ठाण्यातील लाभार्थींशी पंतप्रधानांनी साधला संवाद

ठाणे (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमांतर्गत विविध केंद्रीय योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संवाद साधला. या कार्यक्रमाचे व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून येथील नियोजन भवनच्या सभागृहात थेट प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी विविध योजनांच्या लाभार्थ्यांसह लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.


दरम्यान, गरीब कल्याण संमेलन अंतर्गत सिमला येथे पंतप्रधानांच्या उपस्थित झालेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यावेळी करण्यात आले. यावेळी जिल्हास्तरीय कार्यक्रमात दीक्षा खांबळे, निवृत्ती मगर, श्रावण निर्गुडा, रमेश मार्तंड, संजितकुमार, सुशीलाबाई, आदर्श साबळे, धनश्री माने, सीताबाई मुकणे, शिल्पा पाटील, चंद्रकांत गायकर या लाभार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.


ठाणे जिल्हा नियोजन भवनच्या समिती सभागृहात झालेल्या जिल्हास्तरीय कार्यक्रमास आमदार रमेश पाटील, गीता जैन, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती वंदना भांडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी छायादेवी शिसोदे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी नरेंद्र भामरे, तहसीलदार राजाराम तवटे आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments
Add Comment

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा पुन्हा हल्ला; ७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, परिसरात संताप

कल्याण : काही दिवसांपूर्वीच कुत्र्याच्या चाव्यानंतर भीतीतून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती.

भटका कुत्रा चावला अन् तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

कल्याण : दहशतवादी संघटनांप्रमाणेच आता भटक्या कुत्रांचीही दहशत अनेक शहरात वाऱ्यासारखी परसरत आहेत. अनेक

ठाणाच्या नगरसेवकांचा वेगळाच थाट; ठाणे महापालिकेच्या दारात सजल्या आलिशान गाड्या

ठाणे : कार एक्स्पो नव्हे तर ठाण्याच्या महानगरपालिका मुख्यालयाच अंगण आलिशान गाड्यांनी व्यापून गेलं होत. निमित्त

डोंबिवलीत जलवाहिनी फुटली, हजारो लीटर पाण्याची नासाडी

डोंबिवली : डोंबिवलीत जेसीबीचा धक्का लागल्यामुळे जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाण्याची

Thane Municipal Corporation : ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये ठाणे महापालिकेने पटकाविला तिसरा क्रमांक

ठाणे : राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरण बदल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’

Ravindra Chavan : भिवंडी पालिकेत बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई करणार : रवींद्र चव्हाण

काँग्रेसच्या सहकार्याने भाजपचे बंडखोर महापौर पदी मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत