बोईसरमधील अनधिकृत बांधकामांवर हातोडा

  63

बोईसर (वार्ताहर) : बोईसर महसूल विभागाने धनानीनगर, कृष्णानगर, दांडी पाडा येथील शासकीय तसेच आदिवासी जागेवरील एकूण तीन ठिकाणी अनधिकृत बांधकामावर हातोडा मारून बांधकामे निष्कासित करून कारवाई केली. पालघर तहसीलदार सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जेसीबीच्या साहाय्याने ही बांधकामे पाडली. या कारवाईने शासकीय भूखंड तसेच आदिवासींच्या जागेवर अनधिकृतरीत्या बांधकामे करणाऱ्यांचे धाबे दणाणले.


बोईसर-तारापूर औद्योगिक वसाहतीमुळे येथील परिसरातील जमिनीला सोन्याचा भाव मिळत आहे. यातच भूमाफियांकडून शासकीय भूखंड मोठ्या प्रमाणात हडप करण्यात आले असून, त्यावर गाळे व चाळी बांधल्या आहेत. परप्रांतीय तसेच बिगर आदिवासींकडून आदिवासींना विविध आमिषे दाखवून त्यांच्या जमिनी कवडी मोलाने वाणिज्य वापरासाठी घेतल्या आहेत. मुळात आदिवासींना शेती करण्यासाठी शासनाकडून देण्यात आलेल्या जमिनीवर परप्रांतीयांनी मोठ्या प्रमाणात चाळीच्या चाळी व गाळ्याचे अनधिकृत बांधकामे उभी केली आहेत. याबाबत अनेक तक्रारी महसूल कार्यालयात केल्या होत्या. त्या आनुषंगाने खुद्द तहसीलदार सुनील शिंदे यांनी हजेरी लावत ही बांधकामे जमीनदोस्त केली.


बोईसर परिसराच्या काटकर पाडा येथील आदिवासी जमिनीवर अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या सुमारे २० खोल्या भुईसपाट केल्या. धनानी नगरमधील खासगी जागेवरील आणि दांडीपाडा येथील शासकीय जागेवरील अतिक्रमण निष्कासित केले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यावेळी नायब तहसीलदार किशोर तरंगे, बोईसरचे मंडळ अधिकारी मनीष वर्तक, तारापूर मंडळ अधिकारी अनिल वायाल, तलाठी हितेश राउत, संजय चुरी, उज्ज्वला पाटील, साधना चव्हाण, सोपान पवार, अनंता पाटील आणि महसूल कर्मचारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

पालघर नगर परिषदेचे पैसे ‘पाण्यात’!

२० गावांकडे ७ कोटी थकले पालघर : पालघर नगर परिषदेसह जवळच्या वीस गावांनी गेल्या पंधरा वर्षापासून एकाच योजनेतून

कंत्राटदारांपुढे महापालिका हतबल!

पुन्हा उघडल्या ठोक रकमेच्या निविदा विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची सर्व कामे यापुढे

खड्ड्यातील पाण्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू

पालघर : खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बोईसर मधील

जिल्ह्यात पेरणीची कामे अंतिम टप्प्यात

सहा हजार हेक्टरवर भातपेरणी, जिल्ह्यात ८९ हजार हेक्टरवर होणार भाताची लागवड अलिबाग  : पावसाळ्याला यंदा मे

आणीबाणी काळ म्हणजे स्वातंत्र्याची दुसरी लढाई !

पालघर: संपूर्ण देशात लोकशाही मजबूत होत असताना २५ जून १९७५ रोजी संविधानाची हत्या करून आणीबाणी लागू केली. या

सूर्या प्रकल्पातून वाढीव पाणी मिळणार नाही

पालघरसह २० गावांना शोधावा लागणार दुसरा पर्याय गणेश पाटील पालघर : पालघर नगर परिषद क्षेत्रासह नजीकच्या २० गावांना