ठाण्यातील लाभार्थींशी पंतप्रधानांनी साधला संवाद

  122

ठाणे (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमांतर्गत विविध केंद्रीय योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संवाद साधला. या कार्यक्रमाचे व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून येथील नियोजन भवनच्या सभागृहात थेट प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी विविध योजनांच्या लाभार्थ्यांसह लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.


दरम्यान, गरीब कल्याण संमेलन अंतर्गत सिमला येथे पंतप्रधानांच्या उपस्थित झालेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यावेळी करण्यात आले. यावेळी जिल्हास्तरीय कार्यक्रमात दीक्षा खांबळे, निवृत्ती मगर, श्रावण निर्गुडा, रमेश मार्तंड, संजितकुमार, सुशीलाबाई, आदर्श साबळे, धनश्री माने, सीताबाई मुकणे, शिल्पा पाटील, चंद्रकांत गायकर या लाभार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.


ठाणे जिल्हा नियोजन भवनच्या समिती सभागृहात झालेल्या जिल्हास्तरीय कार्यक्रमास आमदार रमेश पाटील, गीता जैन, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती वंदना भांडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी छायादेवी शिसोदे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी नरेंद्र भामरे, तहसीलदार राजाराम तवटे आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments
Add Comment

ठाण्यात यंदा टेंभीनाक्यावर अनुभवयाला मिळणार थरांचा थरार

ठाणे :  धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यात टेंभीनाका येथे दहिहंडी उत्सव सुरु करुन साहसी उत्सवाला एका उंचीवर नेऊन

सरकारी नोकरीच्या शोधात आहात? तर ही आहे तुमच्यासाठी गुडन्यूज

ठाणे महापालिकेत मेगाभरती, 'गट-क व गट-ड' पदांसाठी १ हजार ७७३ रिक्तपदे जाहीर

बांबूच्या चटईतून बाप्पाची शाश्वत आरास

देसले कुटुंबाचा संस्कृतीस्नेही उपक्रम ठाणे : गणेशोत्सव हा फक्त भक्तिभावाचा नव्हे तर संस्कृती, परंपरा आणि

Thane Varsha Marathon Winner: ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉनचे विजेते जाहीर! पुरुष गटात धर्मेंद्र आणि महिला गटात रविना गायकवाड ठरले विजेते

ठाणे,: 'मॅरेथॉन ठाण्याची.. उर्जा तरुणाईची' या घोषवाक्यासह आयोजित करण्यात आलेल्या एकतिसाव्या ठाणे महानगरपालिका

मुंबई-अहमदाबाद मार्गावरील वाहतूक कोंडीने घेतला जीव! रुग्णवाहिकेतच महिलेचा तडफडून मृत्यू

पालघर: गेल्या काही दिवसांपासून मुंबई-अहमदाबाद मार्गावर कमालीची वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून यात आहे. मात्र

मोरबे धरणाच्या पातळीत घट

नवी मुंबईकरांची वाढली पाण्याची चिंता वाशी : नवी मुंबई महापालिकेच्या मालकीच्या असणाऱ्या मोरबे धरणाच्या पातळीत