पालिकेच्या शाळेत यंदा ३५ हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश

  88

मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या काही वर्षांपासून मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी संख्या कमी होताना पाहायला मिळत होती. विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी पालिकेने अनेक उपाययोजनाही केल्या होत्या. त्यानंतर आता पालिका शाळांना चांगले दिवस आले असल्याचे पाहायला मिळत आहे, तर आतापर्यंत सुमारे ३५ हजार विद्यार्थ्यांनी पालिकेच्या शाळेत प्रवेश घेतला आहे.


महापालिका शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढावी आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळावे यासाठी महापालिकेने इंग्रजी माध्यम, सीबीएसई, आयसीएसई मंडळाच्या शाळा सुरू केल्या. त्यानंतर शाळांची डागडुजी करून आधुनिकीकरण देखील केले. शाळांच्या इमारती आकर्षक केल्या गेल्या तसेच शाळेत आधुनिक शिक्षण, डिजिटल शिक्षण देखील सुरू केले आणि यामुळे हळूहळू पुन्हा पालक या शाळांकडे वळू लागले आणि आपल्या मुलांचे प्रवेश पालिकेच्या शाळांमध्ये करण्यास सुरुवात केली.



यामुळे गेल्याकाही वर्षांपासून असलेले पालिकेच्या शाळेतील चित्र बदलू लागले असून याआधी शैक्षणिक वर्षांत पालिकेच्या शाळांमध्ये २९ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता, तर या वर्षी प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्यापासून आतापर्यंत ३५ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.


दरम्यान पालिकेच्या शाळा मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, तमिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती अशा आठ भाषांमध्ये आहेत, तर नर्सरी ते दहावीपर्यंतच्या सुमारे १,१५० शाळांमध्ये सध्या तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तर विद्यार्थ्यांना पालिकेकडून विद्यार्थ्यांना २७ शैक्षणिक वस्तू तसेच टॅब वाटपही केले जाते, तर वर्चुअल क्लासच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना शिकवले जात आहे.

Comments
Add Comment

'समितीचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे, परंतु हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत'

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा सरकारला इशारा मुंबई : राज्य सरकारने त्रिभाषा संदर्भातील दोन जीआर रद्द केले आहेत.

त्रिभाषा सूत्रासंदर्भात सांगोपांग अभ्यास, विद्यार्थी हितासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती - मुख्यमंत्री

पावसाळी अधिवेशनात १२ विधेयके लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यासाठी ३६०० कोटी मंजूर मुंबई : राज्यात सर्व

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या शिधापत्रिकांचा रंग हवा पांढरा

अन्य रंगांच्या पत्रिका असल्यास त्वरीत बदलाव्या लागणार मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कार्यरत कर्मचारी

पाच तारखेचा मोर्चा निघणार नाही, सर्वपक्षीय नेत्यांचा निर्णय

मुंबई : मागील सरकारमध्ये उद्धव ठाकरे  मुख्यमंत्री असताना हिंदी भाषा सक्तीकरणाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे

कुठल्या तोंडाने आंदोलन करता, शासनाचे दोन्ही जीआर रद्द; फडणवीसांची घोषणा

मुंबई : राज्यात हिंदी भाषेला विरुध्द करण्यासाठी राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप होत आहेत. याच पार्श्वभूमीवर

मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा महागणार

मुंबई :मुंबई डबेवाल्यांच्या सेवा दरात आता वाढ होणार आहे . याबद्दलची सविस्तर माहिती मुंबई डबेवाला असोसिएशन ने