पालिकेच्या शाळेत यंदा ३५ हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश

मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या काही वर्षांपासून मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी संख्या कमी होताना पाहायला मिळत होती. विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी पालिकेने अनेक उपाययोजनाही केल्या होत्या. त्यानंतर आता पालिका शाळांना चांगले दिवस आले असल्याचे पाहायला मिळत आहे, तर आतापर्यंत सुमारे ३५ हजार विद्यार्थ्यांनी पालिकेच्या शाळेत प्रवेश घेतला आहे.


महापालिका शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढावी आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळावे यासाठी महापालिकेने इंग्रजी माध्यम, सीबीएसई, आयसीएसई मंडळाच्या शाळा सुरू केल्या. त्यानंतर शाळांची डागडुजी करून आधुनिकीकरण देखील केले. शाळांच्या इमारती आकर्षक केल्या गेल्या तसेच शाळेत आधुनिक शिक्षण, डिजिटल शिक्षण देखील सुरू केले आणि यामुळे हळूहळू पुन्हा पालक या शाळांकडे वळू लागले आणि आपल्या मुलांचे प्रवेश पालिकेच्या शाळांमध्ये करण्यास सुरुवात केली.



यामुळे गेल्याकाही वर्षांपासून असलेले पालिकेच्या शाळेतील चित्र बदलू लागले असून याआधी शैक्षणिक वर्षांत पालिकेच्या शाळांमध्ये २९ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता, तर या वर्षी प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्यापासून आतापर्यंत ३५ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.


दरम्यान पालिकेच्या शाळा मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, तमिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती अशा आठ भाषांमध्ये आहेत, तर नर्सरी ते दहावीपर्यंतच्या सुमारे १,१५० शाळांमध्ये सध्या तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तर विद्यार्थ्यांना पालिकेकडून विद्यार्थ्यांना २७ शैक्षणिक वस्तू तसेच टॅब वाटपही केले जाते, तर वर्चुअल क्लासच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना शिकवले जात आहे.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमध्ये वर्षातून दोनदा भरवा विज्ञान प्रदर्शन

मुंबई : विद्यार्थ्यांमधील चिकित्सक वृत्तीला वाव देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेले ‘विज्ञान

मुंबईतील फेरीवाला माफियाराज कायमचेच उखडून टाका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील वाढत्या फेरीवाल्यांवरील कारवाई सध्या प्रशासनाने कडक केली असली तरी या

तुमच्यापेक्षा सभागृहात गोंधळ घालण्यात आम्ही एक्सपर्ट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचे सर्व पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेवून चांगल्याप्रकारे कामकाज क

शाळा दत्तक धोरण रद्द करण्याची काँग्रेस आमदार पुत्राची मागणी नामंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने खासगी संस्था, स्वयंसेवी संस्था आदींना महापालिकेच्या दिलेल्या दत्तक

मासिक पाळी दरम्यान रजा योग्य की अयोग्य?

राज्य महिला आयोगाच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून मासिक पाळी दरम्यान

कनिष्ठ अभियंता संवर्गातील भरतीबाबत न्यायालयात सक्षम बाजू मांडा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या नगर अभियंता विभाग अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी व