पालिकेच्या शाळेत यंदा ३५ हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश

मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या काही वर्षांपासून मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी संख्या कमी होताना पाहायला मिळत होती. विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी पालिकेने अनेक उपाययोजनाही केल्या होत्या. त्यानंतर आता पालिका शाळांना चांगले दिवस आले असल्याचे पाहायला मिळत आहे, तर आतापर्यंत सुमारे ३५ हजार विद्यार्थ्यांनी पालिकेच्या शाळेत प्रवेश घेतला आहे.


महापालिका शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढावी आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळावे यासाठी महापालिकेने इंग्रजी माध्यम, सीबीएसई, आयसीएसई मंडळाच्या शाळा सुरू केल्या. त्यानंतर शाळांची डागडुजी करून आधुनिकीकरण देखील केले. शाळांच्या इमारती आकर्षक केल्या गेल्या तसेच शाळेत आधुनिक शिक्षण, डिजिटल शिक्षण देखील सुरू केले आणि यामुळे हळूहळू पुन्हा पालक या शाळांकडे वळू लागले आणि आपल्या मुलांचे प्रवेश पालिकेच्या शाळांमध्ये करण्यास सुरुवात केली.



यामुळे गेल्याकाही वर्षांपासून असलेले पालिकेच्या शाळेतील चित्र बदलू लागले असून याआधी शैक्षणिक वर्षांत पालिकेच्या शाळांमध्ये २९ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता, तर या वर्षी प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्यापासून आतापर्यंत ३५ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.


दरम्यान पालिकेच्या शाळा मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, तमिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती अशा आठ भाषांमध्ये आहेत, तर नर्सरी ते दहावीपर्यंतच्या सुमारे १,१५० शाळांमध्ये सध्या तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तर विद्यार्थ्यांना पालिकेकडून विद्यार्थ्यांना २७ शैक्षणिक वस्तू तसेच टॅब वाटपही केले जाते, तर वर्चुअल क्लासच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना शिकवले जात आहे.

Comments
Add Comment

एसआरए इमारतींना आपत्कालीन जिना उभारणार

मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसनांतर्गत उभारलेल्या मुंबईतील तब्बल एक हजार सात मजली जुन्या इमारतींना आता बाहेरील

अपुऱ्या व्यवस्थेमुळे वरळी येथील बीडीडीकर त्रस्त

मुंबई : वरळी येथील बीडीडी चाळीतील रहिवासी मोठ्या आशेने १६० चौरस फुटांच्या घरातून टॉवरमधील नव्या ५०० चौरस

Mumbai : विकेंड प्लॅन तयार करा! शहरात लवकरच सुरू होणार एक नवं पर्यटन स्थळ; पण कधी? जाणून घ्या सविस्तर माहिती

मुंबई : मुंबईच्या धावपळीच्या जीवनात रोजच्या गर्दीतून बाहेर पडून निसर्गाच्या सान्निध्यात शांततेत वेळ घालवू

मुंबईतल्या काँग्रेस आमदाराचे दोन मतदारयाद्यांमध्ये नाव, चोर कोण, दोष कुणाचा?

मुंबई: काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सध्या मतदारयाद्यांमधील घोळांचा पाढा वाचायला

सोन्याचे सफरचंद! किंमत १० कोटी, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

मुंबई: चक्क १० कोटींचे सफरचंद! हे ऐकून तुम्हाला पण धक्का बसला ना? मात्र हे खायचे सफरचंद नसून ते सोने आणि हिऱ्यांनी

Maharashtra Rain Update : पुढील २४ तास अतिधोक्याचे! ८ आणि ९ नोव्हेंबरला मोठे वादळ धडकणार; अनेक राज्यांमध्ये IMD कडून 'महा-अलर्ट' जारी!

मुंबई : राज्यात अखेर थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. पहाटेच्या वेळी तापमानात घट होऊन गारवा वाढल्याचे चित्र अनेक