Categories: पालघर

जव्हारमधील बीएसएनएल कार्यालय कुणाच्या भरवशावर?

Share

जव्हार (वार्ताहर) : जव्हार शहरात शासकीय, खासगी संस्थांच्या कार्यालयांमध्ये बीएसएनएलचे इंटरनेट वापरले जाते. परंतु शहरातील बीएसएनएल कार्यालयात अधिकारी, कर्मचारी नसल्यामुळे चोरांना सुगीचे दिवस आले आहेत. या कार्यालयातील जवळपास २० टक्के सामग्री चोरीस गेली आहे. त्यामुळे ग्राहकांना नेटवर्कची समस्या निर्माण होऊ लागली आहे.

या बीएसएनएल कार्यालयात लाखो रुपयांची यंत्रसामग्री आहे. त्या सामग्रीची योग्य प्रकारे देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे मनुष्यबळ नाही. त्यामुळे दिवसेंदिवस ही यंत्रसामग्री भंगार होत आहे. याचाच फायदा भुरट्या चोरांनी घेतला असून कार्यालयातील जवळपास २० टक्के सामग्री चोरी केली आहे.

जव्हार पोलिसांनी अशा चोरांवर कारवाईही केली आहे. परंतु बीएसएनएल कार्यालयात कोणी हजर राहत नसल्याने एवढ्या महागाच्या यंत्रसामग्री कुणाच्या जबाबदारीवर ठेवल्या आहेत. बीएसएनएल अधिकारी यांना ही बाब निदर्शनास येत नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ग्राहकांना रिचार्ज करूनही चांगल्या दर्जाची सुविधा मिळत नाही, याकडे कोण लक्ष देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जव्हार येथील बीएसएनएल कार्यालयात अधिकारी, कर्मचारी वर्गाची त्वरित नेमणूक करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सध्या इंटरनेटचे जाळे जगभर पसरले आहे. शहरातील बीएसएनएल कार्यालयात लाखोंची यंत्रसामग्री केवळ चोरांना चोरी करण्यासाठी ठेवली आहे का? शिवाय ग्राहकांकडून आगाऊ रिचार्जचे पैसे घेऊन लूटमार करण्याचे काम चालू आहे. जव्हार येथील बीएसएनएल कार्यालयातील होणारे नुकसान टाळण्यासाठी कार्यालयात कर्मचारी पाठवणे गरजेचे आहे.

-गोपाळ वझरे, मनसे तालुकाध्यक्ष, जव्हार

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

1 hour ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

2 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

2 hours ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

2 hours ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

2 hours ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

2 hours ago