बोईसरमधील अनधिकृत बांधकामांवर हातोडा

  67

बोईसर (वार्ताहर) : बोईसर महसूल विभागाने धनानीनगर, कृष्णानगर, दांडी पाडा येथील शासकीय तसेच आदिवासी जागेवरील एकूण तीन ठिकाणी अनधिकृत बांधकामावर हातोडा मारून बांधकामे निष्कासित करून कारवाई केली. पालघर तहसीलदार सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जेसीबीच्या साहाय्याने ही बांधकामे पाडली. या कारवाईने शासकीय भूखंड तसेच आदिवासींच्या जागेवर अनधिकृतरीत्या बांधकामे करणाऱ्यांचे धाबे दणाणले.


बोईसर-तारापूर औद्योगिक वसाहतीमुळे येथील परिसरातील जमिनीला सोन्याचा भाव मिळत आहे. यातच भूमाफियांकडून शासकीय भूखंड मोठ्या प्रमाणात हडप करण्यात आले असून, त्यावर गाळे व चाळी बांधल्या आहेत. परप्रांतीय तसेच बिगर आदिवासींकडून आदिवासींना विविध आमिषे दाखवून त्यांच्या जमिनी कवडी मोलाने वाणिज्य वापरासाठी घेतल्या आहेत. मुळात आदिवासींना शेती करण्यासाठी शासनाकडून देण्यात आलेल्या जमिनीवर परप्रांतीयांनी मोठ्या प्रमाणात चाळीच्या चाळी व गाळ्याचे अनधिकृत बांधकामे उभी केली आहेत. याबाबत अनेक तक्रारी महसूल कार्यालयात केल्या होत्या. त्या आनुषंगाने खुद्द तहसीलदार सुनील शिंदे यांनी हजेरी लावत ही बांधकामे जमीनदोस्त केली.


बोईसर परिसराच्या काटकर पाडा येथील आदिवासी जमिनीवर अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या सुमारे २० खोल्या भुईसपाट केल्या. धनानी नगरमधील खासगी जागेवरील आणि दांडीपाडा येथील शासकीय जागेवरील अतिक्रमण निष्कासित केले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यावेळी नायब तहसीलदार किशोर तरंगे, बोईसरचे मंडळ अधिकारी मनीष वर्तक, तारापूर मंडळ अधिकारी अनिल वायाल, तलाठी हितेश राउत, संजय चुरी, उज्ज्वला पाटील, साधना चव्हाण, सोपान पवार, अनंता पाटील आणि महसूल कर्मचारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

पालिका अधिकाऱ्याकडे ३१ कोटींची अपसंपदा

लाचलुचपत विभागाकडून गुन्हा दाखल विरार  : वसई-विरार महापालिकेचे निलंबित उपसंचालक नगररचना वाय.एस. रेड्डी

जिल्ह्याची कृषिप्रधान ओळख मिटण्याची चिन्हे

वसंत भोईर वाडा : शासनाच्या शेतीकडे पाहण्याच्या उदासीन धोरणामुळे जिल्ह्यातील पारंपरिक शेतीव्यवसाय अडचणीत आला

अवैध बांधकामांना माजी आयुक्तच जबाबदार

‘ईडी’ कार्यालयाकडून भांडाफोड विरार : वसई-विरार पालिका क्षेत्रात करण्यात आलेल्या घोटाळ्यामध्ये अनिलकुमार पवार

वसईत 'भूतांचा' अनोखा आंदोलन: स्मशानभूमी वाचवण्यासाठी प्रयत्न!

मुंबई : मुंबईपासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या वसईत, स्थानिकांनी एका अनोख्या आणि सर्जनशील पद्धतीने

घोडबंदर ते तलासरी महामार्ग धोकादायक स्थितीत

तातडीने लक्ष द्यावे अशी खासदारांची मागणी वाडा : पालघर लोकसभा मतदारसंघातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८

प्रियकरासोबत रंगेहाथ सापडल्याने पतीची हत्या करणाऱ्या पत्नीला अटक

घरातच गाडले, भावानेच घरातील फरशा बदलल्या नालासोपारा : नालासोपारा येथे प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले गेल्यानंतर