Categories: पालघर

ॲटोमोबाइलच्या विद्यार्थ्यांनी बनवली बोटकार

Share
  • वीस दिवसांत बनवली कार
  • वीस हजारांचा आला खर्च

वाडा (वार्ताहर) : ॲटोमोबाइल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी जमीन व पाण्यावर चालणारी बोटकार बनवली आहे. त्यांच्या या कामाचे कौतुक केले जात आहे. तन्मय पाटील (चिंचघरपाडा, ता. वाडा), प्रणय हाराळे (नवी मुंबई), दीप्तेश मांढरे (खांबाळा ता. भिवंडी), चिन्मय चव्हाण (डोंबिवली) अशी त्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.

शहापूर येथे शिवाजीराव जोंधळे महाविद्यालयात हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना महाविद्यालयाकडून प्रकल्प बनवायला सांगितला असता या चौघांनी एकत्र येऊन बोटकारची संकल्पना मांडली. त्यानंतर त्यांनी यूट्यूबवर सर्च करीत १९८५ साली बनवलेली ब्रिटिशकालीन कार बघितली व त्याप्रमाणे त्यांनी एक वेगळ्या धाटणीची बोटकार बनवायला सुरुवात केली.

यासाठी त्यांनी फायबर टॅक, बॉक्स पाइप, स्प्लेंडर दुचाकीचे इंजिन, लोडो टायर, कास्टिंग रॉड, मेटल प्लेटस, डिस्क ब्रेक, चेन ड्राय व इको गाडीचे स्टिअरिंग असे साहित्य वापरून त्यांनी जमिनीवर व पाण्यावर चालणारी कार बनवली असून तिची चाचणी घेतली असता ती दोन्ही ठिकाणी व्यवस्थितरीत्या चालत आहे. ही कार बनवण्यासाठी त्यांना २० दिवसांचा कालावधी लागला.

यासाठी २० हजारांचा खर्च आला आहे. या कामी त्यांना इंजिनीअर कॉलजचे शिक्षक दीपक पाटील, महेंद्र पाटील, शिवाजी अय्यर यांचे मार्गदर्शन लाभले. बोटकार यशस्वीपणे साकारल्यानंतर तिला प्रकल्पासाठी जोंधळे महाविद्यालयात ठेवण्यात आले आहे.

Recent Posts

Summer Tips : उन्हाळ्यात कशी घ्यावी डोळ्यांची काळजी, जाणून घ्या ‘या’ गोष्टी!

मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…

11 minutes ago

क्रिकेटपटूंच्या कराराची BCCI ने केली घोषणा, ३४ खेळाडूंशी करार; फक्त चार खेळाडूंचा ए+ मध्ये समावेश

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…

42 minutes ago

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा २६/११ च्या हल्ल्यामागे अदृश्य हात, भाजपाच्या माधव भांडारींचा आरोप

मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…

1 hour ago

Benefits Of Watermelon : कलिंगड खा अन् हायड्रेट राहा!

ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…

1 hour ago

Emraan Hashmi: इमरान हाश्मीच्या नव्या चित्रपटावर भाजपा आणि काँग्रेस खासदारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया!

मुंबई: इमरान हाश्मीचा नवा चित्रपट 'ग्राउंड झिरो' सध्या चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर झाला.…

2 hours ago

जम्मू काश्मीरला पावसाचा जबर तडाखा, शाळा बंद, वाहतूक कोलमडल्यामुळे जनजीवन विस्कळीत

श्रीनगर : सलग तीन दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. लडाख या केंद्राशासित भागात…

2 hours ago