Sunday, May 18, 2025

महामुंबईमहाराष्ट्रताज्या घडामोडी

केरळमध्ये मान्सूनचे आगमन

मुंबई : हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सूनचे केरळमध्ये जोरदार आगमन झाले आहे. आजवरचा अनुभव पाहता यंदा मान्सून काही दिवसाआधीच दाखल झाला आहे. त्यामुळे येत्या २ ते ३ दिवसात महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होवू शकते असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.


यावर्षी मान्सून २७ मे पर्यंत केरळमध्ये दाखल होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु, श्रीलंकेच्या वेशीवर काही दिवस मान्सूनचा मुक्काम वाढला होता पण, आता मान्सून केरळात दाखल झाला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर साधारणपणे आठवडाभरात महाराष्ट्रात मान्सूनची आगमन होते.


दरवर्षी १ जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होत असतो पण यावर्षी मान्सूनचे लवकर आगमन झाले आहे. केरळनंतर मान्सूनची महाराष्ट्रातील पहिली एन्ट्री तळकोकणात होते आणि त्यानंतर तीन ते चार दिवसांत मुंबईमध्ये मान्सून दाखल होत असतो.

Comments
Add Comment