राज्यसभेसाठी आघाडी विरुद्ध भाजप मुकाबला अटळ

  76

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महाराष्ट्रातल्या विधानसभा सदस्यांकडून राज्यसभेवर निवडून द्यायच्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार मैदानात उभे ठाकल्यामुळे आता सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पार्टी, असा सामना आज तरी अटळ आहे. आज या निवडणुकीच्या आखाड्यात भाजपचे पीयूष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी तर काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी त्या-त्या उमेदवाराच्या पक्षाचे नेते उपस्थित होते.


शिवसेनेकडून रविवारी संजय राऊत आणि संजय पवार या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेईपर्यंत तरी सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. सध्याच्या पक्षीय बलानुसार भारतीय जनता पार्टीचे दोन, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचा एक उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो. उर्वरित एका जागेसाठी शिवसेनेने आपला दुसरा उमेदवार दिला आहे.


या सहाव्या जागेवर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती उत्सुक होते; परंतु शिवसेनेने त्यांना पाठिंबा न दिल्यामुळे त्यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. भाजपचे पीयूष गोयल, विनय सहस्त्रबुद्धे आणि विकास महात्मे, तर शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे पी. चिदंबरम, हे सहा सदस्य ४ जुलै रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे ही निवडणूक होत आहे.

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही