बोईसरमधील अनधिकृत बांधकामांवर हातोडा

  47

बोईसर (वार्ताहर) : बोईसर महसूल विभागाने धनानीनगर, कृष्णानगर, दांडी पाडा येथील शासकीय तसेच आदिवासी जागेवरील एकूण तीन ठिकाणी अनधिकृत बांधकामावर हातोडा मारून बांधकामे निष्कासित करून कारवाई केली. पालघर तहसीलदार सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जेसीबीच्या साहाय्याने ही बांधकामे पाडली. या कारवाईने शासकीय भूखंड तसेच आदिवासींच्या जागेवर अनधिकृतरीत्या बांधकामे करणाऱ्यांचे धाबे दणाणले.


बोईसर-तारापूर औद्योगिक वसाहतीमुळे येथील परिसरातील जमिनीला सोन्याचा भाव मिळत आहे. यातच भूमाफियांकडून शासकीय भूखंड मोठ्या प्रमाणात हडप करण्यात आले असून, त्यावर गाळे व चाळी बांधल्या आहेत. परप्रांतीय तसेच बिगर आदिवासींकडून आदिवासींना विविध आमिषे दाखवून त्यांच्या जमिनी कवडी मोलाने वाणिज्य वापरासाठी घेतल्या आहेत. मुळात आदिवासींना शेती करण्यासाठी शासनाकडून देण्यात आलेल्या जमिनीवर परप्रांतीयांनी मोठ्या प्रमाणात चाळीच्या चाळी व गाळ्याचे अनधिकृत बांधकामे उभी केली आहेत. याबाबत अनेक तक्रारी महसूल कार्यालयात केल्या होत्या. त्या आनुषंगाने खुद्द तहसीलदार सुनील शिंदे यांनी हजेरी लावत ही बांधकामे जमीनदोस्त केली.


बोईसर परिसराच्या काटकर पाडा येथील आदिवासी जमिनीवर अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या सुमारे २० खोल्या भुईसपाट केल्या. धनानी नगरमधील खासगी जागेवरील आणि दांडीपाडा येथील शासकीय जागेवरील अतिक्रमण निष्कासित केले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यावेळी नायब तहसीलदार किशोर तरंगे, बोईसरचे मंडळ अधिकारी मनीष वर्तक, तारापूर मंडळ अधिकारी अनिल वायाल, तलाठी हितेश राउत, संजय चुरी, उज्ज्वला पाटील, साधना चव्हाण, सोपान पवार, अनंता पाटील आणि महसूल कर्मचारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

नुकसानग्रस्तांसाठी मिळाला पाऊणे दोन कोंटीचा निधी

पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश पालघर : अवकाळी पावसामुळे पालघर जिल्ह्यातील घरे, शेती, फळशेती, मत्स्य

युवक ठरला नियोजनशून्य व्यवस्थेचा बळी!

दुसऱ्याची चूक जयेशच्या जीवावर बेतली विरार: विजेच्या धक्क्याने अर्नाळा येथे मृत्यू झालेल्या जयेश घरत हा केवळ

५० लाख बांबू वृक्ष लागवडीचा शुभारंभ

भातशेतीपेक्षा बांबूशेती करण्याचे आवाहन पालघर : संपूर्ण विश्वभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असताना दुर्गम

घरकुलासाठी ९१,९९१ कुटुंबाचे सर्वेक्षण !

१८ जूनपर्यंत आणखी मुदतवाढ; नागरिकांना मिळणार हक्काचे घर पालघर : "सर्वांसाठी घरे" शासनाच्या या धोरणाची यशस्वी

वसईतील पारंपरिक व्यवसाय संकटात!

वसई : वसईचा परिसर हा पारंपरिक व्यवसायात अग्रेसर असा परिसर म्हणून ओळखला जातो. या परिसरातील स्थानिक भूमिपुत्रांनी

'शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये'

पालघर :भारतीय हवामान विभागाने प्रसारित केलेल्या विस्तारित श्रेणी हवामान अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात पुढील एक