अनधिकृत कॅफे आणि हॉटेलच्या बांधकामांमध्ये कोणा कोणाचे हात बरबटले?

  150

कीर्ती केसरकर


नालासोपारा : वसईतील प्रसिद्ध समुद्रकिनारे म्हणजेच नवापूर राजवडी आणि कळम या ठिकाणी अनधिकृत कॅफे आणि हॉटेल वाढत चाललेले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी या हॉटेल्स आणि कॅफेवर कारवाई करण्यात आली होती. पण पुन्हा हे कॅफे आणि हॉटेल्स पुन्हा असे सुरू झाल्याने नेमका यांना कोणाचा आशीर्वाद आहे. तसेच यांच्या बांधकामांमध्ये कोणा कोणाचा हात भ्रष्टाचाराने बरबटले आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


वसईतील नवापूर, रजोडी आणि कळंब समुद्रकिनाऱ्यावरील हॉटेल्स आणि कॅफे हे अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिस प्रशासनाकडून यावर कारवाई करण्यात आली होती. परंतु, त्यानंतर देखील काही दिवसातच हे हॉटेल्स आणि कॅफे सुरू करण्यात आले. तर नेमका यामध्ये कोणाकोणाचा भ्रष्टाचार सुरू आहे. असा प्रश्न उपस्थित होत आहे. महसूल विभागाला याची माहिती असताना देखील त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. त्याच बरोबर पर्यावरण विभागाचा याकडे लक्ष जात नाही.


झाडे कापून बेकायदा माती भराव करून हे हॉटेल आणि कॅफे सुरू करण्यात आले होते. तर पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना देखील बिनधास्तपणे सर्व नियम मोडून हे कॅफे आणि हॉटेल सुरू आहे. याच बरोबर या ठिकाणी अनधिकृतरित्या दारूचे सेवन केलं जात आहे, तसेच दारू विकली जात आहे इतके मोठे गुन्हे घडत असताना पोलीस प्रशासन ही गप्प आहे. तर पालिका प्रशासन यावर कारवाई करत नाही तोपर्यंत पोलिस प्रशासन यात हात घालणार नाही असे उत्तर आता पोलिसांकडून दिल जात आहे. नेमकं यामध्ये कोणाची मुख्य भूमिका आहे तसेच या हॉटेल ना नेमकं कोण पाठीशी घालत आहे असा प्रश्न उपस्थित राहिला आहे.


फक्त जेवण आणि दारूचा नाही तर याठिकाणी अवैधरित्या लॉजिंग आणि बोर्डिंग देखील सुरू करण्यात आले आहे. तर निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून लॉजिंग आणि बोर्डिंग कोणतेही परवान्याशिवाय चालू करण्यात आले आहेत. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना कागदपत्रे नसताना तसेच घरपट्टी नसताना याठिकाणी लाईट देखील पुरवली जात आहे. म्हणजे यामध्ये महावितरण विभाग आणि पालिका प्रशासन हे देखील समाविष्ट आहेत असे दिसून येत आहे.


गेल्या काही दिवसांपूर्वी तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर कारवाई देखील झाली. परंतु, पुन्हा हे हॉटेल आणि कॅफे जोमाने सुरू झाले देहविक्री, दारूविक्री आणि अनधिकृत बांधकाम अशा मोठमोठ्या गोष्टी असतानादेखील पालिका आणि पोलीस प्रशासन तसेच महसूल विभाग हे डोळे झाकून फक्त बघत राहिलेला आहे. भ्रष्टाचाराने हात बरबटलेले असल्याने अशा गुन्ह्यांना आता वाढ मिळत आहे आणि ही वाढ या मुख्य विभागांकडून केली जात आहे. नागरिक या विभागांकडे सुरक्षेच्या दृष्टीने पाहत आहे. परंतु, हे सर्व विभाग याकडे दुर्लक्ष करून सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणत आहेत या कॅफे आणि हॉटेल्स मध्ये चालणार हे प्रकार कधी थांबणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Comments
Add Comment

पालिका अधिकाऱ्याकडे ३१ कोटींची अपसंपदा

लाचलुचपत विभागाकडून गुन्हा दाखल विरार  : वसई-विरार महापालिकेचे निलंबित उपसंचालक नगररचना वाय.एस. रेड्डी

जिल्ह्याची कृषिप्रधान ओळख मिटण्याची चिन्हे

वसंत भोईर वाडा : शासनाच्या शेतीकडे पाहण्याच्या उदासीन धोरणामुळे जिल्ह्यातील पारंपरिक शेतीव्यवसाय अडचणीत आला

अवैध बांधकामांना माजी आयुक्तच जबाबदार

‘ईडी’ कार्यालयाकडून भांडाफोड विरार : वसई-विरार पालिका क्षेत्रात करण्यात आलेल्या घोटाळ्यामध्ये अनिलकुमार पवार

वसईत 'भूतांचा' अनोखा आंदोलन: स्मशानभूमी वाचवण्यासाठी प्रयत्न!

मुंबई : मुंबईपासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या वसईत, स्थानिकांनी एका अनोख्या आणि सर्जनशील पद्धतीने

घोडबंदर ते तलासरी महामार्ग धोकादायक स्थितीत

तातडीने लक्ष द्यावे अशी खासदारांची मागणी वाडा : पालघर लोकसभा मतदारसंघातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८

प्रियकरासोबत रंगेहाथ सापडल्याने पतीची हत्या करणाऱ्या पत्नीला अटक

घरातच गाडले, भावानेच घरातील फरशा बदलल्या नालासोपारा : नालासोपारा येथे प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले गेल्यानंतर