दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर भारतीय संघ जाणार वेस्ट इंडिज दौऱ्यावर

मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय संघ सध्याच्या घडीला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी तयारी करत आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेत पाच ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. पण नंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे वृत्त पुढे आले आहे. या दौऱ्यात भारतीय संघ वेस्ट इंडिजबरोबर तीन वनडे आणि पाच ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.


भारताचा वेस्ट इंडिजमधील दौरा २२ जुलैला सुरु होणार आहे, हा दौरा ७ ऑगस्टपर्यंत असणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये २२ जुलैला पहिला वनडे सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे होणार आहे. त्यानंतर दुसरा वनडे सामना हा २४ जुलै आणि तिसरा वनडे सामना हा २७ जुलैला होणार आहे.


अन्य दोन्ही वनडे सामने हे पोर्ट ऑफ स्पेन येथील क्वीन्स पार्क ओव्हलवर होणार आहे. तिन्ही वनडे सामने हे संध्याकाळी ७.०० वाजता सुरु होणार आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामधील पाच ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका ही २९ जुलैपासून सुरु होणार आहे.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत