चार वर्षांच्या कष्टाचे झाले चीज...

शहापूर (वार्ताहर) : देशातल्या सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या यूपीएससी परीक्षेत शहापूर तालुक्यातील टहारपूर विद्यालयाचे शिक्षक विजय पाटील व साखरोली जि. प. शाळेच्या शिक्षिका ललिता पाटील यांचा मुलगा नीरज पाटीलने घवघवीत यश मिळवले आहे. गेल्या चार वर्षांपासून नीरज जीवतोड मेहनत करत होता. अखेर त्याच्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान नीरजच्या वडिलांनी बोलून दाखवले. यूपीएससीच्या अंतिम निकालात नीरज ५६० रँक घेऊन उत्तीर्ण झाला.


इंजिनिअर झाल्यावर नीरज स्वस्थ बसला नाही. त्याला नागरी सेवेत जायचे होते. त्यादृष्टीने त्याने युपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली़ त्यासाठी त्यांनी पुणे येथे युनिक ॲकॅडमीमध्ये अभ्यास सुरू केला़ जीवतोड मेहनतीचे फळ म्हणून मागील वर्षी त्याची रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियामध्ये नागपूर येथे क्लासवन पोस्टवर व्यवस्थापकपदी नियुक्ती झाली.


मात्र त्याने यूपीएससी परीक्षेची तयारी सोडली नाही. अखेर आपल्या स्वप्नरूपी वृटवृक्षाला त्याने नियमित अभ्यासाचे खतपाणी घातले आणि यश खेचून आणले.

Comments
Add Comment

ठाण्यात 'जय श्रीराम'वाला महापौर बसवा; नाहीतर 'हिरवे' गुलाल उधळतील!

मंत्री नितेश राणे यांचा इशारा ठाणे : ''एकीकडे संविधानाच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे धर्माच्या नावाने

मुरबाड तालुक्यात १५ जानेवारीला विज्ञान प्रदर्शन

मुरबाड :मुरबाड तालुक्यातील धसई येथे १५ जानेवारी २०२६ रोजी भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सेवा

निवडणूक कर्तव्य टाळणाऱ्या पवार स्कूलच्या ८० कर्मचाऱ्यांवर गुन्हा

कल्याण: कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ चे कामकाज पारदर्शक, सुरळीत आणि विहित वेळेत

कल्याण पूर्वेतील अपक्ष उमेदवाराच्या प्रचारात बलात्कारातील आरोपी

कल्याण : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस स्टेशन परिसरात आज तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. २१ वर्षीय एअर

ठाण्यात महायुतीचा वचननामा जाहीर

ठाणे स्मार्ट व ग्लोबल शहर बनवण्याचा निर्धार ठाणे  : महायुतीने ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आपला वचननामा

मंत्री नितेश राणे आज ठाण्यात

सीताराम राणे यांचा करणार प्रचार ठाणे  : ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५-ड चे भाजप-शिवसेना-रिपाई महायुतीचे