राज्यात मास्क सक्ती नाही पण गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात तूर्तास मास्क सक्ती करण्यात आली नसली तरी गर्दीच्या ठिकाणी जनतेने मास्क वापरावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढू लागला असून कोरोनाच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत गुरुवारी टास्क फोर्सची बैठक पार पडली. या बैठकीत जनतेला मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


पुढील १५ दिवस हे कोरोनाबाबत महत्वाचे असणार आहेत. कोरोनाच्या रुग्णसंख्येचा पंधरा दिवस अभ्यास केला जाईल. पुढच्या १५ दिवसांनंतर काही महत्वाचे निर्णय घेतले जातील. मास्क सक्ती नाही, परंतु घरातून बाहेर पडताना मास्क लावावा, असे आवाहन या बैठकीतून करण्यात आले आहे.


दरम्यान राज्यात आज सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येने हजाराचा टप्पा ओलांडल्याने मुख्यमंत्र्यांनी तातडीने टास्क फोर्ससोबत बैठक बोलावण्यात येऊन या बैठकीत सध्याच्या परिस्थितीवर आढावा घेण्यात आला. तसेच रुग्णवाढ रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना अंमलबजावणीचे निर्देश मपख्यमंत्र्यांनी दिले आहेत.


राज्यात आज सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या रुग्णसंख्येने हजाराचा टप्पा ओलांडला. आज राज्यात 1045 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 517 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज कोरोनामुळे एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागला आहे.


राज्यात आज 4559 सक्रिय रुग्ण आढळले असून मुंबईत सर्वाधिक म्हणजे 3324 सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्या खालोखाल ठाण्यामध्ये 555 सक्रिय रुग्ण आहेत.

Comments
Add Comment

Indigo Flight Cancellations : इंडिगोच्या गोंधळामुळे अडचणीत सापडलेल्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, असे करा प्रवासाचे नियोजन किंवा मिळवा रिफंड

मुंबई : देशातील सर्वात स्वस्त विमानसेवा म्हणून मिरवणाऱ्या इंडिगो कंपनीची आठवड्याभरात काही हजार उड्डाणं रद्द

एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलली; आयोगाने जाहीर केल्या नव्या तारखा

मुंबई : एमपीएससीची २१ डिसेंबर रोजी होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून आयोगाने नव्या तारखा जाहीर करून

नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची संधी

वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती महाराष्ट्र-बाडेन वुटेमबर्ग राज्यांदरम्यान संयुक्त

राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; जमीन मोजणीच्या शुल्कात मोठी कपात

मुंबई : राज्य सरकारने महसूल प्रशासन अधिक सशक्त करण्यासाठी अनेक बदल राबवले असून, आता शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा

'जिजामाता नगरवासियांच्या पुनर्वसनाचा विषय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडणार'

मुंबई :  मागील तीस वर्षांपासून काळाचौकी येथील जिजामाता नगरवासियांचे पुनर्वसन विकासकाच्या आडमुठेपणाच्या

चेंबूरमध्ये शिक्षणासाठी पाच किलोमीटर पायपीट

मराठी शाळेअभावी विद्यार्थ्यांचे हाल मुंबई : चेंबूर येथील वाशीनाका परिसरात पालिकेच्या मराठी माध्यमाची