ॲटोमोबाइलच्या विद्यार्थ्यांनी बनवली बोटकार

  88


  • वीस दिवसांत बनवली कार

  • वीस हजारांचा आला खर्च


वाडा (वार्ताहर) : ॲटोमोबाइल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी जमीन व पाण्यावर चालणारी बोटकार बनवली आहे. त्यांच्या या कामाचे कौतुक केले जात आहे. तन्मय पाटील (चिंचघरपाडा, ता. वाडा), प्रणय हाराळे (नवी मुंबई), दीप्तेश मांढरे (खांबाळा ता. भिवंडी), चिन्मय चव्हाण (डोंबिवली) अशी त्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.


शहापूर येथे शिवाजीराव जोंधळे महाविद्यालयात हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना महाविद्यालयाकडून प्रकल्प बनवायला सांगितला असता या चौघांनी एकत्र येऊन बोटकारची संकल्पना मांडली. त्यानंतर त्यांनी यूट्यूबवर सर्च करीत १९८५ साली बनवलेली ब्रिटिशकालीन कार बघितली व त्याप्रमाणे त्यांनी एक वेगळ्या धाटणीची बोटकार बनवायला सुरुवात केली.


यासाठी त्यांनी फायबर टॅक, बॉक्स पाइप, स्प्लेंडर दुचाकीचे इंजिन, लोडो टायर, कास्टिंग रॉड, मेटल प्लेटस, डिस्क ब्रेक, चेन ड्राय व इको गाडीचे स्टिअरिंग असे साहित्य वापरून त्यांनी जमिनीवर व पाण्यावर चालणारी कार बनवली असून तिची चाचणी घेतली असता ती दोन्ही ठिकाणी व्यवस्थितरीत्या चालत आहे. ही कार बनवण्यासाठी त्यांना २० दिवसांचा कालावधी लागला.


यासाठी २० हजारांचा खर्च आला आहे. या कामी त्यांना इंजिनीअर कॉलजचे शिक्षक दीपक पाटील, महेंद्र पाटील, शिवाजी अय्यर यांचे मार्गदर्शन लाभले. बोटकार यशस्वीपणे साकारल्यानंतर तिला प्रकल्पासाठी जोंधळे महाविद्यालयात ठेवण्यात आले आहे.

Comments
Add Comment

वसईत डॉक्टरच्या ऑटोमॅटीक ईव्ही कारचा थरकाप उडवणारा अपघात

वसई : वसई येथील सन सिटी परिसरात एका डॉक्टरचा आणि त्याच्या पत्नीचा भयानक अपघात झाला. मिथिलेश मिश्रा असं या

आरक्षण बदलाचा ‘गेम’ सर्वाधिक चर्चेत

पवार, रेड्डींचा मोठा प्रताप फसला गणेश पाटील विरार : बांधकाम परवानगी देताना लाच स्वीकारण्यासाठी 'रेट' ठरवून मलिदा

पालिका अधिकाऱ्याकडे ३१ कोटींची अपसंपदा

लाचलुचपत विभागाकडून गुन्हा दाखल विरार  : वसई-विरार महापालिकेचे निलंबित उपसंचालक नगररचना वाय.एस. रेड्डी

जिल्ह्याची कृषिप्रधान ओळख मिटण्याची चिन्हे

वसंत भोईर वाडा : शासनाच्या शेतीकडे पाहण्याच्या उदासीन धोरणामुळे जिल्ह्यातील पारंपरिक शेतीव्यवसाय अडचणीत आला

अवैध बांधकामांना माजी आयुक्तच जबाबदार

‘ईडी’ कार्यालयाकडून भांडाफोड विरार : वसई-विरार पालिका क्षेत्रात करण्यात आलेल्या घोटाळ्यामध्ये अनिलकुमार पवार

वसईत 'भूतांचा' अनोखा आंदोलन: स्मशानभूमी वाचवण्यासाठी प्रयत्न!

मुंबई : मुंबईपासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या वसईत, स्थानिकांनी एका अनोख्या आणि सर्जनशील पद्धतीने