चार वर्षांच्या कष्टाचे झाले चीज...

शहापूर (वार्ताहर) : देशातल्या सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या यूपीएससी परीक्षेत शहापूर तालुक्यातील टहारपूर विद्यालयाचे शिक्षक विजय पाटील व साखरोली जि. प. शाळेच्या शिक्षिका ललिता पाटील यांचा मुलगा नीरज पाटीलने घवघवीत यश मिळवले आहे. गेल्या चार वर्षांपासून नीरज जीवतोड मेहनत करत होता. अखेर त्याच्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान नीरजच्या वडिलांनी बोलून दाखवले. यूपीएससीच्या अंतिम निकालात नीरज ५६० रँक घेऊन उत्तीर्ण झाला.


इंजिनिअर झाल्यावर नीरज स्वस्थ बसला नाही. त्याला नागरी सेवेत जायचे होते. त्यादृष्टीने त्याने युपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली़ त्यासाठी त्यांनी पुणे येथे युनिक ॲकॅडमीमध्ये अभ्यास सुरू केला़ जीवतोड मेहनतीचे फळ म्हणून मागील वर्षी त्याची रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियामध्ये नागपूर येथे क्लासवन पोस्टवर व्यवस्थापकपदी नियुक्ती झाली.


मात्र त्याने यूपीएससी परीक्षेची तयारी सोडली नाही. अखेर आपल्या स्वप्नरूपी वृटवृक्षाला त्याने नियमित अभ्यासाचे खतपाणी घातले आणि यश खेचून आणले.

Comments
Add Comment

मुरबाडमधील शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा होण्यास सुरुवात

मुरबाड : मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाने सन २०२४-२५ या हंगामासाठी ज्या शेतकऱ्यांची भातविक्रीसाठी ऑनलाईन

कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपमध्ये प्रवेश

उल्हासनगरात उबाठा सेनेला धक्का उल्हासनगर : उल्हासनगरमधील उबाठा गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून कल्याण

ठाण्यात महाविकास आघाडीची ‘बिघाडी’?

महाविकास आघाडीच्या नेत्यांची मोट बांधण्यास सुरुवात काँग्रेसच्या ३५ जागा वाटपाच्या मागणीने अधिक तिढा

नवी मुंबईत कचऱ्यापासून निर्मित खताला मानांकित ओळख

राज्य नोंदणीकृत ‘हरित महासिटी कंपोस्ट’ ब्रॅण्ड  नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन

नवी मुंबई महापालिकेसाठी भाजप-शिवसेनेत ‘कांटे की टक्कर’

दोन्ही पक्षांकडे प्रत्येकी ५४ माजी नगरसेवकांचे संख्याबळ नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या

मीरा भाईंदरच्या मच्छीमारांच्या सर्व समस्या सोडवणार, मंत्री नितेश राणेंचे आश्वासन

भाईंदर : मीरा भाईंदर शहरातील उत्तन परिसरातील मच्छीमारांवर होत असलेला अन्याय दूर करून त्यांच्या सर्व समस्या