ॲटोमोबाइलच्या विद्यार्थ्यांनी बनवली बोटकार


  • वीस दिवसांत बनवली कार

  • वीस हजारांचा आला खर्च


वाडा (वार्ताहर) : ॲटोमोबाइल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी जमीन व पाण्यावर चालणारी बोटकार बनवली आहे. त्यांच्या या कामाचे कौतुक केले जात आहे. तन्मय पाटील (चिंचघरपाडा, ता. वाडा), प्रणय हाराळे (नवी मुंबई), दीप्तेश मांढरे (खांबाळा ता. भिवंडी), चिन्मय चव्हाण (डोंबिवली) अशी त्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.


शहापूर येथे शिवाजीराव जोंधळे महाविद्यालयात हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना महाविद्यालयाकडून प्रकल्प बनवायला सांगितला असता या चौघांनी एकत्र येऊन बोटकारची संकल्पना मांडली. त्यानंतर त्यांनी यूट्यूबवर सर्च करीत १९८५ साली बनवलेली ब्रिटिशकालीन कार बघितली व त्याप्रमाणे त्यांनी एक वेगळ्या धाटणीची बोटकार बनवायला सुरुवात केली.


यासाठी त्यांनी फायबर टॅक, बॉक्स पाइप, स्प्लेंडर दुचाकीचे इंजिन, लोडो टायर, कास्टिंग रॉड, मेटल प्लेटस, डिस्क ब्रेक, चेन ड्राय व इको गाडीचे स्टिअरिंग असे साहित्य वापरून त्यांनी जमिनीवर व पाण्यावर चालणारी कार बनवली असून तिची चाचणी घेतली असता ती दोन्ही ठिकाणी व्यवस्थितरीत्या चालत आहे. ही कार बनवण्यासाठी त्यांना २० दिवसांचा कालावधी लागला.


यासाठी २० हजारांचा खर्च आला आहे. या कामी त्यांना इंजिनीअर कॉलजचे शिक्षक दीपक पाटील, महेंद्र पाटील, शिवाजी अय्यर यांचे मार्गदर्शन लाभले. बोटकार यशस्वीपणे साकारल्यानंतर तिला प्रकल्पासाठी जोंधळे महाविद्यालयात ठेवण्यात आले आहे.

Comments
Add Comment

मच्छीमारांना आता क्यूआर कोडचे ओळखपत्र

हानिकारक मासेमारीवर बंदी नवीन नियमानुसार, एलईडीद्वारे मासे पकडणे, पेयर ट्रॉलिंग आणि बुल ट्रॉलिंगसारख्या

पालघर नगर परिषदेत तिरंगी लढतीची चिन्हे!

मोबिन शेख पालघर : आगामी पालघर नगर परिषद निवडणुकीत राजकीय समीकरणांमध्ये चुरस वाढली असून तिरंगी लढतीचे संकेत

विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम सुरू होण्याच्या दिशेने एक पाऊल

चार तासांचा प्रवास केवळ दीड तासांत होणार मुंबई  : गेल्या ९ वर्षांपासून रखडलेल्या विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम

खासदार डॉ. सवरा पालघरचे निवडणूक प्रभारी

आमदार राजन नाईक वसई-विरारचे निवडणूक प्रमुख पालघर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता

विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या भूसंपादनाच्या कर्जास शासन हमी

मुंबई : विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला

पालघर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कामास गती देण्यासाठी वॉररुमध्ये हा प्रकल्प घेण्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश

मुंबई : पालघरमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याच्या परिसरातील