दापचरीत अनधिकृत बांधकामावर हातोडा

कासा (वातार्हर) : डहाणू तालुक्यातील दापचरी बोर्डाच्या समोर असलेल्या जागेत कृषी विभागाच्या राज्यस्तरीय मध्यवर्ती फळ वाटिकेच्या प्रवेशद्वाराजवळ उभारलेल्या अनधिकृत बांधकामावर जिल्हा प्रशासनाने बुलडोझर लावून धडक कारवाई केली. कारवाई केल्यानंतर ती जागा कृषी विभागाच्या कार्यालयाच्या ताब्यात दिली.


दापचरी दुग्ध प्रकल्पातील चिकित्सलयाच्या इमारतीवर इंडो इस्माईल ऍग्रो इंडस्ट्रीज मुंबई यांनी अतिक्रमण केले होते येथे अतिक्रमण केलेल्या जागेत अनधिकृत बांधकाम करून पत्र्याचे शेड उभारून तेथे शैक्षणिक संस्था उभारली होती. ही जागा कृषी विभागाच्या ताब्यात होती. त्यांनी तीन वर्षासाठी इंडो इस्राईल ॲग्रो इंडस्ट्रिज मुंबई यांना भाडे तत्त्वावर दिली होती. कृषी विभागाने अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यासाठी पत्रव्यवहार केला. पण ती संस्था दाद देत नव्हती.


शेवटी हा वाद न्यायालयात गेला. तिथे त्यांचा दावा फेटाळल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रकल्प अधिकारी अशिमा मित्तल, जिल्हा कृषी अधिकारी दिलीप नेरकर, डहाणू तहसीलदार अभिजीत देशमुख, कृषी अधिकारी संतोष पवार, बांधकाम विभाग अधिकारी, कर्मचारी, महसूल कर्मचारी, पोलीस विभाग अधिकारी यांच्या साह्याने ही कारवाई करण्यात आली.


कारवाई केल्यानंतर लगेचच या जागेत कृषी विभागाचे क्षेत्रीय कार्यालय मंडल कृषी अधिकारी कासाअंतर्गत कृषी सहाय्यक कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्याचेसुद्धा उद्घाटन करण्यात आले. इंडो इस्माईल एग्रो इंद्रस्टीज कडून आम्हास फक्त २४ तास अगोदर साधे पत्र दिले होते. आगाऊ माहिती दिली असती, तर आम्ही आमचे सगळे सामान वाचवू शकलो असतो.

Comments
Add Comment

पश्चिम रेल्वेचे प्रवाशांच्या आशेवर पाणी

नवीन वेळापत्रकानंतरही लोकलचा खोळंबा कायम पालघर : पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकल वाढवणे आणि १८ डब्यांच्या

ओनिडा कंपनीच्या गेटवर कामगारांचा एल्गार

पगार रखडल्याने 'सत्याग्रह' सहाव्या दिवशीही सुरूच वाडा : कुडूस येथील प्रसिद्ध मिर्क इलेक्ट्रॉनिक्स (ओनिडा)

वरवाडा पुलाचा खेळखंडोबा!

पूर्वसूचना न देताच पादचारी पूल हटवला तलासरी : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरवाडा येथे असलेली

प्रचाराचा धुरळा शांत; उद्या मतदान

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन तयार विरार :वसई विरार शहर महानगरपालिकेच्या ११५ जागांसाठी गुरुवारी

मच्छीमारांसाठी २६ नव्या योजना राबविणार

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची ग्वाही वसई :मच्छीमार बांधवांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही

सूर्या प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणीपुरवठा सुरू

उजव्या तीर कालव्यावरील दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात पालघर :सूर्या प्रकल्पांतर्गत डहाणू व पालघर तालुक्यातील