विभागाने अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यासाठी पत्रव्यवहार केला. पण ती संस्था दाद देत नव्हती.


शेवटी हा वाद न्यायालयात गेला. तिथे त्यांचा दावा फेटाळल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रकल्प अधिकारी अशिमा मित्तल, जिल्हा कृषी अधिकारी दिलीप नेरकर, डहाणू तहसीलदार अभिजीत देशमुख, कृषी अधिकारी संतोष पवार, बांधकाम विभाग अधिकारी, कर्मचारी, महसूल कर्मचारी, पोलीस विभाग अधिकारी यांच्या साह्याने ही कारवाई करण्यात आली.


कारवाई केल्यानंतर लगेचच या जागेत कृषी विभागाचे क्षेत्रीय कार्यालय मंडल कृषी अधिकारी कासाअंतर्गत कृषी सहाय्यक कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्याचेसुद्धा उद्घाटन करण्यात आले. इंडो इस्माईल एग्रो इंद्रस्टीज कडून आम्हास फक्त २४ तास अगोदर साधे पत्र दिले होते. आगाऊ माहिती दिली असती, तर आम्ही आमचे सगळे सामान वाचवू शकलो असतो.

Comments
Add Comment

ई-गव्हर्नन्स मूल्यमापनात वसई–विरार पालिकेचा ‘नववा क्रमांक’ कायम

पालघर :  राज्यातील महानगरपालिकांच्या ई-गव्हर्नन्स कामकाजाच्या मूल्यमापनात वसई–विरार महानगरपालिकाने यंदाही

Virar: दारूच्या नशेत सापासोबत मस्ती बेतली जीवावर; विरारमध्ये तरुणाचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू

विरार: दारूच्या नशेत विषारी जातीच्या सापाला पकडणे आणि अति उत्साहाच्या भरात सापसोबतच मस्ती करणे विरार येथील एका

वसई-दिवा मार्गावर मेगाब्लॉक, शनिवारी आणि रविवारी प्रवाशांचे हाल

वसई : दिवा-वसई रोड मार्गावरील खारबाव (Kharbav) स्थानकात नवीन अप आणि डाऊन मालवाहू मार्गिकांच्या कामासाठी शनिवार आणि

धक्राकादायक! १५ वर्षाच्या भाच्याकडून आत्याचा खून

वसई : वसई परिसरामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रागाच्या भरात एका १५ वर्षीय मुलाने आपल्या आत्याचा खून

सत्तेचे गणित बिघडले; बेरजेचे गणित जमले

गणेश पाटील, विरार : वसई-विरारमध्ये एकापेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याची राजकीय शक्ती नसलेल्या भाजपने यावेळी

पाण्याच्या टाकीत मानवी हाडांचा सापळा

वसईच्या माणिकपूर गावातील घटना वसई : वसईच्या माणिकपूर येथील एका चाळीच्या रिकाम्या पाण्याच्या टाकीत पुरुषाच्या