पालिकेच्या शाळेत यंदा ३५ हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश

मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या काही वर्षांपासून मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी संख्या कमी होताना पाहायला मिळत होती. विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी पालिकेने अनेक उपाययोजनाही केल्या होत्या. त्यानंतर आता पालिका शाळांना चांगले दिवस आले असल्याचे पाहायला मिळत आहे, तर आतापर्यंत सुमारे ३५ हजार विद्यार्थ्यांनी पालिकेच्या शाळेत प्रवेश घेतला आहे.


महापालिका शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढावी आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळावे यासाठी महापालिकेने इंग्रजी माध्यम, सीबीएसई, आयसीएसई मंडळाच्या शाळा सुरू केल्या. त्यानंतर शाळांची डागडुजी करून आधुनिकीकरण देखील केले. शाळांच्या इमारती आकर्षक केल्या गेल्या तसेच शाळेत आधुनिक शिक्षण, डिजिटल शिक्षण देखील सुरू केले आणि यामुळे हळूहळू पुन्हा पालक या शाळांकडे वळू लागले आणि आपल्या मुलांचे प्रवेश पालिकेच्या शाळांमध्ये करण्यास सुरुवात केली.



यामुळे गेल्याकाही वर्षांपासून असलेले पालिकेच्या शाळेतील चित्र बदलू लागले असून याआधी शैक्षणिक वर्षांत पालिकेच्या शाळांमध्ये २९ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता, तर या वर्षी प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्यापासून आतापर्यंत ३५ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.


दरम्यान पालिकेच्या शाळा मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, तमिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती अशा आठ भाषांमध्ये आहेत, तर नर्सरी ते दहावीपर्यंतच्या सुमारे १,१५० शाळांमध्ये सध्या तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तर विद्यार्थ्यांना पालिकेकडून विद्यार्थ्यांना २७ शैक्षणिक वस्तू तसेच टॅब वाटपही केले जाते, तर वर्चुअल क्लासच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना शिकवले जात आहे.

Comments
Add Comment

उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस

डोंगरी, मांडवी,मोहम्मद अली रोड परिसरात महापालिकेच्या या अधिकाऱ्याची घुसून कारवाई... महापालिकेच्या नवख्या सहाय्यक आयुक्ताने मुंबईकरांची तोंडे केली गप .

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील काही विभागांमध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत

दोन प्रवाशांच्या भांडणात तरुणाने कायमचा गमावला डोळा; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मुंबई : मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. मुंबईची शान आहे, पण याच रेल्वेवर हल्ली प्रवाशांचा ताण वाढत चालला आहे.

Pariksha Pe Charcha 2026: 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सांगलीच्या मातीचा, महाराष्ट्राच्या लेकराचा गौरव; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या निमित्ताने

हार्बर मार्गावरील वातानुकूलित लोकलमुळे वाहतूक विस्कळीत

मुंबई : हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल सेवा सुरू झाल्यानंतर, प्रवाशांना दररोज लोकलच्या विस्कळीत झालेल्या