चार वर्षांच्या कष्टाचे झाले चीज...

शहापूर (वार्ताहर) : देशातल्या सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या यूपीएससी परीक्षेत शहापूर तालुक्यातील टहारपूर विद्यालयाचे शिक्षक विजय पाटील व साखरोली जि. प. शाळेच्या शिक्षिका ललिता पाटील यांचा मुलगा नीरज पाटीलने घवघवीत यश मिळवले आहे. गेल्या चार वर्षांपासून नीरज जीवतोड मेहनत करत होता. अखेर त्याच्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान नीरजच्या वडिलांनी बोलून दाखवले. यूपीएससीच्या अंतिम निकालात नीरज ५६० रँक घेऊन उत्तीर्ण झाला.


इंजिनिअर झाल्यावर नीरज स्वस्थ बसला नाही. त्याला नागरी सेवेत जायचे होते. त्यादृष्टीने त्याने युपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली़ त्यासाठी त्यांनी पुणे येथे युनिक ॲकॅडमीमध्ये अभ्यास सुरू केला़ जीवतोड मेहनतीचे फळ म्हणून मागील वर्षी त्याची रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियामध्ये नागपूर येथे क्लासवन पोस्टवर व्यवस्थापकपदी नियुक्ती झाली.


मात्र त्याने यूपीएससी परीक्षेची तयारी सोडली नाही. अखेर आपल्या स्वप्नरूपी वृटवृक्षाला त्याने नियमित अभ्यासाचे खतपाणी घातले आणि यश खेचून आणले.

Comments
Add Comment

सात वर्षांच्या बांधकामांनंतर खड्डेमय ‘पलावा’चे उद्घाटन

७२ कोटींच्या खर्चानंतरही उड्डाणपुलाला ‘निसरडा भागा’ची उपमा मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील कल्याण-शीळ

कल्याण रेल्वे स्टेशनवर चोरांचा धुमाकूळ

कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशनवर चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटनांची नोंद झाली आहे, ज्यात दोन प्रवाशांकडून एकूण

ठाणे जिल्हा परिषदेची 'डोअरस्टेप डिलिव्हरी' योजना आहे तरी काय?

ठाणे: ठाणे जिल्हा परिषदेने 'डोअरस्टेप डिलिव्हरी' (Doorstep Delivery) नावाची नवीन योजना सुरू केली आहे, ज्यामुळे जिल्ह्यातील

Navratri 2025 : नवरात्री मंडपामुळे ठाण्यात 'या' भागात वाहतूक कोंडी

ठाणे: नवरात्री सणाच्या तयारीमुळे ठाण्यातील टेंभीनाका चौकात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येते. आजपासून येथे

कल्याणमधील रामदेव हॉटेलचा हलगर्जीपणा, फ्राईड राईसमध्ये आढळले झुरळ!

कल्याण: कल्याणमधील रामदेव या नामांकित शाकाहारी हॉटेलसंबंधित एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. या हॉटेलच्या

पतीकडून पत्नीची हत्या, शरीराचे केले १७ तुकडे

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात एका नराधम पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या करून तिच्या शरीराचे १७ तुकडे