पराभवाचेही सोने केले; पंकजा मुंडे यांचे गोपीनाथ गडावर वक्तव्य

  69

बीड (वृत्तसंस्था) : माझी चिंता करू नका. मला सगळे विचारतात तुमचे भविष्य काय आहे. उद्या काय होणार आहे? तुम्हाला काय मिळणार आहे? याची मला खरंच चिंता नाही. दिलेल्या संधीचे सोने करणे हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत. माझ्या पराभवाचे देखील मला सोने करता आले, हा पराभव मला दिल्लीपर्यंत घेऊन गेला, असे प्रतिपादन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले.


भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी बीड येथील गोपीनाथ गडावर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची प्रमुख उपस्थिती होती. कोरोना काळानंतर दोन वर्षांनंतर गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी शुक्रवारी मोठ्या प्रमाणात मुंडे समर्थकांनी गोपीनाथ गडावर उपस्थिती दर्शवली.


आपल्याला काय मिळेल आणि काय नाही मिळणार याची चिंता करण्याची आवश्यकता नाही. आपल्याकडे जे आहे ते कसे आपल्याला बांधून ठेवता येईल, हे आपल्याला करायचे आहे, असे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.दरम्यान सत्तेसाठी नाही पण गोपीनाथ मुंडे हे सत्यासाठी लढले, वंचितांच्या हितासाठी भल्या-भल्यांना भिडले. निर्भीड होती वाणी आणि करारी होता बाणा. हिमालयाला टक्कर दिली पण वाकला नाही त्याचा कणा, अशा गोपीनाथ मुंडेंना आपण आपला नेता मानतो. असेही यावेळी पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवले.


दरम्यान यावेळी पंकजा मुंडे यांनी संकटांनो मी तुम्हाला शरण यावं एवढी तुमची औकात नाही. जीवनाच्या या रणांगणात पाय ठेवून मी ठाम उभी राहीन, एवढी ताकद माझ्या लोकांमध्ये आहे. सोसेल तुमचे वर्मी घाव तरी मी घायाळ होणार नाही, छाताडावर तुमच्या पाय देऊन समाजातील वंचितांसाठी लढण्यासाठी मी उभी राहीन, तुम्हाला कसे ते कळणार देखील नाही, असे देखील पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवले.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या