पराभवाचेही सोने केले; पंकजा मुंडे यांचे गोपीनाथ गडावर वक्तव्य

बीड (वृत्तसंस्था) : माझी चिंता करू नका. मला सगळे विचारतात तुमचे भविष्य काय आहे. उद्या काय होणार आहे? तुम्हाला काय मिळणार आहे? याची मला खरंच चिंता नाही. दिलेल्या संधीचे सोने करणे हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत. माझ्या पराभवाचे देखील मला सोने करता आले, हा पराभव मला दिल्लीपर्यंत घेऊन गेला, असे प्रतिपादन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले.


भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी बीड येथील गोपीनाथ गडावर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची प्रमुख उपस्थिती होती. कोरोना काळानंतर दोन वर्षांनंतर गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी शुक्रवारी मोठ्या प्रमाणात मुंडे समर्थकांनी गोपीनाथ गडावर उपस्थिती दर्शवली.


आपल्याला काय मिळेल आणि काय नाही मिळणार याची चिंता करण्याची आवश्यकता नाही. आपल्याकडे जे आहे ते कसे आपल्याला बांधून ठेवता येईल, हे आपल्याला करायचे आहे, असे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.दरम्यान सत्तेसाठी नाही पण गोपीनाथ मुंडे हे सत्यासाठी लढले, वंचितांच्या हितासाठी भल्या-भल्यांना भिडले. निर्भीड होती वाणी आणि करारी होता बाणा. हिमालयाला टक्कर दिली पण वाकला नाही त्याचा कणा, अशा गोपीनाथ मुंडेंना आपण आपला नेता मानतो. असेही यावेळी पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवले.


दरम्यान यावेळी पंकजा मुंडे यांनी संकटांनो मी तुम्हाला शरण यावं एवढी तुमची औकात नाही. जीवनाच्या या रणांगणात पाय ठेवून मी ठाम उभी राहीन, एवढी ताकद माझ्या लोकांमध्ये आहे. सोसेल तुमचे वर्मी घाव तरी मी घायाळ होणार नाही, छाताडावर तुमच्या पाय देऊन समाजातील वंचितांसाठी लढण्यासाठी मी उभी राहीन, तुम्हाला कसे ते कळणार देखील नाही, असे देखील पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवले.

Comments
Add Comment

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयची मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह