नवी मुंबईत रोगमुक्तीसाठी लाखो उंदरांचा खात्मा

नवी मुंबई (प्रतिनिधी) : प्लेग आणि लेप्टोस्पायरोसिससारखे जीवघेणे आजार पसरवण्यास कारणीभूत ठरणाऱ्या १ लाख ९६ हजार उंदरांचा खात्मा नवी मुंबई महानगरपालिकेच्या मूषक नियंत्रण विभागाने केला आहे. एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीत ‘मूषक नियंत्रण’ विभागाच्या मोहिमेअंतर्गत कारवाई करण्यात आली. लेप्टोस्पायरोसिसला आळा घालण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.


पालिकेकडून शहरातील नागरिक रोगमुक्त राहावेत, म्हणून विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. त्यामध्ये स्वच्छ अभियान अंतर्गत शहरात घुशी व उंदरावर प्रतिबंध यावे म्हणून झिरो कचरा कुंडी ही अभिनव योजना राबविली. तसेच हागणदारी मुक्त शहर व्हावे, या उद्देशाने स्वच्छ भारत अभियानास सुरुवात झाल्यापासून मागील सहा वर्षे घनकचरा व्यवस्थापन प्रशासन अविरत मेहनत घेत आहेत. त्यातच मूषकामुळे रोगराईला आमंत्रण मिळू नये, हा प्रमुख हेतू समोर ठेवून मागील एक वर्षात दोन लाखांच्या आसपास उंदरांचा खात्मा मूषक नियंत्रण विभागाकडून करण्यात आला आहे.


नवी मुंबईत उंदरांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. उंदरामुळे नवी मुंबईकरांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तर पालिकेने उंदरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मूषक नियंत्रण विभाग स्थापन केला आहे. वाढत्या उंदरांच्या संख्येला आळा बसवण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे. उंदरांचा प्रादुर्भाव आढळणाऱ्या या ठिकाणी विषारी गोळ्या टाकून उंदीरनाशक मोहीम राबवण्यात येत आहे. झोपडपट्टी किंवा गावठाणामध्ये गटारीतच किंवा उघड्यावर टाकण्यात येत असलेल्या कचऱ्यामुळे उंदीर, घुशीला खाद्य मिळत आहे.


उंदीर, घुशीचे प्रमाण झोपडपट्टी व गावठाण भागात अधिक आहे. मूषक पकडण्याठी अॅल्युमिनियम फॉस्फाइट, झिंक फॉस्फाइट, ब्रोमेडिओलॉनी केक अशा औषधांचा वापर करून त्यांचा खात्मा करण्यात येतो. तर पिंजरे, ग्ल्यूटेप, धुरीकरण करूनही उंदरांना मारले जाते. तसेच निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदारांना दंडही ठोठावण्यात आला आहे.


मूषक नियंत्रण मोहिमेमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदाराला २ लाख २३ हजार ५८० रुपयांचा दंड लावण्यात आल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीराम पवार यांनी दिली.

Comments
Add Comment

BMC : गुडन्यूज मुंबईकरांनो! मुंबई मनपाची ‘म्हाडा स्टाईल’ योजना, ४२६ घरं कमी दरात मिळवण्याची सुवर्णसंधी!

मुंबई : मुंबईतील नागरिकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे. मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) आता

सायबर हल्ल्याच्या भीतीने मुंबई महापालिका अलर्ट मोडवर, विभागांना केल्या अशा सूचना

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेचे कामकाज संगणक प्रणालीद्वारेच केले जात असल्याने या अद्ययावत तंत्रज्ञान आणि

इमारतीवरून वीट कोसळून तरुणीचा मृत्यू

मुंबई (प्रतिनिधी) : जोगेश्वरी पूर्वेत मजासवाडी परिसरात बुधवारी सकाळच्या सुमारास कामासाठी जात असलेल्या २२ वर्षीय

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत उबाठा चुकीचा गैरसमज पसरवतंय - राहुल शेवाळे

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्रीकांत यांच्या खंडपीठाने १२ नोव्हेंबरची तारीख ही निकालासाठी दिलेली

वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वेगवान पोर्शे कार डिव्हायडरला धडकली, ड्रायव्हर गंभीर जखमी

मुंबई: मुंबईत बुधवारी रात्रीच्या सुमारास कारचा गंभीर अपघात घडला. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वेगाने जाणारी

ब्रिटीश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी यशराज स्टुडिओला दिली भेट

मुंबई : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर सध्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. कीर स्टार्मर यांनी आज,