वाघोबा घाटात एस टी बसचा अपघात

पालघर (वार्ताहर) : भुसावळ-बोईसर ही बस पालघरच्या वाघोबा घाटात शुक्रवारी सकाळी सहा वाजता दरीत उलटली. अपघातामध्ये १५ प्रवासी जखमी झाले. जखमींना पालघरच्या शासकीय तसेच खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. रातराणी बस सेवेअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या या बसचा चालक नाशिक येथे बदलण्यात आला.


या चालकाने मद्यपान केल्याचे प्रवाशांचे म्हणणे असून भरधाव गाडी चालवणाच्या नादात वाघोबा घाटात बस दरीमध्ये उलटली. बस उलटून तीन पलटी मारत घाटातील नदी पात्रा जवळच अडकली. प्रवासी झोपेत असल्याने काहीना गंभीर दुखापत झाली.


वाहकाने चालकास गाडी वेगाने चालवू नको असे सांगितले होते. तरीही चालकाने त्याचे ऐकले नाही. वाहक दीपक शिंदे हे भुसावळ येथून बसवर कर्तव्यावर होते, तर चालक धनगर हे नाशिक येथून कर्तव्यावर रुजू झाले होते. चालक धनगर हे नाशिक येथूनच मद्यपान करून बस चालवत असल्याचे प्रवाशांनी सांगितले.


महामंडळाने चालक, वाहक कर्मचाऱ्यांची दर आठवड्यात वैद्यकीय तपासणी करावी. जेणेकरून मद्यपान करून चालक असे प्रवाशांच्या जीवाशी खेळणार नाही. -उमेश पाटील, पोलीस निरीक्षक पालघर


आम्ही चालकाचे रक्ताचे नमुने घेतले आहेत. त्याच्या वैद्यकीय तपासणीनंतर अहवाल आल्यावर चालकावर कारवाई करण्यात येईल. -आशिष चौधरी, उपनियंत्रक, पालघर विभाग, म. रा. महामंडळ

Comments
Add Comment

मुंबई-बडोदरा आणि भिवंडी-मनोर मार्गांचे काम युद्धपातळीवर

रस्त्यांच्या जाळ्यांमुळे विकासाची कोंडी फुटणार वसंत भोईर वाडा : गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्थेचा सामना

महापौरांना ७५ हजार रुपये वाहन प्रतिपूर्ती भत्ता

उपमहापौरांना ६५ हजार, तर विरोधी पक्षनेत्याला ५० हजार विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना

वसई-विरार महापालिकेत महापौर पदासाठी ७ अर्ज

उपमहापौर पदासाठी ५ अर्ज विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी शुक्रवारी अर्ज दाखल

Vadhavan Airport : मुंबईचे तिसरे विमानतळ आता समुद्रात? बुलेट ट्रेन, मेट्रो आणि एक्सप्रेसवेची थेट एन्ट्री; वाढवणं बंदराशी थेट जोडणी, नक्की कुठे होणार?

पालघर : दळणवळण क्षेत्रात भारत आता एक मोठी झेप घेण्यास सज्ज झाला आहे. देशातील पहिले 'समुद्रातील विमानतळ' (Sea Airport) मुंबई

विमानतळ प्रकल्पात मच्छीमारांचे हित जपणार

खासदार सवरा यांनी लोकसभेत लावून धरला प्रश्न पालघर : पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी प्रस्तावित असलेल्या विमानतळ

महापालिकेला १० वर्षांनंतर मिळणार विरोधी पक्षनेता

पाच वर्षे संख्याबळ नसल्याने पद होते रिक्त  विरार :वसई-विरार महापालिकेच्या यापूर्वी सन २०१० आणि २०१५ मध्ये अशा